AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अती काळजी घेणे देखील जोडीदारासाठी ठरू शकते धोकादायक, नात्यात नेहमी ‘या’ 3 गोष्टी ठेवा लक्षात

नात्यात काही गोष्टींची काळजी घेणं खूप महत्वाचे असते. पण कधीतरी अती काळजी घेणे दोघांच्या नातेसंबंधात तडा जाण्याची शक्यता असते. यासाठी नाते टिकवण्यासाठी या तीन गोष्टी नेहमी लक्षात ठेवा.

अती काळजी घेणे देखील जोडीदारासाठी ठरू शकते धोकादायक, नात्यात नेहमी 'या' 3 गोष्टी ठेवा लक्षात
Relation (प्रातिनिधिक फोटो)Image Credit source: Tv9 Bharatvarsh
| Edited By: | Updated on: Jul 26, 2025 | 4:01 PM
Share

नातेसंबंधांमध्ये काही गोष्टींची काळजी घेणे खूप गरजेचं असतं पण कधीकधी हीच काळजी जोडीदारामध्ये दुरावा निर्माण करू शकते. तर तुमची काळजी तुमच्या जोडीदारासाठी प्रेमाऐवजी ओझे वाटत आहे का? असे होत असेल तर जास्त काळजी तुमचे नातं बिघडू शकते. अशा वेळेस नाते घट्ट होण्यासाठी कोणतीही अडचण येऊ नये यासाठी या 3 गोष्टी लक्षात ठेवा. अशाने दोघेही आयुष्यात आनंदी राहू शकाल.

जास्त काळजी घेण्याची चिन्हे

तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या प्रत्येक लहान-मोठ्या गोष्टीवर लक्ष ठेवता.

तुम्ही त्यांना सतत मेसेज किंवा कॉल करत राहता.

तुम्ही त्यांच्या मित्रांसोबत आणि कुटुंबासोबत घालवलेल्या वेळेवर बंधन घालण्याचा प्रयत्न करता.

तुम्ही त्यांच्या निर्णयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करता किंवा तुमची मते त्यांच्यावर लादता.

तसेच जोडीदाराला हवा असलेला एकांतपणा न देणे.

नात्यात नेहमी या ३ गोष्टी लक्षात ठेवा

वैयक्तिक जागा आणि स्वातंत्र्य द्या

प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या आयुष्यात काही वैयक्तिक जागा आणि स्वातंत्र्याची आवश्यकता असते. तुमच्या जोडीदाराला असे वाटू देऊ नका की तुम्ही त्यांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवत आहात. त्यांना त्यांच्या मित्रांना भेटण्याची, त्यांच्या आवडणाऱ्या गोष्टीं करणे आणि स्वतःचे निर्णय घेण्याची स्वातंत्र्य द्या. जेव्हा तुम्ही त्यांना जागा देता तेव्हा ते अधिक स्वतंत्र आणि आनंदी वाटतात आणि यामुळे नातेही मजबूत होते.

विश्वास हा नात्याचा पाया असतो

कोणत्याही नात्याचा पाया विश्वासावर आधारित असतो. तुम्ही जर तुमच्या जोडीदारावर प्रत्येक गोष्टीत शंका घेतली किंवा त्याच्या हेतूंवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले तर त्यामुळे नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. तुमच्या जोडीदारावर विश्वास ठेवा आणि त्यांना असे वाटू द्या की तुमचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. अनावश्यक प्रश्न विचारू नये. जिथे विश्वास असतो तिथे प्रेम फुलते.

संवाद आणि समज वाढवा

नात्यातील कोणताही गैरसमज किंवा समस्या दूर करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे मोकळेपणाने संवाद साधणे. तुमच्या जोडीदाराशी तुमच्या भावना शेअर करा आणि त्यांचे लक्षपूर्वक ऐका. जर तुम्हाला वाटत असेल की तुमची चिंता तुमच्या जोडीदाराला अस्वस्थ करत आहे, तर त्यांच्याशी थेट बोला. तुम्ही असे का करता ते त्यांना सांगा आणि त्यांची समस्या समजून घेण्याचा प्रयत्न करा. जेव्हा तुम्ही एकमेकांना समजून घेता तेव्हा नाते अधिक मजबूत होते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही.)

उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?
उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?.
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?.
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक.
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला.
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे..
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे...
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना.
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन.
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद.
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर.
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?.