सावधान! लग्न होऊन कितीही वर्षे झाली तरी, होऊ शकतो घटस्फोट, का ते वाचा

सध्याच्या काळातील जोडीदारांचे असे मत आहे की, लग्नामुळे आयुष्यातील इतकी वर्षे वाया गेली, त्यामुळे आता वेळ वाया जाऊ द्यायचा नाही. त्यांची दुसरी कारणेही असू शकतात, ज्यामुळे त्यांचा घटस्फोट होतो. या सगळ्यांपेक्षा काही कारणे खूप वेगळी असतात.

सावधान! लग्न होऊन कितीही वर्षे झाली तरी, होऊ शकतो घटस्फोट, का ते वाचा
Divorce
Follow us
| Updated on: Jan 29, 2022 | 9:01 PM

मुंबईः आजच्या काळात विवाह झाल्यानंतर काही दिवसांनी घटस्फोट होणे ही खूप सामान्य गोष्ट झाली आहे. वैवाहिक (Marriage Life)आयुष्यात काही गोष्टी घटस्फोटाला (Divorce) कारणीभूत होतात. आताही आम्ही तिच कारणं सांगणार आहे जी घटस्फोटाला कारण ठरतात.

देशात घटस्फोटांचे प्रमाण वाढत असतानाच अभिनेता धनुष (Actor Dhanush) आणि ऐर्श्वया रजनीकांत यांचा लग्नाच्या 18 वर्षानंतर घटस्फोट झाला आहे. त्याच्या आधीही अमिर खान आणि किरण राव यांनीही विवाहाच्या प्रदीर्घ कालाखंडानंतर विभक्त होण्याचा निर्णय घेतला. बड्या नेत्या अभिनेत्यांसारखेच काही जोडपीही आता लग्नाला दहा-दहा वर्षे होऊनही घटस्फोट घेण्याचा निर्णय घेत आहेत. पूर्वीच्या काळी आपल्या मुलांचा विचार करून विभक्त होण्याच्या निर्णयापासून लोकं लांब होती, मात्र आता अशी परिस्थिती राहिली नाही.

सध्याच्या काळातील जोडीदारांचे असे मत आहे की, लग्नामुळे आयुष्यातील इतकी वर्षे वाया गेली, त्यामुळे आता वेळ वाया जाऊ द्यायचा नाही. त्यांची दुसरी कारणेही असू शकतात, ज्यामुळे त्यांचा घटस्फोट होतो. या सगळ्यांपेक्षा काही कारणे खूप वेगळी असतात, तिच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

एकमेकांना समजून न घेणे

नात्यात कटूता येणे आणि दुरावले जाणे यासाठी कारण असते ते एकमेकांना समजून न घेणे. लग्नानंतर तयार झालेल्या नात्यामध्ये एकमेकांना समजून घेण्यापेक्षा नात्यात एकाच गोष्टीवर वाद घालत राहणे हेच कारण नाते दुरावण्यात होते. नात्यातील वाद मिठवणे सोपे असते पण ते केले जात नाही. दोघे एका घरात असूनही मग ते दुभंगलेले असतात. नात्यात आपल्या जोडीदाराचे म्हणणे ऐकून घेऊन त्याला किंवा तिला काय म्हणायचे आहे ते समजून घ्या. शांत राहून समजून घेतले तर काही गोष्टींचा गैरसमज सहजपणे दूरही होऊ शकतो.

नात्यात अपेक्षांचे ओझे नको

विवाहानंतर काही दिवस जोडीदाराकडून कोणत्याही अपेक्षा ठेवल्या जात नाहीत. मात्र काही काळ गेला की, अपेक्षा वाढू लागतात. वैवाहिक आयुष्यात अपेक्षा पूर्ण झाल्या नाही तर नात्यात कटुता येण्यास सुरुवात होते. दोघांनी पूर्ण करण्याच्या गोष्टीही मग एकट्याला कराव्या लागतात. त्यामुळे प्रत्येक गोष्टीसाठी वेळ द्या, किती वेळ लागणार आणि त्या अपेक्षा कधी पूर्ण होतील याची सगळी माहिती आपल्या जोडीदाराला द्या.

नातेसंबंधात धोका देऊ नका

कोणत्याही जोडीदाराचे नाते संपते ते एकमेकांना दिलेल्या धोक्यामुळे. नात्यात धोका देणे हे कुणालाही आणि कोणत्याही नात्याला मान्य नसते. काही गोष्टींनी हे लक्षात आले आहे की,काही काही लोक लग्नानंतर कित्येक वर्षांनी तिसऱ्याच माणसाला जवळ करतात. म्हणजे आपण गोष्ट करतो आहे ती विवाहबाह्य संबंधांची. विवाहबाह्य संबंधाची माहिती आपल्या जोडीदाराला समजली तर घटस्फोट होण्याची शक्यता नाकारता येत नाही, मग त्या लग्नाला दहा वर्षे होऊ देत नाहीतर पंधरा वर्षे होऊ देत घटस्फोट हा होतोच.

संबंधित बातम्या

नथुराम गोडसेची भूमिका साकारणाऱ्या खासदार अमोल कोल्हेंचा आळंदीत आत्मक्लेश!

आई प्रचारसभेत सांगायची, मुंडेसाहेबांचं चिन्ह कमळ अन् ही आमची पंकजा, भाजपसोबतचं नातं असं सांगितलं पंकजांनी!

Mumbai Gold Return : तब्बल 22 वर्षांनंतर मिळवले चोरीचे सोने, मुंबई पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.