AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काही मिनिटांतच कारल्याच्या भाजीचा कडूपणा होईल दूर, 5 सोप्या टिप्सचा करा वापर

कारल्याची भाजी म्हंटली की केवळ लहान मुलेच नाही, तर प्रौढ व्यक्तीसुद्धा ही भाजी खाणे टाळतात. पण आता काही सोप्या टिप्सच्या मदतीने तुम्ही कारल्याला किंचित गोड चव देऊ शकता. चला तर मग आजच्या लेखात याबद्दल जाणून घेऊयात.

काही मिनिटांतच कारल्याच्या भाजीचा कडूपणा होईल दूर, 5 सोप्या टिप्सचा करा वापर
KarelaImage Credit source: Google
| Edited By: | Updated on: May 16, 2026 | 10:46 PM
Share

कारलं खाणं आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. कारल्याच्या भाजीचे सेवन केल्याने रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास, पचनक्रिया सुधारण्यास आणि वजन कमी करण्यास मदत करते. अशातच कारले चवीला खूप कडू असते, ज्यामुळे बरेच लोकं ते खायला नकार देतात. परंतु, काही सोप्या घरगुती उपायांनी तुम्ही कारल्याचा कडूपणा लक्षणीयरीत्या कमी करू शकता. ज्यामुळे ही भाजी अधिक चविष्ट लागते. चला तर मग आजच्या लेखात आपण कारल्याचा कडूपणा कमी करण्यासाठीच्या सोप्या टिप्स जाणून घेऊयात.

कारले इतके कडू का असते?

कारल्यामध्ये नैसर्गिकरित्या काही घटक असतात ज्यामुळे त्याला कडू चव येते. जेव्हा आपण कारले खातो, तेव्हा आपल्या जिभेला हे कडू घटक लगेच जाणवतात. पण हा कडूपणा कमी करण्यासाठी तुम्ही मीठ, दही, कांदा, हळद आणि मोहरीचे तेल यांसारखे काही गोष्टींचा वापर केल्यास त्याची कडवट चव कमी करण्यास मदत करतात.

मीठामुळे कडूपणा कमी होतो

कारल्याचा कडूपणा कमी करण्यासाठी मीठ हा सर्वात सोपा आणि प्रभावी उपाय मानला जातो. कापलेल्या कारल्याला मीठ लावून तसेच थोडावेळ ठेवा. त्यानंतर यामध्ये मीठामुळे पाणी तयार होते. हे पाणी हळूहळू कारल्यातील कडू घटक काढून टाकते. म्हणून हे पाणी काढल्यानंतर पाण्याने बारीक चिरलेली कारली काही वेळ धुवा. अशाने कारल्याची चव पूर्वीपेक्षा खूपच सौम्य होते.

दही कारल्याची चव संतुलित करते

दह्यामधील सौम्य आंबटपणा कारल्याची कडू चव कमी करण्यास मदत करतो. त्याची चव जिभेवर संतुलन साधते आणि कडूपणा कमी करते. शिवाय दह्यामधील लॅक्टिक ॲसिड आणि फायदेशीर जिवाणू कारल्याच्या बाहेरील थरावर कार्य करतात, ज्यामुळे त्याची चव आणखी सौम्य होते.

हळदीमुळे कारल्याच्या कडवटपणा सौम्य होतो

हळद तिच्या तीव्र सुगंधासाठी आणि अद्वितीय नैसर्गिक गुणधर्मांसाठी ओळखली जाते. जेव्हा हळद कारल्यामध्ये मिक्स केली जाते, तेव्हा तिचा सुगंध आणि सौम्य तिखटपणा भाजीतील कडूपणा कमी करण्यास मदत करतात. हळदीमधील कर्क्युमिन चव संतुलित करण्यासही मदत करते असे मानले जाते.

कांद्याचा गोडवा कमाल करतो

जेव्हा कारले कांद्यासोबत शिजवले जाते, तेव्हा कांद्याचा सौम्य गोडवा त्याच्या कडूपणाला संतुलित करतो. आपली जीभ एकाच वेळी अनेक चवी ओळखते, त्यामुळे गोड आणि कडू चवींची ही भाजी कडूपणा कमी करण्यास मदत करते. म्हणूनच कांद्यासह कारले चविष्ट लागते.

मोहरीच्या तेलामुळे कारल्याचा कडूपणा मोठ्या प्रमाणात कमी होतो

मोहरीच्या तेलाला तीव्र सुगंध आणि सौम्य तिखटपणा असतो, ज्यामुळे पदार्थांची चव वाढण्यास मदत होते. जेव्हा मोहरीच्या तेलात कारले शिजवले जाते, तेव्हा तेलाचा सुगंध त्याचा कडूपणा मोठ्या प्रमाणात कमी करून टाकतो. शिवाय मोहरीच्या तेलातील नैसर्गिक घटक चव वाढवतात.

Follow Us
ते भेटले असतील तर त्यात... पवार-शिंदे भेटीबाबत कॉंग्रेस नेत्याचं मोठं
ते भेटले असतील तर त्यात... पवार-शिंदे भेटीबाबत कॉंग्रेस नेत्याचं मोठं विधान
तुमच्याच अंगाशी आलं की महाराष्ट्राचा अपमान? राज ठाकरे बरसले...
तुमच्याच अंगाशी आलं की महाराष्ट्राचा अपमान? राज ठाकरे बरसले; मिसिंग लिंकवरून मुख्यमंत्री फडणवीसांना घेरलं
जेव्हा ममता बॅनर्जी रेल्वे मंत्री झाल्या... राज ठाकरे काय म्हणाले?
Raj Thackeray | जेव्हा ममता बॅनर्जी रेल्वे मंत्री झाल्या... राज ठाकरेंनी सांगितलं 2008 साली असं काय घडलं?
पुन्हा शाळकरी मुलांचा जीव धोक्यात! थेट चौकात झाला भीषण अपघात, रिक्षा..
पुन्हा शाळकरी मुलांचा जीव धोक्यात! थेट चौकात झाला भीषण अपघात, रिक्षा उलटली अन् पोरं...
काहीही झालं तरी बापाला वाचवायचंय... प्रसिद्ध अभिनेत्याची तडफड
काहीही झालं तरी बापाला वाचवायचंय... प्रसिद्ध अभिनेत्याची तडफड, रुग्णालयावर गंभीर आरोप; 'सैराट'शी कनेक्शन काय?
राजकारणातील हालचालींना वेग! पवार-शिंदे भेटीनंतर आता सुनेत्रा पवार तातड
राजकारणातील हालचालींना वेग! पवार-शिंदे भेटीनंतर आता सुनेत्रा पवार तातडीने वर्षा निवासस्थानी, काय घडतंय?
ऐकावं ते नवलंच! रेल्वेचा AC कोच बनला हनिमून सूट; व्हिडिओ व्हायरल
ऐकावं ते नवलंच! रेल्वेचा AC कोच बनला हनिमून सूट; व्हिडिओ व्हायरल
ती समजून घेण्याची गोष्ट... एकनाथ शिंदेच्या दालनातील पवरांच्या बैठकीबात
ती समजून घेण्याची गोष्ट... एकनाथ शिंदेच्या दालनातील पवरांच्या बैठकीबात जितेंद्र आव्हाडांची पहिली प्रतिक्रिया
थेट विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह! पवार-शिंदे भेटीवर बोलताना संजय राऊत
थेट विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह! पवार-शिंदे भेटीवर बोलताना संजय राऊत हे काय बोलून गेले?
भाजप नगरसेवकाकडून मुख्याधिकाऱ्यालाच मारहाण; पाणीपुरवठ्याच्या वादाचं..
Raigad | पाणीपुरवठ्याच्या वादाचं हिंसक रूप!; भाजप नगरसेवकाकडून मुख्याधिकाऱ्यालाच मारहाण