AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वयाच्या तिशीतच फिरून घ्या, ‘या’ 10 ठिकाणी नाही गेला तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल

या लेखात 30 वर्षांच्या आत भारतीय तरुणांनी नक्कीच भेट द्यावी अशी 10 आकर्षक पर्यटन स्थळे सांगितली आहेत. गोवा, अंदमान-निकोबार, सोलंग, कसोल, कुर्ग, सिक्कीम, लेह-लद्दाख, श्रीनगर, केरळ आणि ऋषिकेश या ठिकाणी भेट दिल्यास तरुणांना आयुष्याचा वेगळाच अनुभव मिळेल. प्रत्येक ठिकाणाची वैशिष्ट्ये आणि आकर्षण या लेखात सविस्तरपणे वर्णन करण्यात आली आहेत.

वयाच्या तिशीतच फिरून घ्या, 'या' 10 ठिकाणी नाही गेला तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल
पर्यटन स्थळ
| Edited By: | Updated on: Jan 02, 2025 | 4:32 PM
Share

साधारणपणे कमी वयात खूप फिरण्याची अनेकांना आवड असते. ज्याला फिरायला आवडत नाही असा जगातील एखादाच विरळा असेल. वयाच्या 20 आणि 30 व्या वर्षात व्यक्ती अनेक गोष्टीतून जात असतो. सर्वात कमी वयात तो अधिक प्रवास करत असतो. खरं तर फिरल्याशिवाय जग दिसत नाही. आपण स्वत:मध्ये बदल घडून आणू शकत नाही. फिरण्याने दृष्टी येते. जगाकडे पाहण्याचा नवा दृष्टीकोण येतो. त्यामुळे आयुष्य समृद्ध बनतं. परिक्वता येते. आणि काही तरी जिद्द करण्याची उर्मी निर्माण होते. वयाच्या तिशीच्या आतच खूप फिरलं पाहिजे. शिक्षण घेत असतानाच फिरून जीवनाचा अनुभव घेतला पाहिजे. याचा अर्थ जगात फिरायला गेले पाहिजे असं नाही. आपल्या देशातही अशी काही ठिकाणं आहेत की तिकडे फिरल्यावर तुम्हाला जीवनाचा समृद्ध अनुभव मिळेल. ही ठिकाणं कोणती? कोणत्या 10 ठिकाणी गेलं पाहिजे? यावरच आपण चर्चा करणार आहोत.

गोवा

एकदा गोवा पाहूनच या राव. वयाच्या 30 व्या वर्षाच्या आत गोव्याची टूर करा. गोव्याच्या नाईट लाइफचा एक वेगळाच आनंद आहे. गोव्यासारखी नाईट लाइफ जगातील कोणत्याच देशात शोधूनही सापडणार नाही. बीच, चहुबाजूने अथांग पसरलेला समुद्र यंगस्टरला आकर्षित करणार नाही तर नवलच.

अंदमान-निकोबार

वयाच्या 20-30 मध्ये अंदमान-निकोबारला फिरून या. अत्यंत प्रसिद्ध असं हे पर्यटन स्थळ आहे. ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचं आहे. या ठिकाणी दरवर्षी हजारो पर्यटक येतात. हिरवळ, सुंदर बेट पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र आहे.

सोलंग

साहसी गोष्टी करण्याची आवड असणाऱ्यांसाठी सोलंग ही अप्रतिम जागा आहे. या ठिकाणचं सौंदर्य मनाला मोहून नेतं. नोव्हेंबर ते फेब्रुवारीपर्यंत सोलंगमध्ये बर्फाची चादर असते. त्यामुळे या ठिकाणी वयाच्या तिशीत आल्यावर तुम्हाला वेगळ आनंद अनुभवता येणार आहे.

कसोल

वयाच्या तिशीतच एकदा कसोलला याच. हे एक अप्रतिम पर्यटन स्थळ आहे. या ठिकाणी कॅपिंग आणि ट्रॅकिंगचा मोठा आनंद घेऊ शकता. कसोलटचे खीरगंगा ट्रॅक, मलना ट्रॅक, तोष गाव, रिव्हर पार्वती फिरण्यासाठी सर्वात बेस्ट स्थळं आहेत.

कुर्ग

कुर्गमधील अब्बे फॉल, बेरा फॉल रिव्हर, नल्कनाद पॅलेस, ब्रह्मागिरी पीक, नामद्रोलिंग मोनेस्ट्री, इरुप्पू फॉल आणि रिव्हर कावेरी आदी स्थळं फिरण्यासाठी बेस्ट आहेत. या ठिकाणी तुम्ही तुमच्या मित्रांसोबत क्वालिटी टाइम घालवू शकता.

सिक्कीम

सिक्कीमचं सौंदर्य सर्वांनाच मोहून टाकतं. या ठिकाणी दर वर्षी लाखो पर्यटक येतात. सिक्कीम भारतातील सर्वात सुंदर हिल स्टेशन आहे. या ठिकाणी वयाच्या तिशीच्या आतच जरूर या.

लेह-लड्डाख

फिरण्याची आवड असणाऱ्यांसाठी लेह- लड्डाख हे सर्वात बेस्ट टुरिस्ट डेस्टिनेशन आहे. तरुणाईमध्ये हे हिल स्टेशन सर्वात लोकप्रिय आहे. जंस्कार व्हॅली, खरदूंग, ला -पास, हेमिस नॅशनल पार्क आणि स्पीतुक गोम्पा आदी ठिकाणी जाणं एक पर्वणीच असते.

श्रीनगर

श्रीनगरला पृथ्वीवरील स्वर्ग म्हटलं जातं. उन्हाळ्यात या ठिकाणी फिरणं अत्यंत चांगलं मानलं जातं. या ठिकाणीच डल खोरे, शालीमार बाग, निशात बाग, जामा मशीद, जेन उल आबिदीन मकबरा, शंकराचार्य हिल आणि हजरतबल मशीद पाहून तुमचं मन भरून येईल. त्यामुळे या ठिकाणी आवश्य जा.

केरल

केरळ भारतातील सर्वात सुंदर जागा आहे. टुरिस्ट डेस्टिनेशनपैकी ही एक जागा आहे. केरळला देवाची भूमीही म्हटलं जातं. या ठिकाणचं सौंदर्य प्रत्येकाला मोहून टाकतं. केरळच्या आप एलेप्पी, मुन्नर, वयानंद, कुमाराकोम, कोवालम बीच, बेकल किला, वरकला बीच, कोजीकोड आणि थेक्कडी आदी ठिकाणी तुम्ही फिरू शकता.

ऋषिकेश

उत्तराखंडातील ऋषिकेश हे अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. हे एक प्रसिद्ध ठिकाण आहे. तरुणाईमध्ये ऋषिकेश फेमस आहे. तुम्हाला अॅडव्हेंचर करायचं असेल ट्रॅकिंग आणि राफ्टिंग करायचं असेल तर ऋषिकेशला जायला हवं.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.