AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अशा पाच प्रसंगी आपला इगो टाळायला हवा, पाहा कोणते ते प्रसंग ?

जीवनात अनेकदा आपण आपल्या इगो किंवा अहंकारामुळे आपली जवळची नाती तोडत असतो. त्यामुळे इगो सांभाळताना आपण आपली नाती त्यापेक्षा मोठी आहेत. ती आपल्याला आयुष्यभर साथ देणार आहेत हे विसरता कामा नये, त्यामुळे अशा पाच प्रसंगात आपण आपला इगो दूर ठेवावा..

अशा पाच प्रसंगी आपला इगो टाळायला हवा, पाहा कोणते ते प्रसंग ?
egoImage Credit source: TV9MARATHI
| Updated on: Nov 15, 2023 | 6:36 PM
Share

मुंबई | 15 नोव्हेंबर 2023 : इगो वा अहंकार काही वेळेस माणसाला चांगला वाटत असला तरी अनेक वेळा तो समोरच्या दु:ख पोहचवू शकतो. मनुष्यप्राण्यातील अनेक भावनांमुळे जाणता अजाणता समोरच्या व्यक्तीला दु:ख पोहचू शकते. यापैकी भावना एक भावना म्हणजे इगो किंवा अहंकार ज्याबद्दल आपण आज पाहणार आहोत. आपण आपल्या जीवनातील काही प्रसंगी आपल्यातील अहंकाराला गुंडाळून बाजूला ठेवले पाहीजे. तर या लेखात पाहूयात की कोणत्या अशा पाच सिच्युएशनमध्ये आपण आपल्यातील इगोला दूर ठेवले पाहीजेत…

कोणाकडून मदत किंवा सल्ला घेताना

जेव्हा आपल्याला इतरांकडून मदत किंवा सल्ला घ्यायचा आहे. तेव्हा नेहमी इगोला साईडला ठेवले पाहीजे. ज्यामुळे आपल्या एक चांगला सल्ला मिळू शकेल. आणि चुकनही आपण असे कोणतेही चुकीचं काम करायला नको ज्यामुळे भविष्यात आपल्याला अडचण येऊ शकेल. त्यामुळे या सिच्युएशनला इगोला मध्ये आणायला नको. कारण अनेक वेळा निगेटिव्ह फिलींगमुळे आपण अनेक बाबींना नकळत बिघडवू शकतो.

आपल्या प्रेमळ व्यक्तीला माफ करताना

आपण आपल्या प्रेमळ जीवाभावाच्या लोकांबाबत कधी इगोला थारा द्यायला नको. कारण यामुळे आपले नाते खराब होऊ शकते. आणि समोरचा दुखावला जाऊ शकतो. कारण आपल्या प्रेमळ व्यक्ती कधीच हे सहन करणार नाहीत की आपण त्यांच्याबद्दल वाईट विचार करतोय. असा प्रसंग अनेकदा येऊ शकतो. त्यामुळे प्रयत्न कराल की आपल्या आणि प्रेमळ व्यक्ती दरम्यान कधीच इगो यायला नको

रिलेशनशिपमध्ये कंप्रोमाइज करताना

अनेकदा दोघांना एकत्र राहाताना कंप्रोमाईज करावे लागते. जर अशा वेळी आपण आपल्यातील इगोला समोर आणले तर नात्यातील गोडवा कायम राहाणार नाही. नेहमी एकाच बाजूने कंप्रोमाईज केल्याने अनेकदा नकारात्मकता वाढते. समोरच्या व्यक्तीला सिच्युएशन वाईट होऊ शकते.त्यामुळे तुम्ही नेहमी प्रयत्न करा की तुमच्या नात्यात दोघांनी समपातळीवर कंप्रोमाईज करायला हवे. कारण कंप्रोमाईज करणे काही वाईट गोष्ट नाही. तसेच प्रयत्न करा की अशा वेळी इगोला बाजूला ठेवायला हवे.

दुसऱ्याच्या अचिव्हमेंटला सपोर्ट करताना

अनेकदा एखाद्याच्या अचिव्हमेंट किंवा यशाने दुसऱ्याला इर्ष्या किंवा जळावू वृत्ती तयार होते. त्यामुळे अशा परिस्थितीत तुमचा इगो दुखावतो. आपण मनुष्य असल्याने आपण आपल्या सहकाऱ्यांच्या यशाचे अभिनंदन करायला हवे. आपल्या भविष्यात लागणाऱ्या मदतीसाठी तेच आपल्या सोबत असल्याने आपण त्यांची सुखात सुख मानले पाहीजे. त्यामुळे एकमेकांच्या यशाचे अभिनंदन केले पाहीजे.

आपल्या परिस्थितीला समजून घेणे

अनेकदा आपल्याला काही गोष्टीबाबत काही कल्पना नसते. परंतू तरीही आपण आपल्याला सर्वकाही ज्ञात असल्यासारखे व्यक्त होतो. जेव्हा समोरचा व्यक्ती आपल्याला त्याबाबत विचारतो तेव्हा आपल्याला इगो मध्ये येतो. जर आपले काही चुकत असेल किंवा आपल्यात काही चूक असेल तर आपण त्याची कबूली दिली पाहीजे. परिस्थिती समजून घेतली पाहीजे. आपल्या चूकीची कबूली आपले नाते वाचवू शकते.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.