AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weight Loss : इवलीशी आद्रकही तुमचं वजन घटवू शकते; कसे ते जाणून घ्या!

सर्दी आणि थंडीमध्ये आपण आहारात आद्रकाचा समावेश जास्त करतो. कोरोना काळातही रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आपण आहारात आद्रकचा समावेश करत आहोत.

Weight Loss : इवलीशी आद्रकही तुमचं वजन घटवू शकते; कसे ते जाणून घ्या!
वाढलेले वजन
| Edited By: | Updated on: Jul 01, 2021 | 3:13 PM
Share

मुंबई : थंडीमध्ये आपण आहारात आद्रकाचा समावेश जास्त करतो. कोरोना काळातही रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आपण आहारात आद्रकचा समावेश करत आहोत. मात्र, तुम्हाला हे माहिती आहे का? की, रोगप्रतिकारक शक्ती आणि सर्दीच कमी करण्यासाठी आद्रक फायदेशीर नसून आपले वाढलेले वजन कमी करण्यासाठी देखील आद्रक प्रचंड फायदेशीर आहे. (Ginger is beneficial for weight loss)

आद्रकमध्ये अँटिऑक्सिडेंट्स भरपूर प्रमाणात असतात, हे आपले पचन सुधारण्यासाठी कार्य करते. याव्यतिरिक्त, त्यात जळजळ कमी करण्याचे गुणधर्म देखील आहेत. आद्रकमध्ये पोटॅशियम, लोह, अँटी-ऑक्सिडंट्स, कॅल्शियम आणि जीवनसत्त्वे यासारखे गुणधर्म आहेत. आद्रकचे सेवन केल्याने आपल्याला बराच वेळ भूक लागत नाही आणि आपल्या शरीरावरील चरबी कमी होण्यास मदत होते.

1. जर आपल्याला वजन कमी करायचे असेल तर आपण आद्रक पाण्यात उकळण्यासाठी ठेवा आणि त्यामध्ये लिंबू पिळा आणि हे पाणी सकाळी उपाशी पोटी प्या. यामुळे शरीरात चयापचय योग्य होते आणि चरबी कमी होण्यास मदत होते.

2. आद्रकच्या पाण्यात अॅपल व्हिनेगर मिक्स करून प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते. यासाठी आद्रकचे छोटे छोटे तुकडे करा, ते पाण्यात थोडा वेल उकळू द्या. ते कोमट झाल्यावर त्यात अॅपल सायडर व्हिनेगर घालून प्या. लक्षात ठेवा, खूप गरम पाण्यात अॅपल सायडर व्हिनेगर घालू नका.

3. जर आपण ग्रीन टीमध्ये आद्रक मिक्स करून पिले तर ते अधिक फायदेशीर होईल. यासाठी ग्रीन टी ज्यावेळी आपण उकळण्यासाठी ठेवतो. त्यावेळी आपण त्यामध्ये आद्रक मिक्स केले पाहिजे. यामुळे झटपट वजन कमी होण्यास मदत होईल.

4. वजन कमी करण्यासाठी आद्रक, काकडी, जिरे आणि दालचिनीचे खास पेय घरी तयार करण्यासाठी सर्वात अगोदर दोन ग्लास पाणी घ्या. त्यामध्ये आद्रक, काकडी, जिरे आणि दालचिनी मिक्स करा आणि साधारण अर्धा तास ते पाणी उकळूद्या. त्यानंतर थोडे थंड झाल्यानंतर हे पाणी प्या.

5. वाढलेले वजन कमी करण्यासाठी आपण दररोज रिकाम्या पोटी लसूण, गूळ आणि आद्रकचे पाणी पिले पाहिजे. यामुळे आपले वजन कमी होण्यास मदत होते. यासाठी आपल्याला लसूणच्या सात ते आठ पाकळ्या, आद्रक आणि गूळ लागणार आहे. सर्वात अगोदर दोन ग्लास पाणी गॅसवर गरम करण्यासाठी ठेवा आणि त्यामध्ये लसूण आद्रक आणि गूळ मिक्स करा. हे पाणी उकळल्यानंतर गरम असतानाच प्या.

संबंधित बातम्या : 

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो

(Ginger is beneficial for weight loss)

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.