AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

थंडीत भेगा पडलेल्या टाचांमुळे झालात त्रस्त ? रात्री झोपण्यापूर्वी करा हे काम, भेगा होतील गायब

थंडीच्या दिवसांत पायांन भेगा पडण्याचा बहुतांश व्यक्तींना होतो. मात्र त्याची योग्य काळजी घेतल्यास ही समस्या दूर होऊ शकते.

थंडीत भेगा पडलेल्या टाचांमुळे झालात त्रस्त ? रात्री झोपण्यापूर्वी करा हे काम, भेगा होतील गायब
Image Credit source: Freepik
| Updated on: Dec 22, 2022 | 12:48 PM
Share

नवी दिल्ली – हिवाळ्याचा ऋतू (winter season) अनेक समस्या घेऊन येतो आणि त्यातील बहुतांश समस्या आपल्या त्वचेशी संबंधित असतात. महिला असो की पुरुष, हिवाळ्यात त्वचा कोरडी पडण्याची (dry skin) तक्रार प्रत्येकालाच असते. टाचांना भेगा पडणे (cracked heels) हे देखील ही कोरड्या त्वचेशी संबंधित समस्या आहे. हिवाळ्यात त्याचा जास्त त्रास होतो. थंड व कोरड्या हवेमुळे त्वचा कोरडी पडते, तसेच पायाची त्वचाही कोरडी झाल्याने भेगा पडतात.

हा त्रास कधीकधी इतका वाढतो, की पाय जमिनीवर टेकवणही कठीण होतं. तु्म्हालाही असा त्रास होत असेल तर काही उपायांनी ही समस्या दूर करता येऊ शकते. पण मुळात थंडीत भेगा का पडतात हे जाणून घेऊया

थंडीत टाचांना भेगा का पडतात ?

टाचांना भेगा पडण्याची अनेक कारणे असू शकतात, परंतु हिवाळ्यात वाहणारे थंड कोरडे वारे हे याचे सर्वात मोठे कारण आहे. वास्तविक, थंडीच्या दिवसात गार वारा किंवा थंड हवा ही त्वचेपर्यंत खोलवर पोहोचते आणि त्यामुळे ओलावा कमी होतो. हिवाळ्यात हवेतील आर्द्रता कमी होते, त्यामुळे त्वचेची विशेष काळजी घेण्याची गरज असते.

या गोष्टींची घ्या काळजी

हिवाळ्यात तुमच्या पायाच्या टाचांना वारंवार भेगा पडत असतील तर काही गोष्टींची काळजी घेऊन तुम्ही ही समस्या टाळू शकता.

1) पाय 20 मिनिटं गरम पाण्यात भिजवा

जर तुमच्या टाचांना भेगा पडल्या असतील तर रात्री झोपण्यापूर्वी गरम पाण्यात 20 मिनिटे पाय भिजवा. त्यानंतर प्युमिक स्टोनने पायवरील अतिरिक्त चरबी काढून टाका. असे केल्याने पायांना ओलावा मिळतो आणि भेगा पडणे कमी होते.

2) ऑईलबेस्ड पेट्रोलिअम जेलीचा वापर करा

पाय पाण्यातून काढल्यानंतर, ते सुती कापड किंवा टॉवेलने सुमारे 10 मिनिटे गुंडाळून ठेवा. नंतर ते नीट पुसून कोरडे करा व त्यावर ऑईल बेस्ड पेट्रोलिअम जेली लावा. असे केल्याने, पायांच्या भेगा हळूहळू भरतील.

3) रात्री झोपताना मोजे घाला

जर तुमच्या टाचांना भेग पडली असेल तर शक्य तितका वेळ ओलसर ठेवणे महत्त्वाचे आहे. पेट्रोलिअम जेली लावल्यानंतर पायात मोजे घाला, रात्री झोपताना कमीतकमी 2 ते 3 तास मोजे घाला ज्यामुळे भेगा बऱ्या होण्यास मदत होईल.

4) अनवाणी पाय जमिनीवर ठेऊ नका.

चुकूनही पाय थंड जमिनीवर ठेवू नका. तसेच, जर तुमच्याडल्या असतील तर अनवाणी पाय जमिनीवर ठेवू नका, कारण असे केल्याने भेगांमध्ये संसर्ग होऊ शकतो. संसर्गाचा धोका कमी करण्यासाठी पाय जमिनीवर ठेवू नका. पायात मोजे किंवा चपला घालाव्यात.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.