AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Solo Travelling : तुम्हीही प्लान करताय Solo Trip ? या गोष्टी बिलकूल विसरू नका..

Solo Trip : आजकाल तरुणांमध्ये सोलो ट्रिपचा ट्रेंड खूप लोकप्रिय झाला आहे. या ट्रिपमध्ये, एखादी व्यक्ती एकट्याने प्रवास करते आणि ठिकाणांना भेट देते. पण कधी कधी एकट्याने प्रवास करताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. एकट्याने प्रवास करताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात.

Solo Travelling : तुम्हीही प्लान करताय Solo Trip ? या गोष्टी बिलकूल विसरू नका..
Image Credit source: freepik
| Updated on: Jan 08, 2024 | 3:36 PM
Share

Solo Travel Tips : गेल्या काही काळापासून सोलो ट्रॅव्हलचा ट्रेंड मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. लोक बॅग भरून एकटेच सहलीला निघतात. सोलो ट्रिपची खास गोष्ट म्हणजे पहिल्यांदाच प्रवास करण्याचा अनुभव खूपच रोमांचक असतो. पण काही लोक जे पहिल्यांदाच अशा ट्रिपवा जात असतील , त्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. पहिल्यांदा असा एकटा प्रवासात काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात. जे पहिल्यांदाच एकट्याने प्रवास करण्याचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी सोलो ट्रिप हा काही खूप सोपा प्रवास नसतो. या काळात तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. जर तुम्हीही पहिल्यांदाच एकट्या सहलीचा प्लॅन करत असाल तर काही महत्त्वाच्या गोष्टी जरूर जाणून घ्या आणि त्या लक्षात ठेवा.

ट्रिप प्लान करा

एकट्याने प्रवासाला निघण्यापूर्वी, तुम्ही तुमच्या संपूर्ण सहलीचे नियोजन करणे महत्त्वाचे आहे. सहलीदरम्यान-जेवणाचा खर्च, राहण्याचा खर्च आणि येण्या-जाण्याचे भाडे, या सर्वा खर्चाचा अंदाज घया. याशिवाय तुम्ही ज्या ठिकाणाला भेट देण्याचा विचार करत आहात त्याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्या.

ओव्हरपॅकिंग नको

जर तुम्ही पहिल्यांदाच एकट्याने प्रवास करणार असाल तर तुम्ही प्रत्येक परिस्थितीसाठी तयार असले पाहिजे. बर्‍याच वेळा आपल्याकडे जास्त माहिती नसते, ज्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. एकट्याने प्रवास करताना, बरेच लोक खूप जास्त सामान बांधून घेतात, ज्यामुळे त्यांना सामान नेण्यात अधिक त्रास होतो. त्यामुळे गरजेपुरते सामान घ्या, ओव्हरपॅकिंग टाळा.

फॅमिलीशी संपर्क कायम ठेवा

तुम्ही कुठे एकटे फिरायला जात असाल तर तुमच्या सुरक्षिततेचीही काळजी घेतली पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत आपल्या कुटुंबाच्या संपर्कात रहा. हे तुम्हाला आपत्कालीन परिस्थितीत मदत करू शकते. यासोबतच तुमचा प्रवासाचा कार्यक्रम, तुम्ही कुठे जाणार आहात, ते सर्व तुमच्या कुटुंबासोबत शेअर करा.

प्लान बी ठेवा रेडी

कधीही एकट्याने प्रवास करताना अडचणी येऊ शकतात. अशा वेळी प्लान-बी नेहमी तयार ठेवा. एखादं रिझर्व्हेशन कॅन्सल झालं किंवा ज्या जागी गेलात, ती जागा आवडली नाही, तर हातात दुसरा प्लान आणि ऑप्शन ठेवा. त्यामुळे तुमची ट्रीप खराब होणार नाही आणि तुमचा मूड-ऑफही होणार नाही.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.