AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘का रे दुरावा का रे अबोला’… नात्यांमधील तणाव असा करा दूर..

अनेक वेळा असे प्रसंग येतात की ज्यांचा दूरगामी परिणाम हा नात्यांमध्ये होत असतो. वेळप्रसंगी यामुळे दोन व्यक्तींना कायमचा दुरावादेखील सहन करावा लागत असतो. परंतु हे आपोआप होत नाही. याची लक्षणे दोघांच्या नात्यांमध्ये हळूहळू दिसून येत असतात.

‘का रे दुरावा का रे अबोला’... नात्यांमधील तणाव असा करा दूर..
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Jan 31, 2022 | 4:22 PM
Share

मुंबई : गेल्या काही वर्षांमध्ये नातेसंबंधांमध्ये (Relationship) आलेल्या तणावामुळे (Depression) ब्रेकअप होण्याच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. दोन व्यक्तींमधील मतभेद इतके टोकाला जातात की त्यातून त्यांना एकत्र राहणे शक्यच होत नसते. नात्यातील या ताणाला वेळीच आवर घालता आला पाहिजे. नात्यांमधील दुराव्याची लक्षणे (Symptoms) वेळीच ओळखल्यास त्यावर उपाय योजना करणेही सोपे जात असते. अनेक जोडपी आपल्यातील वाद सोडविण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेतात. संवाद हरपला की नात्यात दुरावा निर्माण होणे साहजिकच असते. त्यामुळे संवाद हा दोन नाते टिकवण्यासाठी महत्त्वाचा दुवा आहे. दुरावा किंवा नाराजी यामुळे काही वेळा नात्यातील वातावरण इतके बिघडते की जोडीदारांना वेगळे व्हावे लागते. नात्यातील समस्यांमुळे काही वेळा लोकांना नैराश्य येऊ लागते. ते वेगळ्या पद्धतीने वागू लागतात, ज्यामुळे त्यांना त्यांच्या प्रियजनांपासून वेगळे करणे सुरू होते. या लेखात अशाच काही लक्षणांची माहिती देणार आहोत. यासोबतच आम्ही तुम्हाला अशा उपायांबद्दल सांगणार आहोत, ज्यांच्या मदतीने नातेसंबंधही सुधारता येतील.

एकमेकांना समजून घ्या

अनेक वेळा आपल्या जोडीदाराचे म्हणणे समजून घेण्यास आपण कुठेतरी कमी पडत असतो. अनेक वेळा यातून गैरसमज निर्माण होतात. परिणामी दोन नात्यांमध्ये दुरावा व अबोला निर्माण होत असतो. यावरून वेळप्रसंगी दोघांमध्ये भांडणे निर्माण होत असतात. जोडीदाराला समजून घेण्याऐवजी नैराश्याने ग्रासलेली व्यक्ती त्याच्याशी भांडत राहते. या वेळी विषय अधिक न ताणता जोडीदाराचे ऐका आणि त्याला काय म्हणायचे आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करा.

अवास्तव अपेक्षा टाळा

एखादी इच्छा वा अपेक्षा ठेवणे व ती पूर्ण न झाल्यावर नाराजी व्यक्त करणे हा मानवी स्वभाव आहे. परंतु अपेक्षांचे ओझे वाढत गेल्यास दोन व्यक्तींमध्ये तणाव निर्माण होत असतो. अशा वेळी जास्त अपेक्षा न ठेवता वास्तवतावादी राहणे महत्त्वाचे असते. ज्या अपेक्षा ठेवायच्या त्या वाजवी असल्या पाहिजे. अपेक्षा पूर्ण न झाल्यास नाराज न होता समोरची परिस्थिती समजून घेतली पाहिजे.

संवाद साधा

नैराश्यामुळे नात्यातील जोडीदारालाही एकटेपणा जाणवू लागतो. आपल्यासोबत कुणीही नाही आपण या जगात एकटे पडलो असल्याची भावना त्याच्यात निर्माण होत असते. अशा वेळी संवाद हा महत्त्वाची भूमिका निभावत असतो. त्यामुळे आपल्या जोडीदारासोबत जास्तीत जास्त वेळ घालवा, त्याच्याशी संवाद साधा यातून त्याचे मन हलके होईल. सोबतच तुमच्याबद्दल त्याचे नाते अधिक घट्ट होण्यास मदत मिळेल.

सकारात्मक राहा

आपल्या सभोवताली अनेक नकारात्मक गोष्टी घडत असतात. त्याचा परिणाम दोघांच्या नात्यावरही होत असतो. अशा वेळी नेहमी सकारात्मक राहणे महत्वाचे असते. सकारात्मक उर्जा निर्माण झाल्यास नात्यातील दुरावा कमी होतो. त्यामुळे एकमेकांशी बोलतानाही नेहमी सकारात्मक विषयांवरच चर्चा केली पाहिजे. नकारात्मक गोष्टी आपल्या बोलण्यातून टाळल्या पाहिजे.

संबंधित बातम्या :

चेहऱ्यावरील ग्लो हरवलाय? चंदनापासून तयार फेसपॅक ठरेल परिणामकारक, काळे डागही जातील

Beauty tips : कांद्याचा रस त्वचेला लावा आणि या समस्या दूर ठेवा, वाचा महत्वाची माहीती!

Travel Ideas : शिमलामध्ये फिरण्यासाठी जात आहात? मग ‘ही’ खास बातमी वाचाच!

Follow Us
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...