AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weekend Marriage : हम बने, तुम बने, इस वीकेंड के लिए… वाढतोय वीकेंड मॅरेजचा ट्रेंड, लग्न करूनही राहू शकता सिंगल..

जपानमधील लोकांचा असा विश्वास आहे की लग्न केल्यानंतर त्यांना पर्सनल स्पेस मिळत नाही. त्यामुळे वीकेंड मॅरेजचा ट्रेंड सुरू झाला. त्यामुळे दोन्ही जोडीदार आनंदी राहतात आणि त्यांच्यामधील प्रेमही वाढते.

Weekend Marriage : हम बने, तुम बने, इस वीकेंड के लिए... वाढतोय वीकेंड मॅरेजचा ट्रेंड, लग्न करूनही राहू शकता सिंगल..
Image Credit source: Freepik
| Updated on: Mar 16, 2023 | 2:11 PM
Share

टोकियो : लग्न (marriage) हे सात जन्मांचं बंधन असतं असं आपल्याकडे मानलं जातं. सप्तपदी घेतल्यानंतर त्या व्यक्ती सात जन्मांसाठी एकमेकांच्या होतात. एकत्र राहणं, खाणेपिणं, हिंडणे अशा सर्व गोष्टी एकमेकांच्या साथीनेच केल्या जातात. पण जपानमध्ये सध्या लग्नाचा असा ट्रेंड (new trend) सुरू आहे, ज्यामध्ये केवळ वीकेंडपुरतं (Weekend Marriage) हे लग्नाचं बंधन असतं. तेथे लग्नाचं बंधन फक्त शनिवार आणि रविवार पुरतं असतं. त्यानंतर आठवडाभर पती-पत्नी एकमेकांपासून पूर्णपणे वेगळे राहून आपलं-आपलं आयुष्य जगतात. सध्या हा ट्रेंड जपानमध्ये खूप लोकप्रिय होत आहे. या पद्धतीचा अवलंब करून जोडप्यांना सिंगल लाईफचाही आनंद घेता येतो.

वीकेंड मॅरेज म्हणजे नक्की काय ?

वीकेंड मॅरेज हे असं लग्न आहे, जे केवळ वीकेंडपर्यंत वैध असतो. यामध्ये लग्न झालेली ही जोडपी वीकेंडला एकमेकांसोबत राहतात आणि आठवड्याचे उरलेले दिवस ते एकमेकांपासून दूर राहतात, जसे ते लग्नापूर्वी राहत होते. लग्नानंतर पर्सनल स्पेस मिळत नाही, असा बऱ्याच लोकांचा समज आहे, याच पार्श्वभूमीवर वीकेंड मॅरेजचा ट्रेंड सुरू झाला. त्यामुळे दोन्ही जोडीदार आनंदी राहतात आणि जोडीदारांमध्ये प्रेमही वाढल्याचे दिसून येते.

ज्या लोकांचे जॉब प्रोफाइल एकमेकांपेक्षा वेगळे आहेत त्यांच्यासाठी वीकेंड मॅरेज हा एक चांगला पर्याय आहे. बहुतेकांचे कामाचे तास देखील एकमेकांसारखे नसतात आणि नोकरीचे ठिकाण देखील एकमेकांपासून दूर किंवा दुसर्‍या शहरात असते. अशी जोडपी आठवड्याच्या शेवटच्या दिवशी एकत्र राहून क्वॉलिटी टाईम स्पेंड करू शकतात.

वीकेंड मॅरेजचा फायदा काय ?

अनेकदा असे घडते की अनेक व्यक्तींची अथवा जोडप्यांची जीवनशैली एकमेकांपेक्षा खूप वेगळी असते. अशा परिस्थितीत जेव्हा दोघेही वेगवेगळे राहतात तेव्हा ते स्वतःच्या अटींवर आयुष्य जगू शकतात. याशिवाय वेगळे राहिल्याने भांडण होण्याची शक्यताही बऱ्याच अंशी कमी होते. कारण अनेकदा जोडपी एकत्र राहतात तेव्हा दोघेही एकमेकांचे दोष खूप जवळून पाहतात. अशा परिस्थितीत भांडणे आणि वाद सुरू होतात. परंतु वीकेंड मॅरेज या सर्व समस्या दूर करू शकते.

जपानमधील लोकांचा असा विश्वास आहे की वीकेंड मॅरेजमुळे ते त्यांच्या करिअरवर अधिक लक्ष केंद्रित करू शकतात आणि आठवड्याच्या शेवटी कौटुंबिक वेळ घालवून ते आठवड्याभरातील तणाव कमी करतात. याचा महिलांना अधिक फायदा होतो. महिला स्वतःसाठी वेळ काढू शकतात. घरचे टेन्शन टाळून नवऱ्याची काळजी घेऊन त्या स्वत:लाही वेळ देऊ शकतात.

लोकांचा असाही विश्वास आहे की जेव्हा तुम्ही बराच काळ दूर राहता आणि आठवड्यातून एकदा जवळ येता तेव्हा तुमच्याकडे एकमेकांना सांगण्यासाठी खूप काही असते. चांगल्या आणि वाईट दोन्ही गोष्टी शेअर करण्यास तुम्ही सक्षम असता. अशा प्रकारे राहिल्याने एकमेकांसोबत क्वॉलिटी टाईम एकत्र घालवता येतो. तसेच अशा प्रकारे एकमेकांची जवळीक अनुभवायला मिळते. नात्यात गोडवा वाढतो आणि बाँडिंगही मजबूत होते.

आजच्या युगात लोक खूप मुक्त विचारांचे आहेत. त्यामुळे घटस्फोटाच्या घटनांमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अनेक वेळा पती-पत्नीला एकमेकांची संगत आणि एकमेकांचा हस्तक्षेप आवडत नाही. अशा परिस्थितीत जपानचे लोक लग्न दीर्घकाळ टिकवण्यासाठी वीकेंड मॅरेजचा फंडा अवलंबत आहेत.

Follow Us
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?.
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह..
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह...
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी.
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला.
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?.
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?.
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप.
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?.
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले.
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा.