AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पावसाळ्यात धबधब्याच्या ठिकाणी फिरायला जात असाल तर ‘या’ चुका करू नका

पावसाळ्यात अनेक उत्साही लोक धबधब्याच्या ठिकाणी किंवा जलप्रवाहाच्या ठिकाणी फिरण्याचा प्लॅन करतात. परंतु त्याठिकाणी पुरेशी माहिती ते घेत नाहीत. अशा ठिकाणी पावसाळ्यात अनेक दुर्घटना होण्याचा धोका असतो. त्यासाठी काही चुका टाळणं महत्त्वाचं आहे.

पावसाळ्यात धबधब्याच्या ठिकाणी फिरायला जात असाल तर 'या' चुका करू नका
waterfallImage Credit source: Instagram
| Updated on: Jun 16, 2025 | 11:59 AM
Share

मावळ तालुक्यातील इंदोरी इथल्या कुंडमळा इथं इंद्रायणी नदीवरील लोखंडी पादचारी पूल कोसळून रविवारी झालेल्या दुर्घटनेत चार पर्यटकांचा मृत्यू झाला. तर 38 पर्यटकांना बाहेर काढण्यात आलं असून त्यापैकी 18 जण जखमी आहेत. पावसाळा सुरू झाला की धबधब्यांच्या ठिकाणी, वाहत्या पाण्याच्या ठिकाणी, तलावांच्या ठिकाणी अनेकजण फिरायला जाण्याचा प्लॅन करतात. परंतु त्याठिकाणी योग्य सोईसुविधा आहेत का, सुरक्षेचा बंदोबस्त आहे का, याबद्दलची माहिती अनेकांना नसते. अशा वेळी दुर्घटना घडतात आणि त्यात निष्पाप लोकांचा बळी जातो. अनेकदा लोक पुरेशी माहिती नसतानाही अनोळखी ठिकाणी जाण्याचं साहस करतात आणि दुर्घटनेचे शिकार होतात. पावसाळ्यात तुम्हीसुद्धा कुठे फिरायचा प्लॅन करत असाल तर या काही चुका टाळा. अन्यथा पावसाळी ट्रिप तुमच्या जीवावरही बेतू शकते.

  • पावसाळ्यात धबधब्यांच्या किंवा पाण्याच्या प्रवाहाच्या ठिकाणी छुपे धोके कधी येतील हे सांगता येत नाही. त्यामुळे स्थानिक जागेची माहिती असणं, हवामानाचा अंदाज घेणं महत्त्वाचं असतं. त्याचसोबत जलस्रोतांची खोली न मोजता पोहणंही टाळलं पाहिजे. संरक्षक गोष्टींच्या बाबतीत माहिती करून घेणंही गरजेचं आहे.
  • पावसाळ्यात ओव्हरफ्लो, अचानक पूर, जोरदार प्रवाह, निसरडा भूभाग होण्याचा धोका वाढतो. अशा ठिकाणी अपघात रोखण्याची पहिली पायरी म्हणजे त्या जागेविषयी संपूर्ण माहिती घेणं. मुसळधार पावसात धबधब्याला जाणं पूर्णपणे टाळावं.
  • वाहत्या पाण्यात गुरुत्वाकर्षण शक्ती वेगळी असते. त्यामुळे प्रौढच नव्हे तर मुलंही संतुलन गमावू शकतात आणि बुडू शकतात.
  • अशा ठिकाणी जर कोणी बुडताना दिसलं तर लगेच मदतीसाठी कॉल करा, इतरांना सावध करा आणि आपत्कालीन सेवांना तातडीने कॉल करा. त्यानंतर बुडणाऱ्या व्यक्तीच्या मदतीसाठी लांब वस्तू किंवा तरंगतं उपकरण वापरा.
  • पाण्यातून व्यक्तीला बाहेर काढल्यानंतर ते श्वास घेत आहेत की नाही हे तपासा. गरज वाटल्यास त्यांना सीपीआर द्या. त्या व्यक्तीला ब्लँकेट किंवा कपड्यांनी झाकून उबदार ठेवण्याचा प्रयत्न करा. वैद्यकीय मदत येईपर्यंत त्यांच्या प्रकृतीकडे लक्ष ठेवा.
  • पावसाळ्यात ट्रेकिंग किंवा हायकिंग जातानाही विशेष काळजी घ्यावी लागते. वनविभाग किंवा स्थानिक सरकारने अशा भागांसाठी दिलेली सावधगिरीची माहिती आणि निर्बंध जरूर वाचावं. त्याचप्रमाणे भूस्खलनप्रवण भाग आणि धोकादायक मार्ग टाळावेत.

पावसाळ्यात फिरायला जातानाचे काही टिप्स-

  1. फिरण्याच्या ठिकाणाबद्दल नीट माहिती घ्या, अचानक पुराच्या शक्यतेचं मूल्यांकन करा
  2. भेटीपूर्वी स्थानिकांचा सल्ला घ्या, ताज्या घडामोडींचा मागोवा घ्या
  3. तिथल्या हवामानाचा अंदाज घ्या
  4. लाइफ जॅकेट आणि इतर आपत्कालीन उपकरणं सोबत घेऊन जा
  5. हेल्पलाइन नंबर जवळ ठेवा, प्रतिबंधित क्षेत्रात जाणं टाळा
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.