AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जेवणानंतर लगेच पाणी पिणे योग्य असते का ?

बऱ्याच लोकांना जेवताना किंवा जेवणानंतर लगेच पाणी पिण्याची सवय असते. पण हे योग्य आहे का ? जाणून घेऊया माहिती....

जेवणानंतर लगेच पाणी पिणे योग्य असते का ?
Image Credit source: freepik
| Updated on: Jul 31, 2023 | 4:40 PM
Share

नवी दिल्ली | 31 जुलै 2023 : पाणी पिणं (drinking water) आपल्या शरीरासाठी किती महत्वाचं आहे हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. पण जेवल्यानंतर लगेच पाणी पिणे योग्य (right or wrong) असते का ? हे योग्य आहे की नाही तेच जाणून घेऊया. तुम्ही काय खाल्लं आहे, त्यावर हे योग्य की अयोग्य, ते अवलंबून असतं. फळ व भाज्यांबद्दल सांगायच तर ते खाल्ल्यावर पाणी पिणं फायदेशीर ठरू शकत. फल व भाज्यांमध्ये फायबर जास्त असते, जे आपल्याला हायड्रेटेड ठेवण्यास आणि टॉक्सिन्स बाहेर काढण्यास मदत करतात.

भरपूर पाणी प्यायल्याने आपल्या पचनसंस्थेद्वारे संपूर्ण शरीरात फायबरची हालचाल होण्यास मदत होते. त्यामुळे जे अन्न खातो त्यातील पोषक तत्वं आपल्या शरीराला मिळतील हे निश्चित होते. पण पेरू, केळं, सफरचंद अशी काही फळ खाल्ल्यावर लगेच पाणी पिऊ नये.

स्टार्चयुक्त पदार्थ खाल्ल्यावर लगेच पाणी पिऊ नका

तर ब्रेड, पास्ता आणि बटाटे यांसारखे स्टार्चयुक्त पदार्थ खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिणे आरोग्यासाठी चांगले नसते. जेवताना खूप पाणी पिणे हेही अपचनसाठी कारणीभूत ठरू शकते. जे आरोग्यासाठी चांगले नसते.

जड व तिखट पदार्थ खाल्ल्यावर लगेच गार पाणी पिणे टाळा

जेवल्यानंतर लगेच थंड पाणी प्यायल्याने पचनक्रियेवरही घातक परिणाम होतात. थंड पाण्याने पचनसंस्थेला धक्का बसू शकतो. त्यामुळे पचन प्रक्रिया मंद होऊ शकते आणि त्यामुळे आपल्या शरीराला अन्नातून पोषक तत्वांचं पचन करणं कठीण होऊ शकत. त्यामुळे गार पाणी प्यायचं असेल तर ते जेवणानंतर अर्ध्या तासाने प्यावे.

जड पदार्थ खाल्ल्यावर हर्बल टी प्यावा

चांगले पचन व्हावे व हायड्रेटेडही रहावे, यासाठी उपाय शोधत असाल तर जेवणानंतर हर्बल टीचे सेवन करावे. आलं, पुदीना, व कॅमोमाईल सारख्या पदार्आथंनी बनलेला चहा पचनास मदत करतो आणि सूज कमी करण्यास फायदेशीर ठरतो. तुम्ही कितीही जड आणि मसालेदार पदार्थ खाल्लेत तरी, त्यानंतर गरमागरम हर्बल चहा प्यायला तर ते तुमचे शरीर आणि मन शांत राहते. तसेच यामुळे पचनक्रिया चांगली राहते आणि शरीरालाही विश्रांती मिळते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.