AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

क्षयरोग कशामुळे होतो? अशी लक्षणे दिसताच वेळीच सावध व्हा अन्…

क्षयरोग हा एक गंभीर आजार आहे ज्यामुळे फुफ्फुसांचे नुकसान होते. याची लक्षणे वेळीच लक्षात येणं गरजेचं असतं. त्यामुळे रुग्णावर लवकर उपचार सुरु होऊन त्याची लवकर बरी होण्याची शक्यताही जास्त असते. त्यामुळे क्षयरोगाची जागरूकता वाढवणे आणि लक्षणे ओळखणे अतिशय महत्त्वाचे आहे. जाणून घेऊयात की या आजाराची नक्की लक्षणे काय आहेत.

क्षयरोग कशामुळे होतो? अशी लक्षणे दिसताच वेळीच सावध व्हा अन्...
Mayuri Sajerao
Mayuri Sajerao | Updated on: Dec 19, 2024 | 3:47 PM
Share

एक असा आजार ज्याचे उपचार तर आहेत पण तो कितीवेळात बरा होऊ शकतो याची काही शाश्वती नाही. असा आजार ज्याने बऱ्याच जणांना आपला जीव गमवावा लागतो. तो आजार म्हणजे क्षयरोग. हा एक जीवाणूजन्य संसर्ग आहे जो अनेकदा फुफ्फुसांना नुकसान पोहोचवतो. हा सर्वात मोठा संसर्गजन्य किलर मानला जातो.

काही वेळेला या आजारीची लागण झाली आहे हे समजायला वेळ लागतो आणि मग हा आजार बळावत जातो. पण जर आपल्याला या आजाराच्या लक्षणांची थोडी जरी कल्पना असेल किंवा माहिती असेल तर आपण सुरुवातीपासून याची काळजी घेत लगेचच उपचार घेण्यास सुरुवात केली तर कदाचित हा आजार बरा होण्याची शक्यता असते.

या आजाराची लक्षणे काय असतात?

रक्तासह सतत खोकला किंवा कोरडा खोकल, थकवा, वजन कमी होणे, ताप, श्वास घेण्यास त्रास होणे, सतत थंडी वाजणे ही टीबीची लक्षणे आहेत. जेव्हा संक्रमित व्यक्ती सतत खोकते, शिंकते किंवा तिच्या बोलण्याच्या माध्यमातूनही क्षयरोग हवेतून पसरतो.

क्षयरोगाची कारणे

धूम्रपानामुळे फुफ्फुसांचे नुकसान होते आणि टीबीची शक्यता वाढते. उपचार न केल्यास, टीबीमुळे फुफ्फुसाच्या ऊतींना कायमचे डाग येऊ शकतात. त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. याव्यतिरिक्त, व्यक्तीला फुफ्फुसाचा त्रास होऊ शकतो. फुफ्फुस आणि छातीच्या भिंतीमध्ये द्रव जमा होऊ शकतो. ज्यामुळे छातीत दुखणे आणि श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.

टीबी मणक्याच्या हाडांनाही संक्रमित करू शकतं, ज्यामुळे पाठदुखी होते आणि पाठीच्या कण्यावर दबाव पडतो. विलंब न करता क्षयरोगाचे ठोस असं निदान करणे ही काळाची गरज आहे जेणेकरून या आजारावर त्वरित उपचार मिळून रुग्ण बरे होऊ शकतात.

क्षयरोगाचे उपचार

क्षयरोगाचे लवकर निदान होणे हा रुग्णांसाठी पुढचा धोका टळण्यासाठी फार महत्त्वाचे असते. त्यामुळे एखाद्या व्यक्तीमध्ये खोकला आणि श्वास लागणे यांसारखी लक्षणे दिसली तर त्यांनी ताबडतोब तज्ञाचा सल्ला घेणं गरजेच आहे. टीबीचे निदान करण्यासाठी आणि वेळेवर उपचार सुरू करण्यासाठी एएफबी स्मीअर, जीन एक्सपर्ट चाचणी, टीबी डीएनए पीसीआर, टीबी कल्चर आणि औषध या महत्त्वाच्या चाचण्या आहेत.

