AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गर्भधारणेच्या पहिल्या तिमाहीपासून चक्कर येण्याची समस्या आहे? तर ‘या’ टिप्स फाॅलो करा!

गर्भधारणा हा प्रत्येक स्त्रीसाठी आनंदाचा काळ असतो. पण या आनंदाबरोबरच तिला अनेक समस्यांनाही सामोरे जावे लागते. ज्याचा तिने यापूर्वी कधीही सामना केला नसतो. यापैकी बहुतेक समस्या शरीरातील हार्मोन्सच्या चढउतारांमुळे असतात.

गर्भधारणेच्या पहिल्या तिमाहीपासून चक्कर येण्याची समस्या आहे? तर 'या' टिप्स फाॅलो करा!
गरोदरपणा
| Edited By: | Updated on: Aug 11, 2021 | 6:57 AM
Share

मुंबई : गर्भधारणा हा प्रत्येक स्त्रीसाठी आनंदाचा काळ असतो. पण या आनंदाबरोबरच तिला अनेक समस्यांनाही सामोरे जावे लागते. ज्याचा तिने यापूर्वी कधीही सामना केला नसतो. यापैकी बहुतेक समस्या शरीरातील हार्मोन्सच्या चढउतारांमुळे असतात. चक्कर येणे देखील गर्भधारणेच्या सामान्य समस्यांपैकी एक आहे. ही समस्या गर्भधारणेच्या सहा आठवड्यांनंतर सुरू होऊ शकते आणि तिसऱ्या तिमाहीपर्यंत टिकू शकते. गर्भधारणेदरम्यान चक्कर का येते आणि या परिस्थितीत काय करावे हे जाणून घ्या. (Causes of dizziness in pregnancy)

पहिल्या तिमाहीत चक्कर येण्याची कारणे

पहिल्या तिमाहीत महिला अनेक वेळा आवश्यक आहार देखील घेऊ शकत नाही आणि कोणत्याही प्रकारे घेतल्यास, उलट्या वगैरेमुळे अन्न आणि द्रव तिच्या शरीरात टिकू शकत नाही. यामुळे अनेक वेळा स्त्रीला चक्कर येऊ लागते. याशिवाय, हार्मोनल बदलांमुळे, रक्तवाहिन्यांच्या भिंती कधीकधी रुंद होतात. ज्यामुळे बीपी कमी होऊ लागतो आणि चक्कर येण्याची समस्या जाणवते.

ही समस्या दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीत उद्भवते. कारण दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीत शरीरातील रक्ताचे प्रमाण 30 टक्क्यांपर्यंत वाढते. अशा परिस्थितीत, अनेक स्त्रियांचा रक्तदाब वाढू लागतो आणि चक्कर येते. या व्यतिरिक्त, अशक्तपणा, शरीरात पाण्याची कमतरता किंवा इतर कोणत्याही कारणामुळे चक्कर येण्याची समस्या देखील असू शकते.

चक्कर आल्यावर काय करावे

-जेव्हा जेव्हा चक्कर येते तेव्हा सर्वप्रथम खोलीत आरामदायक स्थितीत बसा आणि कोणाच्या तरी मदतीने खोलीची खिडकी आणि दरवाजा उघडा.

– डाव्या बाजूला झोपा. यामुळे तुम्हाला खूप आरामदायक वाटेल. थोड्या वेळाने हलका नाश्ता किंवा फळांचा रस घ्या.

-जर बीपी कमी असेल तर मीठ आणि लिंबू घालून कॉफी प्या किंवा पाणी प्या. पण जर बीपी जास्त असेल तर लगेच तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

-शरीरात पाण्याची कमतरता होऊ देऊ नका. त्यामुळे दिवसभर भरपूर पाणी प्या. तुम्ही मध्येच नारळ पाणी, ताक, लस्सी, लिंबूपाणी इत्यादी देखील घेऊ शकता.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Causes of dizziness in pregnancy)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.