AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tourism | भारतातील ‘या’ पर्यटन स्थळांची परदेशी पाहुण्यांना पडते भुरळ, दरवर्षी हजारो पर्यटक देतात या ठिकाणांना भेट

जगात अशी अनेक पर्यटन स्थळे आहेत, जी त्यांच्या विविधतेसाठी तसेच जागतिक वारसा, ऐतिहासिक वास्तू आणि खास पर्यटन स्थळांसाठी प्रसिद्ध आहेत. मात्र, अनेकांना या पर्यटन स्थळांची माहिती नाही. भारतातही अशा अनेक जागा आहेत, ज्या परदेशी पर्यटकांसाठी आकर्षणाचा विषय ठरत आहेत.

Tourism | भारतातील 'या' पर्यटन स्थळांची परदेशी पाहुण्यांना पडते भुरळ, दरवर्षी हजारो पर्यटक देतात या ठिकाणांना भेट
Image Credit source: social media
| Edited By: | Updated on: Feb 22, 2024 | 1:20 PM
Share

Tourism | बाहेर फिरायला जाणं, विविध , नव्या जागा बघणं कोणाला आवडत नाही. बरेच जण असे असतात, जे वर्षभरात एकदा किंवा त्यापेक्षाही अधिक वेळेसे बाहेर फिरायला जातात. पर्यटनामुळे मन तर प्रेश होतंच, पण नव्या जागा, तिथली संस्कृतीही पहायला मिळते, ज्ञानात भर पडते ती तर वेगळीच. देशातील आणि परदेशातील पर्यटन स्थळांबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी आणि पर्यटकांना या तात्विक स्थळांकडे आकर्षित करण्याच्या उद्देशाने पर्यटन दिवसही साजरा केला जातो. अनेक प्रसिद्ध धार्मिक, नैसर्गिक आणि ऐतिहासिक पर्यटन स्थळे आहेत, ज्यांची माहिती उपलब्ध झाल्यास पर्यटनाला आणखी चालना मिळू शकेल. भारतातही अशी विविध पर्यटन स्थले, फिरण्याच्या अनेक जागा आहे, जेथे फक्त देशातीलच नव्हे तर परदेशातील व्यक्तीही आकर्षित होता. त्या जागा कोणत्या, ते जाणून घेऊया.

वाराणसी

उत्तर भारतातील वाराणसी हे शहर जगप्रसिद्ध आहे. देशातील प्रसिद्ध पर्यटन स्थळांमध्ये या शहराचा समावेश होतो. वाराणसी या शहराचे हिंदूंसाठी धार्मिक महत्त्व आहे. मात्र येथे सर्वाधिक विदेशी पर्यटक दिसतात. वाराणसी हे धर्म आणि अध्यात्माचे केंद्र आहे. गंगा नदीच्या काठी वसलेल्या या शहरामध्ये, 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले काशी विश्वनाथ धामही येथे आहे. काशीला ‘मंदिरांचे शहर’ असेही म्हणतात, कारण इथल्या प्रत्येक गल्लीत मंदिरे दिसतात.

आग्रा

जगातील सात आश्चर्यांपैकी एक आश्चर्य हे भारतात आहे. ते म्हणजे आग्र्यातील ताजमहाल, त्याला प्रेमाचं प्रतीक असेही संबोधलं जातं. युनेस्कोनेही त्याला आपल्या हेरिटेजमध्ये स्थान दिले आहे. ताजमहाल पाहण्यासाठी केवळ भारतीयच नव्हे, तर विदेशातून, दूरूनही अनेक पर्यटक येत असतात. ताजमहालचे सौंदर्य, त्याची ख्याती ही जगभरात पसरलेली आहे. पांढऱ्या संगमरवराने बनलेल्या या ताजमहालचे परदेशी पर्यटकांना प्रचंड आकर्षण आहे. ताजमहाल व्यतिरिक्त, ताज संग्रहालय, इतिमाद-उद-दौला, अकबराचा मकबरा आणि आग्रा येथील लाल किल्ला ही प्रसिद्ध ठिकाणे पाहण्यासाठी पर्यटक उत्सुक असतात.

जयपूर

राजस्थानमधील बहुतेक शहरे ही पर्यटनस्थळे आहेत. जयपूरपासून उदयपूरपर्यंत आणि जैसलमेरपासून अजमेरपर्यंत अनेक किल्ले, राजवाडे आणि धार्मिक स्थळे येथे आहेत, जे पाहण्यासाठी केवळ भारतातूनच नव्हे तर परदेशातूनही हजारो लोक येतात. जयपूरमध्ये तुम्ही हवा महल, अंबर पॅलेस, सिटी पॅलेस, जंतर मंतर, नाहरगढ किल्ला आणि जयपूर किल्ला पाहू शकता. येथे भारतीय संस्कृती आणि इतिहासाचा अद्भुत संगम अनुभवता येतो.

गोवा

भारतात सर्वाधिक परदेशी पर्यटक कुठे येतात, असं जर कोणी विचारलं तर त्याचं उत्तर आहे गोवा. सर्वाधिक पर्यटकांची गोव्याला प्रचंड पसंती असते. गोवा हे भारतातील सर्वाधिक प्रसिद्ध पर्यटनस्थळांपैकी एक आहे. गोव्याला देशाचं फन कॅपिटलही म्हणता येऊ शकतं. केवळ भारतातूनच नव्हे तर जगभरातील इतर, अनेक देशांतूनही अनेक पर्यटक, गोव्यात मजा, मस्ती करण्यासाठी, सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी आवर्जून येतात. गोव्यातील बीचेस, नाईट पार्टी, क्रूज पार्टी अशा विविध गोष्टी, पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्र बिंदू ठरत आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.