AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निरोगी शरीरासाठी चालणे हा सर्वोत्तम व्यायाम, जाणून घ्या वयानुसार किती चालणे फायदेशीर?

निरोगी जीवनशैलीसाठी चालणे खूप महत्त्वाचे आहे. चालणे हा इतर व्यायामांपेक्षा सर्वात सोपा व्यायाम आहे. पण कोणत्या वयात किती चालावे आणि त्याचे फायदे काय आहे. हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

निरोगी शरीरासाठी चालणे हा सर्वोत्तम व्यायाम, जाणून घ्या वयानुसार किती चालणे फायदेशीर?
| Updated on: Nov 16, 2024 | 7:40 PM
Share

आपले शरीर निरोगी राखण्यासाठी चालणे हा सर्वोत्तम व्यायाम असल्याचे म्हटले जात असते. निरोगी राहण्यासाठी व्यायाम करणे खूप गरजेचे आहे. मात्र रोजच्या धावपळीत अनेकदा तासंतास कसरत करणे कठीण जाते अशा परिस्थितीत चालणे हा कमी प्रयत्नात स्वतःला निरोगी ठेवण्याचा एक मार्ग आहे. परंतू वयानुसार प्रत्येकाने किती मिनिटे चालणे आवश्यक असते. याची माहीती आपण आता घेऊयात….

चालणे हा व्यायामाचा एक भाग आहे. जो सर्व वयोगटातील लोकांसाठी खूप महत्त्वाचा आहे. चालल्यामुळे तुम्ही निरोगी राहता. चालणे हा इतर व्यायामांपेक्षा सर्वात सोपा व्यायाम आहे. निरोगी जीवनशैलीसाठी हे खूप महत्त्वाचे आहे आणि यामुळे तुम्हाला दिवसभर ऊर्जा मिळते आणि आजच्या काळात प्रत्येकासाठी त्यांच्या वयानुसार चालणे फायदेशीर ठरते. तुमच्या वयानुसार किती मिनिटे चालले पाहिजे ते जाणून घ्या.

18 ते 30 वर्षे

तरुण आणि प्रौढांमध्ये उच्च ऊर्जा पातळी आणि स्नायूंची ताकद असते. त्यामुळे ते दररोज 30 ते 60 मिनिटे वेगाने चालू शकतात. या टप्प्यावर वजन नियंत्रित ठेवण्यासाठी, तणाव कमी करण्यासाठी आणि ह्रदय निरोगी ठेवण्यासाठी व्यायाम करणे आणि चालणे खूप महत्त्वाचे आहे.

31 ते 50 वर्षे

वयाच्या 31 ते 50 व्या वर्षी तुम्ही दररोज 30 ते 45 मिनिटे चालले पाहिजे. नियमित चालल्याने वजन नियंत्रणात राहण्यास, स्नायू मजबूत ठेवण्यास आणि जुनाट आजारांपासून बचाव तसेच मानसिक दृष्ट्या निरोगी राहण्यास मदत होते. यासाठी तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी चालले पाहिजे.

51 ते 65 वर्षे

51 ते 65 वर्ष वयोगटातील लोकांसाठी दिवसातून 30 ते 40 मिनिटे चालणे चांगले आहे. मध्यम वयात शरीरातील नैसर्गिक बदलांमुळे लोकांना स्नायू कमकुवत आणि चयापचय कमी झाल्यासारखे वाटू लागते आणि यासाठी चालणे खूप महत्त्वाचे आहे.

66 ते 75 वर्षे

वृद्धांसाठी दिवसातून सुमारे 20 ते 30 मिनिटे चालणे खूप महत्त्वाचे आहे. या वयात चालणे वृद्धांची ऊर्जा टिकवून ठेवून हृदयाशी संबंधित आजार टाळता येतात. मग वयाच्या 66 ते 75 व्या वर्ष नियमित चालल्याने अनेक आजारांपासून बचाव होतो आणि तुमचे आरोग्य हे चांगले राहते असे विविध संशोधनातून दिसून आले आहे.

Follow Us
शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल
Nagpur Farmer | शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! नागपूरच्या शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल चर्चेत, व्हिडिओ होतोय व्हायरल
राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे...
Rahul Gandhi | राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे परराष्ट्र धोरण नाही म्हणत मोदींवर निशाणा
शिवसेना तालुकाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी? ऑडिओ व्हायरल
तू तेव्हा वाचला आहेस, आता वाचणार नाहीस! शिवसेना तालुकाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी? ऑडिओ व्हायरल
केळेवाडी ते चर्नी रोड पूल कधी होणार? मनसेचा प्रशासनाला सवाल
MNS Protest | केळेवाडी ते चर्नी रोड पूल कधी होणार? मनसेचा प्रशासनाला सवाल; आंदोलन पेटलं
हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच
Ramp Walk | हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! आत्मसमर्पित महिला नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन....
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन; रेशीम उद्योगाला मिळणार नवी झेप
राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
Supriya Sule | राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाल्या...
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश
अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना मुदतवाढ नाही; १५ ऑगस्ट डेडलाईन
प्रताप सरनाईक: अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना मुदतवाढ नाही, १५ ऑगस्ट अंतिम तारीख
धीरज परदेशी हत्या प्रकरणात पोलिसांकडून दिशाभूल केल्याचा जगतापांचा आरोप
धीरज परदेशी हत्या प्रकरण: तपासात पोलिसांकडून दिशाभूल केल्याचा संग्राम जगतापांचा आरोप