AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुगरनींनोsss! भाजी वाफेवर करावी की उकडून? योग्य पद्धत कोणती? जाणून घ्या

भाज्या उकडल्याने त्या लवकर आणि चांगल्या प्रकारे शिजतात, तर काही लोक म्हणतात की वाफवल्याने त्यातील पोषक तत्वे टिकून राहतात. भाज्या शिजवण्याची योग्य पद्धत कोणती आहे तसेच त्यांचे फायदे आणि नुकसान कोणते आहेत ते जाणून घेऊयात

सुगरनींनोsss! भाजी वाफेवर करावी की उकडून? योग्य पद्धत कोणती? जाणून घ्या
| Edited By: | Updated on: Mar 12, 2025 | 5:14 PM
Share

आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी आपण अनेक प्रकारे शरीराची काळजी घेत असतो. तसेच आपल्या आहारात अनेक पौष्टिक पदार्थांचा समावेश करतो. हिरव्या भाज्या आणि इतर पोषक तत्वांनी समृद्ध असलेले अन्न आपल्या शरीराला जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबर प्रदान करतात. याकरिता उत्तम आरोग्यासाठी चांगला आहार आवश्यक असतो. चांगला आहार म्हणजे पोषक तत्वांनी युक्त अन्न खाणे. पण तुम्हाला माहिती आहे का की भाज्या शिजवण्याची योग्य पद्धत कोणती आहे.? त्यातच त्यांच्या पौष्टिकतेवर ही परिणाम होतो? बऱ्याचदा अनेकजण याच संभ्रमात आहेत की भाज्या उकडुन की वाफवुन खावे.

आपल्यापैकी काही लोकांचा असा विश्वास आहे की भाज्या उकडुन त्या लवकर आणि चांगल्या प्रकारे शिजतात, तर काही लोक म्हणतात की भाज्या वाफवल्याने त्यामध्ये असलेले पोषक घटक सुरक्षित राहतात. शेवटी, कोणती पद्धत अधिक आरोग्यदायी आहे आणि कोणती तुमच्या आहारासाठी सर्वोत्तम ठरेल? आज या लेखात आम्ही तुम्हाला दोन्ही पद्धतींचे फायदे आणि नुकसान याबद्दल सांगणार आहोज जेणेकरून तुम्ही तुमच्या आरोग्यानुसार योग्य पद्धत निवडू शकाल.

भाज्या उकडुन खाण्याचे फायदे आणि नुकसान

फायदे

उकडलेल्या भाज्या लवकर आणि सहज शिजतात. तर काही उकडलेल्या भाज्यांच्या चवीत थोडासा बदल होतो, त्यामुळे काही भाज्या अधिक चविष्ट लागतात तसेच बटाटे, गाजर उकडल्याने ते मऊ होतात, ज्यामुळे यांचे सेवन केल्याने पचन देखील सहज होते.

नुकसान

भाज्या शिजवल्याने व्हिटॅमिन सी आणि बी-कॉम्प्लेक्स सारखे पोषक घटक कमी होऊ शकतात. जर भाज्या जास्त वेळ उकडल्यास त्यांचा पोत आणि चव दोन्ही बिघडू शकते. ज्यामुळे यां भाज्याचे सेवनाने शरीराला कोणतेच पोषण मिळत नाही.

भाज्या वाफवुन खाण्याचे फायदे व नुकसान

फायदे:

तुम्ही जर भाज्यांना वाफवले तर त्यातील 90 % पोषक घटक टिकून राहतात. तसेच भाज्यांचा नैसर्गिक पोत आणि रंग अबाधित राहतो. यासोबतच भाज्यांमध्ये जास्त तेल आणि मसाले न वापरताही भाज्या खाण्यास हेल्दी आणि चविष्ट लागतात.

नुकसान

आपल्या आहारामध्ये अशा काही भाज्या असतात ज्या वाफवुन खाऊ शकत नाही.कारण ते शिजण्यास जास्त वेळ लागतो. त्यामुळे अशा भाज्या व्यवस्थित न शिजल्यास त्यांचे सेवन केल्यास तुमच्या शरीराला त्यांचा त्रास होऊ शकतो. तर काही लोकांना बिना मसाल्याशिवाय वाफवलेल्या भाज्या खाण्यास कमी चवदार लागतील.

कोणती पद्धत चांगली आहे?

जर तुम्हाला भाज्यांमधील पोषण टिकवून ठेवायचे असेल तर वाफवून घेणे हा सर्वोत्तम पर्याय आहे. त्याचवेळी, जर तुम्हाला अन्न लवकर शिजवायचे असेल तर ते उकडुन खाणे योग्य ठरेल. याशिवाय, चांगल्या आरोग्यासाठी भाज्या हलक्या वाफवल्यानंतर त्यांना हल्का तडका देऊन खाल्ल्याने तुम्हाला चव आणि पोषण दोन्ही मिळू शकते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.