AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्मृती-पलाश यांची लव्ह स्टोरी संपली, अशा घटनात जीवनात कसे पुढे जावे चला पाहूयात, या 5 टीप्स येतील कामी….

स्मृती आणि पलाश यांच्या लव्हस्टोरीचा अखेर शेवट झाल्याने त्यांचे चाहते देखील दु:खी झाले आहेत. या अशा नात्याच्या तुटण्याने मनुष्य आतून हादरणे स्वाभाविक आहे. परंतू जीवन हे येथे संपत नाहीय स्वत:वर विश्वास ठेवून यातून मार्ग काढवा लागतो. चला तर अशा घटनात स्वत:ला कसे सांभाळावे याच्या टीप्स पाहूयात...

स्मृती-पलाश यांची लव्ह स्टोरी संपली, अशा घटनात जीवनात कसे पुढे जावे चला पाहूयात, या 5 टीप्स येतील कामी....
After Breakup Tips
| Updated on: Dec 07, 2025 | 8:38 PM
Share

After Breakup Tips : भारतीय महिला क्रिकेट स्टार स्मृती मनधाना( Smriti Mandhana ) अखेर तिच्या पर्सनल लाईफवर सुरु असलेल्या अफवांवर विराम लावला आहे. खूपकाळ म्युझिक कंपोझर पलाश मुच्छल ( Palash Muchhal ) याच्यासोबत तिचा लग्न होणार असे म्हटले जात होते. ज्यावर आता स्मृती मनधाना हीने मौन तोडले आहे. तिने स्पष्टपणे सांगितले की आता त्यांचे बिनसले असून लग्न तुटल्यात जमा आहे. दोन्ही कुटुंबांनी सहमतीने हा निर्णय घेतल्याचे सांगितले. स्मृती -पलाश यांची लव्ह स्टोरी अशा प्रकारे संपल्याने त्यांच्या चाहत्यांनाही धक्का बसला आहे. वास्तविक जेव्हा कोणतेही नाते अचानक तुटते तेव्हा केवळ हृदय तुटत नाही तर त्याच्याशी जुळलेली स्वप्नं आणि आशाही विखुरल्या जातात.

Smriti Mandhana – Palash Muchhal

अशा संकटाच्या काळात स्वत:ला सांभाळणे कठीण आणि आव्हानात्मक असते. परंतू जीवन येथेच संपत नाही. हाच विचार, मजबूत इरादे आणि स्वत:वर भरोसा ठेवून माणसाला पुन्हा उभे रहावे लागते. या लेखात आपण पाहूयात…ब्रेकअप किंवा लग्न तुटण्यासारख्या दुर्देवी घटनात स्वत:ला कसे सांभाळावे. मनाला शांत कसे ठेवावे आणि हळूहळू जीवनात पुढे जाण्याची ताकद कमी जमवावी…

Smriti – Palash

लग्न तुटल्यानंतर स्वत:ला कसं सांभाळावे : ५ टीप्स तुमच्या कामी येतील

1. आपल्या भावनांचा स्वीकार करा

सर्वात पहिले आणि आवश्यक पाऊल हे आहे की आपल्या भावनांना ओळखणे. या दरम्यान नैराश्य, राग, एकटेपणा वा भीती वाटणे हे सर्व सामान्य आहे. तुम्ही ही आशा करुन लगेच यातून बाहेर याल. रडणे, लिहीणे आणि आपल्या मनातील दु:ख शेअर करणे की हीलिंगची पहिली पायरी आहे.

2. स्वत:ला वेळ द्या

प्रत्येक जखम भरायला वेळ लागत असतो. लग्न तुटल्यानंतर स्वत:ला लागलीच मजबूत दाखवण्याचा प्रयत्न करुन नये. स्वत:ला थोडा वेळ देणे गरजेचे आहे. हळूहळू तुम्ही स्वत:चांगले होऊ शकता.

3. आपल्या लोकांशी मोकळेपणे बोला

या कठीण प्रसंगी आपल्या कुटुंबिय आणि जवळचे मित्र मोठी ताकद बनू शकतात. आपल्या हृदयाची व्यथा एखाद्या विश्वासार्ह व्यक्तीजवळ व्यक्त केल्याने मन हलके होते. एकट्याने सर्वकाही सहन करण्याच्या ऐवजी मदत घेणे ही कमजोरी नाही तर समजदारी आहे.

4. आपल्या आरोग्याची काळजी घ्या

मेंटल हेल्थ सोबत तुम्ही तुमच्या फिजिकल आरोग्याची देखील काळजी घेणे गरजेचे असते. चांगली झोप घ्या, सकस आहार घ्या, रोज थोडे चालायला जात जा. हलका व्यायाम करा. योग आणि मेडिटेशन सारख्या एक्टीव्हीटी मनाला शांत करण्यास मदत करतात.

5. स्वत:ला पॉझिटीव्ह गोष्टीत गुंतवा

रिकामा वेळ डोक्यात जुन्या विचारांनी गोंधळ होऊ शकतो. त्यामुळे स्वत:ला बिझी ठेवणे गरजेचे असते. काही तरी नवीन छंद शिकावा, गाणी ऐकावीत. पुस्तके वाचावीत. एखाद्या क्रिएटीव्ह कामात स्वत:ला गुंतवावे. यामुळे हळूहळू मन शांत होते. आणि तुम्ही स्वत:ला जास्त स्ट्राँग अनुभवता. लक्षात ठेवा लग्न तुटणे किंवा ब्रेकअप होणे हा काही जीवनाचा शेवट नाही. काळानंतर दु:ख आपोआप हलके होते. आणि नव्या सुरुवातीचा मार्ग मोकळा होता. स्वत:वर विश्वास ठेवा, सर्वकाही ठीक होईल.

Follow Us
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना... तायवाडेंचा जरांगेंना संदेश
Babanrao Taywade | गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना त्रास होऊ नये! बबनराव तायवाडेंचा जरांगेंना थेट संदेश; ओबीसी आरक्षणावरही मोठं वक्तव्य
मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
Manoj Jarange Hunger Strike | मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
गणेशोत्सवासाठी कोकण जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन रवाना
पोलिसांनी अडवलंच तर... मुंबईत होणाऱ्या निर्णायक मराठा आंदोलनाबाबत...
पोलिसांनी अडवलंच तर...  मुंबईत होणाऱ्या मराठा आंदोलनाबाबत मनोज जरांगेंचा मोठा इशारा
गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी! कोकणवासीयांचा...
Ganeshotsav 2026 | गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी! माणगावात 7-8 किमी वाहनांच्या रांगा; कोकणवासीयांचा प्रवास रखडला
शतकाची परंपरा कायम! सांगलीत दोन दिवस आधीच विराजमान होतो चोर गणपती
शतकाची परंपरा कायम! सांगलीत दोन दिवस आधीच विराजमान होतो चोर गणपती
पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार, नंतर... जरांगेंनी जाहीर केला...
Manoj Jarange Patil | पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार, नंतर आझाद मैदानावर... जरांगे पाटलांनी जाहीर केला महामोर्चाचा मेगा प्लॅन