AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health Tips : पावसाळ्याच्या हंगामात ‘या’ 5 गोष्टी खाणे आरोग्यासाठी हानिकारक!

पावसाळ्याच्या हंगामात आरोग्याची काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे. त्याचबरोबर हंगामी आजारांचा धोकाही वाढतो. या हंगामात सर्दी, थंडी आणि ताप यांची समस्या निर्माण होते. अशा स्थितीत थोडासा निष्काळजीपणा तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो.

Health Tips : पावसाळ्याच्या हंगामात 'या' 5 गोष्टी खाणे आरोग्यासाठी हानिकारक!
आहार
| Edited By: | Updated on: Sep 20, 2021 | 8:12 AM
Share

मुंबई : पावसाळ्याच्या हंगामात आरोग्याची काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे. त्याचबरोबर हंगामी आजारांचा धोकाही वाढतो. या हंगामात सर्दी, थंडी आणि ताप यांची समस्या निर्माण होते. अशा स्थितीत थोडासा निष्काळजीपणा तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो. या हंगामात खाण्यापिण्याबाबत काळजी घ्यावी. या हंगामात कोणत्या गोष्टी टाळाव्यात हे जाणून घेऊया. (Eating these 5 things during the rainy season is harmful to health)

पालक

पालक, मेथी, वांगी, कोबी यासारख्या गोष्टी पावसाळ्यात खाऊ नयेत. आरोग्य तज्ञांच्या मते, पावसाळ्यात बॅक्टेरिया आणि बुरशीजन्य संसर्गाचा धोका सर्वाधिक वाढतो. याशिवाय, पालेभाज्यांमध्ये किडे सहज वाढतात, त्यांचे सेवन केल्याने पोटाच्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे या भाज्या खाणे टाळावे.

दही

दही सारख्या डेअरी उत्पादनांचा वापर पावसाळ्यात टाळावा. कारण या हंगामात दह्यामध्ये जास्त प्रमाणात बॅक्टेरिया वाढतात. यामुळे पोटाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे पावसाळ्यात दही खाणे टाळण्याचा सल्ला दिला जातो.

मासे

पावसाळी हंगाम माशांसाठी प्रजनन काळ असतो. या हंगामात पाणी प्रदूषित होते आणि ही घाण माशांना चिकटते. ज्यामुळे अन्न विषबाधा होण्याचा धोका वाढू शकतो. अशा परिस्थितीत माशांचे सेवन आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

सलाड

सलाड आरोग्यासाठी फायदेशीर आहे. पण या हंगामात सलाड देखील खाणे टाळले पाहिजे. याशिवाय कापलेली फळे आणि भाज्या खाणे देखील आरोग्यासाठी हानिकारक आहे.

स्ट्रीट फूड

स्ट्रीट फूड आणि तळलेल्या गोष्टी पावसाळ्यात खाणे टाळावे. या हंगामात उघड्या भाज्या आणि फळे खाणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. म्हणूनच डॉक्टर स्ट्रीट फूड खाण्यापासून दूर राहण्याचा सल्ला देतात. या व्यतिरिक्त, या गोष्टी तुमच्या पचनसंस्थेचे कार्य कमी करतात. पावसात पकोडे, समोसे वगैरे खाणे टाळा. कारण या गोष्टी नीट पचत नाहीत, त्यामुळे पोटाशी संबंधित समस्या वाढू शकतात.

लाल मास

पावसाळ्यात पाचन प्रक्रिया मंदावते. ज्यामुळे डॉक्टर बाहेरच्या गोष्टी खाणे टाळण्याचा सल्ला देतात. या हंगामात मांसाहारी पदार्थ खाऊ नयेत.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Eating these 5 things during the rainy season is harmful to health)

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.