AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंजाबला गेलात तर सुवर्ण मंदिरासोबतच ‘या’ जागांनाही नक्की भेट द्या

पंजाब म्हणजे फक्त मोहरीची शेती आणि भांगडा नृत्य नाही. हे राज्य इतिहास, संस्कृती आणि सौंदर्याचे एक अनोखे मिश्रण आहे. इथे अशी ८ खास ठिकाणे आहेत, जिथे फिरण्यासाठी परदेशी पर्यटकही आतुर असतात.

पंजाबला गेलात तर सुवर्ण मंदिरासोबतच 'या' जागांनाही नक्की भेट द्या
This 8 Places in Punjab Every Tourist Must visitImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Sep 01, 2025 | 12:52 PM
Share

पंजाब म्हटलं की डोळ्यासमोर मोहरीची शेते, गिद्दा आणि भांगडा नृत्य उभं राहतं. पण पंजाब म्हणजे फक्त इतकंच नाही. पंजाब हे इतिहास, संस्कृती, धर्म आणि निसर्गाचे एक अद्भुत मिश्रण आहे. या राज्याच्या सौंदर्यामुळे इथे एकदा आलेला माणूस पुन्हा-पुन्हा येण्याची इच्छा ठेवतो. तर आज आपण पंजाबमधील अशा 8 ठिकाणांबद्दल जाणून घेऊया, जिथे फिरण्यासाठी परदेशी पर्यटकही आतुर असतात.

1. सुवर्ण मंदिर, अमृतसर (Golden Temple, Amritsar)

सुवर्ण मंदिर हे केवळ शिखांचे प्रमुख तीर्थस्थळ नाही, तर जगातील सर्वात शांत आणि आध्यात्मिक ठिकाणांपैकी एक आहे. येथील पवित्र सरोवर, संगमरवरी वास्तुकला आणि २४ तास चालणारे लंगर (मोफत भोजन) जगभरातील पर्यटकांना आकर्षित करतात.

2. वाघा बॉर्डर, अमृतसर (Wagah Border, Amritsar)

भारत-पाकिस्तान सीमेवर होणारी ‘बीटिंग रिट्रीट सेरेमनी’ एक रोमांचकारी अनुभव आहे. देशभक्तीचा जोश, गर्दी आणि सैनिकांची गर्वाने भरलेली चाल परदेशी पर्यटकांनाही भारावून टाकते.

3. आनंदपूर साहिब (Anandpur Sahib)

पंजाबच्या रूपनगर जिल्ह्यात असलेले हे ठिकाण शिख धर्माचे जन्मस्थान मानले जाते. तख्त श्री केसगढ साहिब आणि वार्षिक ‘होला मोहल्ला’ सण इथे खूप प्रसिद्ध आहे. इथे होणारे घोडेस्वारी आणि मार्शल आर्टचे थेट प्रदर्शन परदेशी पर्यटकांना आकर्षित करते.

4. पटियाला (Patiala)

पटियालाची राजेशाही परंपरा, रंगीत बाजार आणि संगीताची परंपरा पर्यटकांना वेगळा अनुभव देतात. इथला किला मुबारक आणि बरदारी गार्डन पाहण्यासारखे आहेत. पटियाला सूट आणि पटियाला पेगसारखे शब्द इथूनच लोकप्रिय झाले आहेत.

5. रूपनगर (Rupnagar)

या शहराला आधी ‘रोपड’ म्हणून ओळखले जायचे. हे शहर सिंधू संस्कृतीचे (Indus Valley Civilization) एक महत्त्वाचे केंद्र आहे. इथलं रोपड पुरातत्व संग्रहालय आणि सतलज नदीचा किनारा पक्षीप्रेमींसाठी स्वर्ग मानला जातो.

6. जलियानवाला बाग, अमृतसर (Jallianwala Bagh, Amritsar)

1919 सालच्या भीषण हत्याकांडाची आठवण करून देणारी ही जागा आहे. इथल्या भिंतीवर आजही गोळ्यांच्या खुणा पाहायला मिळतात. भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाचा संघर्ष आणि भावना अनुभवण्यासाठी परदेशी पर्यटक इथे नक्की भेट देतात.

7. कपूरथला (Kapurthala)

कपूरथला त्याच्या फ्रेंच वास्तुकलेसाठी आणि राजेशाही इतिहासासाठी प्रसिद्ध आहे. जगजीत पॅलेस आणि एलिसी पॅलेस ही येथील प्रमुख आकर्षणे आहेत. युरोपियन शैलीतील राजवाड्यांमुळे याला ‘पंजाबचे पॅरिस’ असेही म्हणतात.

8. फतेहगड साहिब (Fatehgarh Sahib)

गुरु गोबिंद सिंग यांच्या मुलांनी बलिदान दिलेल्या ठिकाणांपैकी हे एक आहे. येथील गुरुद्वारा फतेहगड साहिब हे केवळ शिखांसाठीच नाही, तर प्रत्येक संवेदनशील व्यक्तीसाठी एक भावनिक स्थान आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.