टीबीमुळे शरीरावर काय परिणाम होतो?

मॅनटॉक्स ट्यूबरक्युलिन स्किन टेस्ट (टीएसटी) आणि इंटरफेरॉन-गॅमा रिलीझ एसे (आयजीआरए), सीटी स्कॅन, एक्स-रे, थुंकी आणि फुफ्फुसातील द्रव यासाठी रक्त तपासणी करावी लागते. तसेच या आजाराचे त्वरीत निदान होणं गरजेच आहे कारण यामुळे रुग्ण यातून बरे होऊ शकतात. तसेच त्या व्यक्तीपासून इतरांनाही त्या आजाराचा प्रसार होण्याचा धोका कमी होतो.

जसे की एचआयव्ही रूग्णांसाठी लवकर झालेलं निदान जीवन वाचवणारं असू शकतं कारण त्यावरून त्या रुग्णांना योग्य ते उपचार देणे शक्य होतं.क्षयरोगाशी लढा देण्याच्या बाबतीत, अचूक निदान हाच सर्वप्रथम उपाय.

तसेच अजूनही टीबीबद्दल योग्य ती माहिती लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेच आहे. कारण बऱ्यापैकी अनेकांना टीबीबद्दल हवी तेवढी जागृकता नाहीये. त्यामुळे बऱ्याचदा या आजाराची लक्षणे लक्षात न आल्यानं याचा गंभीर परिणाम भोगावा लागू शकतो. त्यामुळे या आजाराबद्दल माहिती असणं फार गरजेच आहे.

Follow Us
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला जीव
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला 2 वर्षांच्या सोहमचा जीव
मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
ब्रेकिंग! मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील दुपारच्या सत्रातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय
Rain Update | पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय
उद्धव ठाकरे पुन्हा हिंदुत्वाच्या रणांगणात! पत्रकार परिषदेत मोठी घोषणा
Uddhav Thackeray UNCUT | उद्धव ठाकरे पुन्हा हिंदुत्वाच्या रणांगणात! पत्रकार परिषदेत मोठी घोषणा; येत्या रविवारी...
अमित साटम की चाटम? साटम यांच्या हकालपट्टीची थेट संजय राऊतांकडून मागणी!
Sanjay Raut Press | अमित साटम की चाटम? मृत्यूंवर हसणं महागात पडणार; अमित साटम यांच्या हकालपट्टीची थेट संजय राऊतांकडून मागणी!
महाराष्ट्रात लागू होणार समान नागरी कायदा? अधिवेशनाकडे राज्याचे लक्ष
महाराष्ट्रात लागू होणार समान नागरी कायदा? फडणवीस सरकारच्या मोठ्या हालचाली सुरू; आजच्या अधिवेशनाकडे राज्याचे लक्ष
पालखीपूर्वी इंद्रायणीला प्रदूषणाचा विळखा! वारकऱ्यांचा संताप अनावर
Indrayani River | पालखीपूर्वी इंद्रायणीला प्रदूषणाचा विळखा! फेसाळलेल्या नदीने वारकऱ्यांचा संताप अनावर
कोल्हापूरमध्ये धोक्याची घंटा! पंचगंगा दुथडी भरून वाहतेय; 3 बंधारे...
Kolhapur Rain Update | कोल्हापूरमध्ये धोक्याची घंटा! पंचगंगा दुथडी भरून वाहतेय; 3 बंधारे पाण्याखाली, नागरिकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास सुरूच...
पावसामुळे विधानसभेचे कामकाज ठप्प! मंत्रीच पोहोचले नाहीत, सभा तहकूब
Mumai Rain Update | पावसामुळे विधानसभेचे कामकाज ठप्प! मंत्रीच पोहोचले नाहीत, सभा तहकूब
आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
Poladpur | आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?