AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिजवलेले अन्न किती काळ फ्रीजमध्ये ठेवावं? जाणून घ्या अन्यथा होऊ शकते विषबाधा

फ्रिजमध्ये ठेवलेले अन्नपदार्थ किंवा भाज्या किती दिवसांपर्यंत आपण किती दिवस फ्रिजमध्ये ठेऊ शकतो आणि वापरू शकतो हे जाणून घेऊयात. कारण तज्ज्ञांच्या मते, रेफ्रिजरेटरमध्ये जास्त काळ अन्न साठवणे आरोग्यासाठी खूप हानिकारक असू शकते.

शिजवलेले अन्न किती काळ फ्रीजमध्ये ठेवावं? जाणून घ्या अन्यथा होऊ शकते विषबाधा
How long does food last in the refrigerator,Find outImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 24, 2025 | 4:42 PM
Share

हिवाळा असो उन्हाळा असो किंवा घरांमध्ये रेफ्रिजरेटरचा वापर हा सारखाच केला जातो. रेफ्रिजरेटर अन्नपदार्थ साठवण्यासाठी आणि ते दीर्घकाळ ताजे ठेवण्यासाठी खूप उपयुक्त ठरतो. बऱ्याचदा, आपण शिजवलेले अन्न किंवा कोणतेही पदार्थ फ्रिजमध्ये ठेवतो. आणि पुन्हा पुन्हा वापरतो. पण आपण अन्न फ्रिजमध्ये ठेवलं तरी ते नेहमीच फ्रेश राहतं असं नाही तेही खराब होतचं. पण नक्की किती दिवसांनी ते फार कमी जणांना माहित आहे. फक्त ते लवकर खराब होत नाही एवढंच. मग ते किती दिवसांपर्यंत वापरू शकतो चला जाणून घेऊयात.

अन्नपदार्थ किती दिवस रेफ्रिजरेटरमध्ये ठेऊ शकतो आणि ते खाऊ शकतो ते जाणून घेऊयात.

तज्ज्ञांच्या मते, रेफ्रिजरेटरमध्ये जास्त काळ अन्न साठवणे आरोग्यासाठी खूप हानिकारक असू शकते. त्यामुळे सामान्य पदार्थांबद्दल आणि त्यांच्या साठवणूकीबद्दल जाणून घेऊयात. तज्ञांच्या मते, रेफ्रिजरेटरमध्ये जास्त काळ अन्न साठवणे आरोग्यासाठी खूप हानिकारक असू शकते. त्यामुळे फ्रिजमध्ये ठेवलेले अन्नपदार्थ किती दिवस रेफ्रिजरेटरमध्ये ठेऊ शकतो आणि ते खाऊ शकतो ते जाणून घेऊयात.

मळलेले पीठ इतके दिवस ठेवा.

काही लोकांना दररोज सकाळी आणि संध्याकाळी भरपूर पीठ मळून ठेवण्याची सवय असते. तर ही सवय अजिबात योग्य नाही. खरं तर, फ्रिजमध्ये बराच काळ ठेवलेले पीठ आरोग्यासाठी खूप हानिकारक असू शकते. सकाळी मळून संध्याकाळपर्यंत फ्रिजमध्ये ठेवलेल्या पीठाचा वापर करू शकता, परंतु 2 ते 3 दिवस जुने पीठ अजिबात वापरू नका. त्यात हानिकारक बॅक्टेरिया वाढू लागतात, ज्यामुळे पोटात बद्धकोष्ठता, आम्लता इत्यादी समस्या उद्भवू शकतात.

शिजवलेला भात फ्रीजमध्ये इतका वेळ ठेवा.

शिजवलेला भातही जास्त काळ फ्रिजमध्ये ठेवू नये. फ्रिजमध्ये जास्त काळ साठवलेल्या भातामध्ये बॅक्टेरिया वाढू लागतात, जे पोटासाठी हानिकारक ठरू शकतात. शिजवलेला भात जास्तीत जास्त एका दिवसासाठी फ्रिजमध्ये ठेवणे सुरक्षित मानले जाते. यापेक्षा जास्त वेळ साठवून ठेवल्याने आणि नंतर खाल्ल्याने अपचन होऊ शकते किंवा इतर समस्या उद्धभवू शकतात.

शिजवलेली डाळ

शिजवलेली डाळ देखील दोन दिवसांपेक्षा जास्त काळ फ्रिजमध्ये ठेवू नये, अन्यथा आरोग्याला फायदा होण्याऐवजी हानी पोहोचवू शकते. शिजवलेली डाळ जास्त काळ फ्रिजमध्ये ठेवल्यास त्यातील सर्व पोषक घटक नष्ट होतात. तसेच, ही डाळ खाल्ल्याने अपचन, बद्धकोष्ठता आणि पोटात आम्लता यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

शिजवलेल्या भाज्या अशा प्रकारे साठवा

कोणतीही शिजवलेली भाजी फक्त 4 ते 5 तासांसाठी फ्रिजमध्ये ठेवावी. त्यानंतर ती वापरावी. विशेषतः मसाले असलेल्या भाज्या कधीही जास्त काळ साठवू नयेत. खरं तर, भाज्या जास्त काळ फ्रिजमध्ये ठेवल्याने त्यांची चव खराब होते. तसेच, ते आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

रेफ्रिजरेटरमध्ये अन्न साठवताना या गोष्टी लक्षात ठेवा

शिजवलेले अन्न फ्रिजमध्ये ठेवण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवणे खूप महत्वाचे आहे. सर्वप्रथम, तुमचा फ्रिज स्वच्छ असल्याची खात्री करा, कारण घाणेरड्या फ्रिजमध्ये असलेले बॅक्टेरिया तुमचे अन्न लवकर खराब करू शकतात आणि संक्रमित करू शकतात. याशिवाय, एकाच वेळी फ्रिजमध्ये भरपूर अन्न साठवणे टाळा. असे केल्याने, फ्रिजमध्ये हवा जाण्यासाठी जागा राहत नाही. ज्यामुळे बॅक्टेरिया लवकर वाढू लागतात. तसेच, अन्न शिजवल्यानंतर एक किंवा दोन तासांनीच फ्रिजमध्ये ठेवा आणि जेव्हा तुम्ही ते वापरासाठी बाहेर काढता तेव्हा ते गरम केल्यानंतरच वापरा. फ्रिजमध्ये अन्न साठवताना, त्याचे तापमान फक्त 2 ते 3 अंश ठेवा.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.