AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उन्हाळ्यातील हे पेय कोणत्या अमृतापेक्षा कमी नाही, आहारात समावेश केल्यास उष्माघातापासून होईल बचाव

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये उष्मघातापासून बचाव व्हावा यासाठी अनेकजण आहारात पाण्याची कमतरता भरून काढणारे पदार्थांचे सेवन करतात. मात्र तुम्ही जर या पेयांचे सेवन केल्यास तुम्हाला उष्मघात तसेच अनेक आजारांपासून दुर राहाल. चला तर मग या पेयाबद्दल जाणून घेऊयात.

उन्हाळ्यातील हे पेय कोणत्या अमृतापेक्षा कमी नाही, आहारात समावेश केल्यास उष्माघातापासून होईल बचाव
| Edited By: | Updated on: Mar 28, 2026 | 1:47 PM
Share

कडक उन्हाळ्यात शरीराला थंडावा आणि ऊर्जा देण्यासाठी अनेक घरगूती पेयं लोकप्रिय आहेत, पण त्यापैकी सर्वात फायदेशीर आणि पौष्टिक पेय म्हणजे सत्तू सरबत. उन्हाळ्यात सत्तू पेयाला वरदान मानले जाते, कारण ते केवळ शरीराला हायड्रेटेड ठेवत नाही, तर पोषक तत्वांनीही परिपूर्ण आहे. चला जाणून घेऊया की उन्हाळ्यात सत्तू सरबत प्यायल्याने कोणते फायदे शरीराला होतात ते जाणून घेऊयात.

उन्हाळ्यात रोज सत्तू प्यायल्यास काय होते?

सत्तू हा एक पारंपरिक भारतीय घरगूती पेय आहे, जो उन्हाळ्यात शरीराला ताजेपणा आणि आरोग्यदायी फायदे देतो. तो चवीला चविष्ट असण्यासोबतच आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीरही आहे. सत्तू सरबत शरीराला थंडावा, ऊर्जा आणि आवश्यक पोषक तत्वे पुरवतो, ज्यामुळे हा सरबत सर्व वयोगटातील लोकांसाठी योग्य ठरतो. आयुर्वेदानुसार, दररोज सत्तूचे सेवन केल्याने शरीर आतून मजबूत होते आणि उष्माघातामुळे येणारा थकवा दूर होण्यास मदत होते.

पोटाच्या समस्या कमी करण्यासाठी सत्तू फायदेशीर आहे का?

नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या एका अहवालानुसार सत्तू सरबतामध्ये शीत गुणधर्म आहेत. त्यात फायबरचे प्रमाण जास्त असून ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, ज्यामुळे पचनक्रिया सुधारते. फायबर आतड्यांची हालचाल नियमित करण्यास, कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि निरोगी पचनसंस्था राखण्यास मदत करते.

त्यासोबतच सत्तूमध्ये प्रथिने, फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात. ज्यामुळे शरीराला थंडावा मिळतो. उन्हाळ्याच्या उष्णतेत घाम आल्याने शरीरातील पाणी आणि इलेक्ट्रोलाइट्स कमी होतात. तेव्हा सत्तू सरबत प्यायल्याने तहान भागली जाते आणि शरीराला ऊर्जा मिळते. तसेच तुमची पचनक्रिया देखील मजबूत करते आणि वजन नियंत्रणात राहते.

सत्तू केव्हा आणि कसा खावा?

सत्तू अनेक प्रकारे खाल्ला आणि प्यायला जातो. उन्हाळ्यात त्याचे थंड सरबत खूप लोकप्रिय आहे. मीठ, लिंबू, जिरेपूड किंवा गूळ वापरून बनवलेले हे सरबत केवळ चविष्टच नाही, तर उन्हापासून संरक्षणही देते.

सत्तू सरबत या लोकांसाठी आहे अत्यंत फायदेशीर

सत्तूमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते, जे आतड्यांचे आरोग्य सुधारते आणि बद्धकोष्ठता व आम्लपित्तासारख्या समस्यांपासून आराम देते. ते रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करते आणि रक्तदाब संतुलित ठेवण्यास मदत करते. कोलेस्ट्रॉलच्या समस्येने त्रस्त असलेल्यांसाठीही सत्तू सरबत पिणे फायदेशीर आहे.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.
शहरातही आता चुलींना मागणी वाढली, गॅस सिलिंडर टंचाईवर शोधला उपाय
शहरातही आता चुलींना मागणी वाढली, गॅस सिलिंडर टंचाईवर शोधला उपाय.
खरातवर आणखी दोन गुन्हे दाखल, एकूण गुन्ह्यांची संख्या १०, हवाला रॅकेट..
खरातवर आणखी दोन गुन्हे दाखल, एकूण गुन्ह्यांची संख्या १०, हवाला रॅकेट...
रुपाली चाकणकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार ? काय म्हणाल्या अंधारे?
रुपाली चाकणकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार ? काय म्हणाल्या अंधारे?.
'ऑल पार्टी मिटींगला जे उपस्थित नाहीत ते...', राऊत यांची मोदींवर टीका
'ऑल पार्टी मिटींगला जे उपस्थित नाहीत ते...', राऊत यांची मोदींवर टीका.
रत्नागिरीत अवकाळी पावसाचा आंब्यांना फटका, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
रत्नागिरीत अवकाळी पावसाचा आंब्यांना फटका, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान.
'कर्माचे फळ...,' चाकणकरांच्या राजीनाम्यावर दमानिया यांची प्रतिक्रीया
'कर्माचे फळ...,' चाकणकरांच्या राजीनाम्यावर दमानिया यांची प्रतिक्रीया.
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही.
बुलढाण्यात इंधन टंचाई; एकाच पंपावर गर्दी, अफवांमुळे तुटवडा वाढला?
बुलढाण्यात इंधन टंचाई; एकाच पंपावर गर्दी, अफवांमुळे तुटवडा वाढला?.