AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अंघोळीच्या पाण्यात चिमुटभर मीठ टाकल्याने काय होतं, फायदे जाणून व्हाल थक्क

आजच्या धकाधकीच्या जीवनात थकवा कायम येत असतो. अशात अंघोळीच्या पाण्यात मीठ टाकल्याने आरम मिळू शकतो. अंघोळीच्या पाण्यात मीठ टाकल्याने धावपळीच्या जीवनातील तणाव कमी होऊ शकतो.

अंघोळीच्या पाण्यात चिमुटभर मीठ टाकल्याने काय होतं, फायदे जाणून व्हाल थक्क
| Updated on: Jun 07, 2026 | 2:20 PM
Share

आजच्या धकाधकीच्या जीवनात कमात आपण स्वतःकडे लक्षच देत नाही. अशात अनेक समस्या डोकंवर काढतात. पण काही घरगुती उपाय असे आहेत, ज्यामुळे तुम्हाला फायदा होऊ शकेल. रोजच्या अंघोळीच्या पाण्यात मीठ टाकल्यामुळे तुम्हाला आराम मिळेल. एखाद्या महागड्या स्पा किंवा पार्लरमधील उपचार घेण्या ऐवजी, घरातील मीठ गुणकारी ठरू शकतो. तुमच्या स्वयंपाकघरातील मीठ तुमच्या धावपळीच्या जीवनातील ताण कमी करू शकतो. आजच्या जीवनशैलीत, जिथे तणाव आणि प्रदूषण आपले रोजचे सोबती आहेत, तिथे अंघोळीच्या पाण्यात फक्त चिमूटभर मीठ घालणे हा तुमच्यासाठी सर्वोत्तम उपाय ठरू शकतो. ह

तुम्ही दिवसभर लॅपटॉपसमोर काम करत असाल किंवा शहरातील वाहतुकीत अडकलेले असाल, दिवसाच्या शेवटी स्नायू आखडणे किंवा दुखणे ही एक सामान्य समस्या आहे. कोमट पाण्याच्या आंघोळीत चिमूटभर मीठ विशेषतः सैंधव मीठ किंवा एप्सम सॉल्ट मिसळल्याने स्नायूंचा थकवा कमी होण्यास मदत होते. मिठातील मॅग्नेशियम आणि खनिजे त्वचेद्वारे शोषली जातात आणि स्नायूंना आराम देतात, ज्यामुळे त्वरित सर्व थकवा नाहीसा होतो.

दररोज, आपल्या नकळत त्वचेच्या छिद्रांमध्ये धूळ आणि विषारी द्रव्ये जमा होतात. खारं पाणी नैसर्गिक ‘डिटॉक्सिफायर’ म्हणून काम करते. ते त्वचेची छिद्रे उघडते आणि शरीरातील हानिकारक विषारी द्रव्ये बाहेर टाकण्यास मदत करते. परिणामी, शरीर आतून हलके आणि ताजेतवाने वाटते.

मिठाचे पाणी एक अतिशय सौम्य एक्सफोलिएटर म्हणून काम करते. अंघोळ करताना, हे पाणी त्वचेच्या पृष्ठभागावरील मृत पेशी हळुवारपणे काढून टाकते. परिणामी, त्वचा आतून मऊ, गुळगुळीत आणि तेजस्वी होते. ज्यांच्या पाठीवर किंवा खांद्यावर मुरुमे किंवा पुरळ आहेत, त्यांना मिठाच्या जिवाणू-विरोधी गुणधर्मांमुळे या पद्धतीचा खूप फायदा होईल.

पावसाळ्यात किंवा उन्हाळ्यात त्वचेची विविध ऍलर्जी, खाज किंवा बुरशीजन्य संसर्ग होणे ही एक सामान्य गोष्ट आहे. मीठ हे निसर्गाचे स्वतःचे जंतुनाशक आहे. अंघोळीच्या पाण्यात मीठ मिसळल्याने त्वचेच्या किरकोळ संसर्गामुळे, पुरळांमुळे किंवा खाजेमुळे होणारा त्रास कमी करण्यासाठी जादूसारखे काम करते. ते त्वचेला संरक्षित आणि जंतूमुक्त ठेवते.

चिंता आणि तणावामुळे तुम्हाला रात्री झोपायला त्रास होत असेल तर, आज रात्रीपासून तुमच्या अंघोळीच्या पाण्यात मीठ घालायला सुरुवात करा. मिठाच्या पाण्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण वाढते आणि नसा शांत होण्यास मदत होते. या अंघोळीमुळे तुमच्या शरीराला एक प्रकारची आरामदायी भावना मिळेल, ज्यामुळे मन शांत होईल आणि तुम्हाला गाढ, शांत झोप लागेल.

तुम्ही साधं मीठ वापरू शकता, पण सर्वोत्तम परिणामांसाठी खडे मीठ, समुद्री मीठ किंवा एप्सम सॉल्ट निवडणे उत्तम. पाणी खूप गरम नसावे; मीठ कोमट पाण्यात उत्तम काम करते. पण कोणतेही नवीन उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

Follow Us
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा टाकताच...
माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यू..
Video | माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यूचा थरार! पहा व्हिडीओ
नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
CJP Protest | नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली
व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले
Viral Video | व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले
संध्याकाळी 6 वाजता राहुल गांधींची खासदारांसोबत बैठक,
संध्याकाळी 6 वाजता बैठक, पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेरील आंदोलनानंतर कॉंग्रेसची पुढील रणनीती काय?
मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत
Suvrat Joshi | मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला समर्थन
मोठी बातमी! CJPच्या आंदोलनानंतर केंद्रात मोठ्या हालचाली, अमित शहा...
मोठी बातमी! CJPच्या आंदोलनानंतर केंद्रात मोठ्या हालचाली, अमित शहा घेणार लोकसभा अध्यक्षांची भेट
आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर
Assam Flood | आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर
एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल
Viral Video | एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल