AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वात सुंदर सूर्यास्त पाहण्यासाठी भारतातील ‘या’ 5 ठिकाणी द्या भेट

सुर्यास्ताचे दृश्य पाहणे हे इतके विलोभनीय आहे की ते आपल्या मनाला मंत्रमुग्ध करून टाकते. सहसा प्रत्येकजण हा क्षण आपल्या कॅमेऱ्यात कैद करत असतो कारण सूर्यास्ताचे हे सौंदर्य म्हणजेच जेव्हा सूर्यास्त होतो तेव्हा आकाशात एक लालसरपणा येतो जो पाहणे अगदी मंत्रमुग्ध करणारे असतो. अशातच आपल्या भारतात असे काही 5 ठिकाणे आहेत जेथुन सूर्यास्ताचे सुंदर दृश पाहू शकता. चला या शहरांबद्दल जाणुन घेऊयात...

सर्वात सुंदर सूर्यास्त पाहण्यासाठी भारतातील 'या' 5 ठिकाणी द्या भेट
सर्वात सुंदर सूर्यास्त पाहण्यासाठी भारतातील 'या' 5 ठिकाणी द्या भेटImage Credit source: Arun Siddharth/Getty Images
| Edited By: | Updated on: Jun 11, 2025 | 5:05 PM
Share

आपल्यापैकी अनेकजण हे कुठेतरी फिरायला जाण्याचा विचार करत असतात. अशा वेळेस प्रत्येकजण हिल्स स्टेशन्स, निसर्गाच्या सानिध्यात जात असतातच, पण तुम्ही कधी अशा ठिकाणी जाण्याचा विचार का करत नाही जे वेगळे असण्यासोबतच खुप सुंदर देखील आहे. कारण आपण असे काही क्षण रोज पाहत असतो, पण तिच गोष्ट आपण ठराविक ठिकाणांहुन पाहणे आपल्या मनाला भुरळ पाडते. येथे आपण सुर्यास्ताच्या दृश्याबद्दल बोलत आहोत. कारण आजकाल वाढते शहरीकरण यामुळे सुर्यास्त पाहायला फारस मिळत नाही. त्यातच आपण जर एखाद्या चौपाटी किंवा घराच्या गच्चीत संध्याकाळी जातो तेव्हा आपण सुर्यास्‍त पाहत असतो, पण आपल्या देशातील काही शहरांमधून सूर्यास्त पाहणे अगदी सुंदर वाटते. तुम्ही सुद्धा या सुर्यास्ताच्या दृश्याचा विलोभनीय क्षण अनुभवण्यासाठी तुमच्या जोडीदारासह , सुंपूर्ण कुटुंबासह किंवा अगदी मित्रांसह या 5 टॉप शहरांमध्ये जाऊ शकतात.

समुद्रकिनारा असो किंवा डोंगरभागांमधुन मावळणारा सूर्य, दोन्हीही तितकेच शांत व सुंदर आहेत. आपल्या देशात असे अनेक सुंदर सूर्यास्त बिंदू आहेत जिथे तुम्हाला मावळत्या सूर्याचे विहंगम दृश्य पाहता येते. चला तर मग जाणून घेऊयात या 5 शहरांबद्दल…

भारतातील टॉप 5 सूर्यास्ताची ठिकाणं

1- टायगर हिल, दार्जिलिंग, पश्चिम बंगाल

दार्जिलिंगमधील टायगर हिल हे त्याच्या मनमोहक सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या दृश्यांसाठी ओळखले जाते. येथून तुम्हाला हिमालयाच्या शिखरांवरून, विशेषतः आकाशात नारंगी आणि गुलाबी रंगाच्या छटा पसरवणाऱ्या कांचनजंगा शिखरावर हळूहळू मावळणारा सूर्य दिसतो. निसर्गप्रेमी आणि छायाचित्रकारांसाठी हे दृश्य स्वर्गापेक्षा कमी नाही.

2- कन्याकुमारी, तामिळनाडू

भारताच्या दक्षिणेकडील टोकावरील कन्याकुमारी हे सूर्यास्त पाहण्यासाठी सर्वात प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक आहे. त्याचबरोबर कन्याकुमारी हे आपल्या देशातील एक असे ठिकाण आहे, जिथे बंगालचा उपसागर, अरबी समुद्र आणि हिंदी महासागर एकत्र येतात. या तीनही दिशांचे पाणी कन्याकुमारीतील या खास ठिकाणी मिळते आणि या तिघांच्या संगमावर होणारा सूर्यास्त एक अद्वितीय आणि इतके विलोभनीय आहे की तुम्ही मंत्रमुग्ध व्हाल. येथून सूर्यास्त पाहणे खरोखरच एक संस्मरणीय क्षण आहे.

3- वकारला, केरळ

केरळा येथील वकारला समुद्र किनाऱ्यावरून सुर्यास्त पाहणे हे एक असे दृश्य आहे की जणू समुद्र सूर्यालाच गिळंकृत करत आहे. अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर मावळतीची संध्याकाळ, शांत लाटा आणि लालसरपणाने रंगलेले आकाश अगदी मनमोहक आणि विहंगम दृश्य पाहता येते. जर तुम्हालाही सुर्यास्‍त पाहण्याचं वेड असेल आणि तुम्ही एका चांगल्या सूर्यास्ताच्या ठिकाणाच्या शोधात असाल, तर हे सर्वोत्तम ठिकाण आहे.

4- ताजमहाल, आग्रा, उत्तर प्रदेश

प्रेमाचे प्रतीक असलेला ताजमहाल सूर्यास्ताच्या वेळी इतकं अदभुत दिसतो की ते दृश्य तुम्ही पाहतच राहाल. यमुना नदीच्या काठावर वसलेले हे पांढरे संगमरवरी समाधीस्थळ सूर्यास्त होताच सोनेरी, नारिंगी आणि गुलाबी रंगात बदलते. हे दृश्य इतके मनमोहक आहे की त्याचे शब्दात वर्णन करणे कठीण आहे.

5- कच्छचे रण, गुजरात

कच्छच्या रणातील विशाल पांढरे मिठाचे वाळवंट हे सूर्यास्त पाहण्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे. सूर्यास्त होताच, ही पांढरी चादर वेगवेगळ्या रंगांनी म्हणजेच पिवळ्या केशरी रंगात बदलते. ज्यामुळे एक अनोखा देखावा निर्माण होतो. पौर्णिमेच्या रात्री येथे सूर्यास्त पाहणे आणखी खास असते.

