AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गूळ खाणे आरोग्यासाठीच नाही तर त्वचेसाठी देखील फायदेशीर, मिळेल नैसर्गिक चमक!

गुळात नैसर्गिक गोडवा असतो जो खायला चविष्ट असण्यासोबतच शरिरासाठी फायद्याचंही असतं.

गूळ खाणे आरोग्यासाठीच नाही तर त्वचेसाठी देखील फायदेशीर, मिळेल नैसर्गिक चमक!
गुळ
| Edited By: Anish Bendre | Updated on: Mar 29, 2021 | 10:55 AM
Share

मुंबई : गुळात नैसर्गिक गोडवा असतो जो खायला चविष्ट असण्यासोबतच शरिरासाठी फायद्याचंही असतं. गुळात व्हिटॅमिन-ए आणि व्हिटॅमिन-बी, सुक्रोज, ग्लूकोज, लोह, कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, जस्त, मॅग्नेशियम या सारखे घटक आढळतात. विशेषतः गुळात फॉस्फरसचे प्रमाण अधिक असते. (Eating jaggery is beneficial for the skin)

गुळामध्ये शरीराला आवश्यक असणारी अनेक खनिजे आणि जीवनसत्त्वे आढळतात. गूळ आपल्या आरोग्यासाठी जसा चांगला असतो तसाच आपल्या त्वचेसाठी देखील गूळ महत्वाचा आहे. जे आपल्या त्वचेसाठी नैसर्गिक क्लींजर म्हणून काम करतात. चला तर मग जाणून घेऊयात गूळ खाण्याचे फायदे….

-गुळामध्ये व्हिटॅमिन्स, लोह, पोटॅशियम, फॉलेट, झिंक आणि सोडिअम यासारख्या पोषण तत्त्वांचा समावेश आहे. ही सर्व पोषण तत्त्व निरोगी आणि नितळ त्वचेसाठी आवश्यक असतात.

-शारीरिक किंवा मानसिक थकव्यामुळे चेहरा निस्तेज वाटत असल्यास थोड्या प्रमाणात गुळाचे सेवन करा. यामुळे तुमच्या शरीराला ऊर्जा मिळते आणि चेहऱ्यावरील थकवा सहजरित्या दूर होण्यास मदत मिळते.

-गुळामध्ये लोह आणि फॉलेट यासारख्या पोषण तत्त्वांचा समावेश आहे. हे घटक शरीरामध्ये पोहोचल्यानंतर त्वचेच्या प्रत्येक पेशींमधील रक्तप्रवाह सुरळीतपणे सुरू ठेवण्याचे कार्य करतात.

-गुळात सेलेनिअम आणि झिंक यांसारखे अँटीऑक्सिडंट मोठ्या प्रमाणात असतात. हे शरिराला फ्री रेडिकल्स आणि संसर्गापासून बाचाव करतात. त्यामुळे हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात गुळाचं सेवन केलं जातं.

-हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे त्वचा निर्जीव आणि निस्तेज होते. नियमित योग्य प्रमाणात गुळाचे सेवन केल्यास शरीरातील हिमोग्लोबिनची कमतरता भरून निघण्यास मदत मिळेल.

-गुळाच्या सेवनामुळे त्वचा सैल पडत नाही. तसंच त्वचेवर सुरकुत्या, पिगमेंटेशन, फाइन लाइन्स इत्यादी समस्या उद्भवत नाहीत.

-रक्तदाब नियंत्रित करण्यात गुळाची भूमिका महत्त्वाची ठरते. विशेषत: उच्च रक्तदाब असलेल्या लोकांना दररोज गूळ खाण्याचा सल्ला दिला जातो.

-गूळ खाल्ल्याने वजन कमी होण्यासही मदत होते. गूळ हा पोटॅशिअमचा चांगला स्त्रोत आहे. यामुळे इलेक्ट्रोलाईट्सला नियंत्रित ठेवण्यास मदत करते तसेच, मेटाबॉलिजम वाढवण्यातही मदत करते. तसेच, स्नायुंना बळकटी देण्याचं कामही करते.

(डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Eczema Myth | ‘एक्झिमा’ आजाराबद्दल लोकांमध्ये संभ्रमाची स्थिती, जाणून घ्या या मागचं पूर्ण सत्य…#eczema | #Health | #skincare | #skincareproducts https://t.co/azKyegZj0a

— TV9 Marathi (@TV9Marathi) January 26, 2021

(Eating jaggery is beneficial for the skin)

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली