AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मधुमेह नियंत्रित करण्यासाठी हे सोपे घरगुती उपाय माहितीय का?

मधुमेह नियंत्रित ठेवणे हे आजचे सर्वात मोठे आव्हान आहे. आपल्या आजूबाजूला काही असे घटक आहेत, जे मधुमेह म्हणजेच रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास आपल्याला मोलाची मदत करीत असतात. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी तुम्ही या पदार्थांचा आहारातही समावेश करू शकता.

मधुमेह नियंत्रित करण्यासाठी हे सोपे घरगुती उपाय माहितीय का?
डायबेटिसचा धोका वेळीच ओळखा!
| Updated on: Feb 10, 2022 | 10:55 AM
Share

मुंबईजगाचा विचार केल्यास भारतात मधुमेहींची संख्या सर्वाधिक आहे. धावपळीचे जीवन, आहारातील असमतोल, व्यसन, ताण-तणाव, अनुवांशिकता असे अनेक घटक मधुमेहासाठी (diabetes) कारणीभूत ठरत असतात. अनेकांची रक्तातील साखरेची पातळी इतकी वाढते की ती नियंत्रित (control) करण्यासाठी कसोशिने प्रयत्न करावे लागतात. मधुमेहातून अनेक आजार निर्माण होत असतात. बहुतेक लोक मधुमेहाशी झुंज देत आहेत. मधुमेह असला की, रक्तातील साखरेची पातळी लक्षणीय वाढते. अ‍ॅलोपॅथी उपचारासोबतच काही घरगुती उपायांचा अवलंब करून रक्तातील साखरेची (blood sugar) पातळी नियंत्रित करू शकता. अशा परिस्थितीत आपल्या आहाराची काळजी घेणेदेखील खूप महत्वाचे आहे. तुम्ही तुमच्या आहारात अशा पदार्थांचा समावेश करू शकता ज्यामुळे साखर नियंत्रित राहण्यास मदत होईल. मधुमेहाच्या रुग्णांनी कोणता आहार घ्यावा याबाबत संभ्रम असतो. आपल्या रोजच्या आहारात मेथीचे दाणे, आवळा ज्यूस आणि कारल्याचा रस समाविष्ट केल्यास यातनू मधुमेह नियंत्रित राहण्यास मदत होत असते.

मेथीचे दाणे

मेथीमुळे मधुमेहाच्या रुग्णांमध्ये रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते. एक चमचा मेथी पावडर सकाळी रिकाम्या पोटी घ्या. या पावडरचे दररोज कोमट पाण्यासोबत सेवन करा. मेथीमध्ये फायबर असते जे पचनास मदत करते. तसेच कार्बोहायड्रेट्स आणि साखरेचे प्रमाण संतुलित करण्यास मदत करते.

दालचिनी

दालचिनी हा घटक प्रामुख्याने मसाल्यांमध्ये वापरला जात असतो. दालचिनीमुळे रक्तातील ग्लुकोज वाढण्यासही प्रतिबंध बसतो. दालचिनीमध्ये एक बायोएक्टिव्ह घटक असतो जो शरीरातील इन्सुलिन क्रियाकलापांचे नियमन करतो. एक चमचा दालचिनी पावडर कोमट पाण्यात मिसळून दिवसातून एकदा सेवन करा. दालचिनी पाण्यात उकळूनही तिचा आहारात समावेश करु शकतात.

आवळ्याचा रस

मधुमेहावर नियंत्रण मिळवण्यासाठी आवळ्याचा वापर फार पूर्वीपासून करण्यात आला आहे. त्यात क्रोमियम नावाचे खनिज असते जे कार्बोहायड्रेट्स नियंत्रित करण्यास मदत करते तसेच इन्सुलिनला पातळीसाठीही ते पोषक असते. २ चमचे आवळ्याचा रस एका ग्लास पाण्यात मिसळून सकाळी प्यावा. यात आपण चिमूटभर हळददेखील घालू शकता. लिंबू, संत्री आणि टोमॅटो यांसारखे इतर व्हिटॅमिन सी समृद्ध पदार्थ देखील मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरू शकतात.

कारल्याचा रस

अनेकांना कारल्याचा रस पिणे अवघड जावू शकते, परंतु मधुमेहाच्या रुग्णांसाठी हा एक चमत्कारी उपाय ठरू शकतो. कारल्याचा रस काकडी किंवा सफरचंदच्‍या ज्यूसमध्‍ये मिसळून त्याचा वापर करु शकतात. यातून त्याची चव थोडी चांगली होईल. कारल्याचा रस रोज प्यायल्याने शरीरातील ग्लुकोजची पातळी प्रभावीपणे नियंत्रित राहते.

संबंधीत बातम्या :

एका काळी “सोने की चिड़िया” होता भारत देश, काय कारण होते असे म्हणण्या मागे, जाणून घेवूया यामागील सत्य!

हिजाब आणि बुरखा यांच्यात काय फरक आहे? मराठी मुली पण हिजाब घालतात? खरंच?

अक्कल दाढ आल्यावर खरंच अक्कल येते? अक्कल दाढेच्या इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घ्या!

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.