Health Tips : पावसाळ्याच्या हंगामात ‘या’ 5 गोष्टी खाणे आरोग्यासाठी हानिकारक!

पावसाळ्याच्या हंगामात आरोग्याची काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे. त्याचबरोबर हंगामी आजारांचा धोकाही वाढतो. या हंगामात सर्दी, थंडी आणि ताप यांची समस्या निर्माण होते. अशा स्थितीत थोडासा निष्काळजीपणा तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो.

Health Tips : पावसाळ्याच्या हंगामात 'या' 5 गोष्टी खाणे आरोग्यासाठी हानिकारक!
आहार
Follow us
| Updated on: Sep 20, 2021 | 8:12 AM

मुंबई : पावसाळ्याच्या हंगामात आरोग्याची काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे. त्याचबरोबर हंगामी आजारांचा धोकाही वाढतो. या हंगामात सर्दी, थंडी आणि ताप यांची समस्या निर्माण होते. अशा स्थितीत थोडासा निष्काळजीपणा तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो. या हंगामात खाण्यापिण्याबाबत काळजी घ्यावी. या हंगामात कोणत्या गोष्टी टाळाव्यात हे जाणून घेऊया. (Eating these 5 things during the rainy season is harmful to health)

पालक

पालक, मेथी, वांगी, कोबी यासारख्या गोष्टी पावसाळ्यात खाऊ नयेत. आरोग्य तज्ञांच्या मते, पावसाळ्यात बॅक्टेरिया आणि बुरशीजन्य संसर्गाचा धोका सर्वाधिक वाढतो. याशिवाय, पालेभाज्यांमध्ये किडे सहज वाढतात, त्यांचे सेवन केल्याने पोटाच्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे या भाज्या खाणे टाळावे.

दही

दही सारख्या डेअरी उत्पादनांचा वापर पावसाळ्यात टाळावा. कारण या हंगामात दह्यामध्ये जास्त प्रमाणात बॅक्टेरिया वाढतात. यामुळे पोटाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे पावसाळ्यात दही खाणे टाळण्याचा सल्ला दिला जातो.

मासे

पावसाळी हंगाम माशांसाठी प्रजनन काळ असतो. या हंगामात पाणी प्रदूषित होते आणि ही घाण माशांना चिकटते. ज्यामुळे अन्न विषबाधा होण्याचा धोका वाढू शकतो. अशा परिस्थितीत माशांचे सेवन आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

सलाड

सलाड आरोग्यासाठी फायदेशीर आहे. पण या हंगामात सलाड देखील खाणे टाळले पाहिजे. याशिवाय कापलेली फळे आणि भाज्या खाणे देखील आरोग्यासाठी हानिकारक आहे.

स्ट्रीट फूड

स्ट्रीट फूड आणि तळलेल्या गोष्टी पावसाळ्यात खाणे टाळावे. या हंगामात उघड्या भाज्या आणि फळे खाणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. म्हणूनच डॉक्टर स्ट्रीट फूड खाण्यापासून दूर राहण्याचा सल्ला देतात. या व्यतिरिक्त, या गोष्टी तुमच्या पचनसंस्थेचे कार्य कमी करतात. पावसात पकोडे, समोसे वगैरे खाणे टाळा. कारण या गोष्टी नीट पचत नाहीत, त्यामुळे पोटाशी संबंधित समस्या वाढू शकतात.

लाल मास

पावसाळ्यात पाचन प्रक्रिया मंदावते. ज्यामुळे डॉक्टर बाहेरच्या गोष्टी खाणे टाळण्याचा सल्ला देतात. या हंगामात मांसाहारी पदार्थ खाऊ नयेत.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Eating these 5 things during the rainy season is harmful to health)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.