Follow Us
काटेवाडीत तुकोबांचं पहिलं रिंगण! ज्ञानोबा-तुकारामांच्या जयघोषात...
Baramati | काटेवाडीत तुकोबांचं पहिलं रिंगण! ज्ञानोबा-तुकारामांच्या जयघोषात दुमदुमली बारामती, भक्तिमय क्षण कॅमेऱ्यात कैद
पुणे हादरलं! बड्या राजकीय नेत्यांची नावं अन्... व्हिडीओ काढत बिल्डरने
पुणे हादरलं! बड्या राजकीय नेत्यांची नावं अन्... व्हिडीओ काढत बिल्डरने संपवलं जीवन
इथेनॉल पेट्रोलमुळे गाड्यांचा मृत्यू? कोल्हापुरात दुचाकीची अंत्ययात्रा
Kolhapur App Protest | इथेनॉल पेट्रोलमुळे गाड्यांचा मृत्यू? कोल्हापुरात थेट दुचाकीची अंत्ययात्रा; सरकारविरोधात जोरदार आंदोलन
यावेळी चाकू नाही चक्क लोखंडी... मुंबई लोकलमध्ये रक्तरंजीत राडा!
Mumbai Local | यावेळी चाकू नाही चक्क लोखंडी... मुंबई लोकलमध्ये पुन्हा रक्तरंजीत राडा! काय घडलं?
अजितदादांच्या आठवणीत वारकरी भावुक; जय पवार यांनीही काढली आठवण!
Jay Pawar | अजितदादांच्या आठवणीत वारकरी भावुक; जय पवार यांनीही काढली आठवण!
उद्धव ठाकरे दिल्लीला येणार का? CJP संस्थापक अभिजीत दीपकेनं दिलं थेट...
उद्धव ठाकरे दिल्लीला येणार का? CJP संस्थापक अभिजीत दीपकेनं दिलं थेट उत्तर
सुनेत्रा पवार पालकमंत्री... पण मीच पालक! पंकजा मुंडेंच्या विधानाने....
Pankaja Munde | सुनेत्रा पवार पालकमंत्री... पण मीच पालक! पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकारणात नव्या चर्चांना उधाण
अजित पवारांसह अनेकांवर होता आरोप; कोर्टाचा निर्णय येताच...
अजित पवारांसह अनेकांवर होता आरोप; कोर्टाचा निर्णय येताच पवार कुटुंबीयांना मोठा दिलासा, नेमकं प्रकरण काय?
वर्षा बंगल्यावरील बैठकीचं गूढ अखेर उलगडलं! तटकरेंनी एकाच वक्तव्यात....
Sunil Tatkare | वर्षा बंगल्यावरील बैठकीचं गूढ अखेर उलगडलं! तटकरेंनी एकाच वक्तव्यात केला मोठा खुलासा
पंढरपुरात VIP दर्शनावरून वाद! मुनगंटीवार नाराज; गुलाबराव पाटलांना मिळा
Pandharpur | पंढरपुरात VIP दर्शनावरून वाद! मुनगंटीवार नाराज; गुलाबराव पाटलांना मिळाला ग्रीन सिग्नल; नेमकं घडलं काय?
मोठी बातमी, कोल्हापूर हादरलं, भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार थेट….

मोठी बातमी, कोल्हापूर हादरलं, भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार थेट…

Thalapathy Vijay : थलापती विजय यांचं सरकार संकटात; 2 महिन्यातच समोर सर्वात मोठी अडचण; तामिळनाडूमध्ये काय घडतंय?.

Thalapathy Vijay : थलापती विजय यांचं सरकार संकटात; 2 महिन्यातच समोर सर्वात मोठी अडचण; तामिळनाडूमध्ये काय घडतंय?

EPF News : 40 व्या वर्षी नोकरी सोडली, 58 व्या वयापर्यंत खात्यात येईल व्याज ? नवा नियम काय?.

EPF News : 40 व्या वर्षी नोकरी सोडली, 58 व्या वयापर्यंत खात्यात येईल व्याज ? नवा नियम काय?

विरार येथील अर्नाळा समुद्र किनाऱ्यावर चार मुले बुडाली, दोघांना वाचवण्यात यश.

विरार येथील अर्नाळा समुद्र किनाऱ्यावर चार मुले बुडाली, दोघांना वाचवण्यात यश

पाहताच क्षणी प्रेम, 15 वर्षांनंतर घटस्फोट, आदिनाथ – उर्मिलाने लेक जिजाबद्दल घेतला मोठा निर्णय.

पाहताच क्षणी प्रेम, 15 वर्षांनंतर घटस्फोट, आदिनाथ – उर्मिलाने लेक जिजाबद्दल घेतला मोठा निर्णय

Paresh Rawal : पाच वर्षात राजकारण का सोडलं? अभिनेते परेश रावल यांनी आता 12 वर्षांनी केला खुलासा.

Paresh Rawal : पाच वर्षात राजकारण का सोडलं? अभिनेते परेश रावल यांनी आता 12 वर्षांनी केला खुलासा