AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निरोगी शरीरासाठी चालणे हा सर्वोत्तम व्यायाम, जाणून घ्या वयानुसार किती चालणे फायदेशीर?

निरोगी जीवनशैलीसाठी चालणे खूप महत्त्वाचे आहे. चालणे हा इतर व्यायामांपेक्षा सर्वात सोपा व्यायाम आहे. पण कोणत्या वयात किती चालावे आणि त्याचे फायदे काय आहे. हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

निरोगी शरीरासाठी चालणे हा सर्वोत्तम व्यायाम, जाणून घ्या वयानुसार किती चालणे फायदेशीर?
| Updated on: Nov 16, 2024 | 7:40 PM
Share

आपले शरीर निरोगी राखण्यासाठी चालणे हा सर्वोत्तम व्यायाम असल्याचे म्हटले जात असते. निरोगी राहण्यासाठी व्यायाम करणे खूप गरजेचे आहे. मात्र रोजच्या धावपळीत अनेकदा तासंतास कसरत करणे कठीण जाते अशा परिस्थितीत चालणे हा कमी प्रयत्नात स्वतःला निरोगी ठेवण्याचा एक मार्ग आहे. परंतू वयानुसार प्रत्येकाने किती मिनिटे चालणे आवश्यक असते. याची माहीती आपण आता घेऊयात….

चालणे हा व्यायामाचा एक भाग आहे. जो सर्व वयोगटातील लोकांसाठी खूप महत्त्वाचा आहे. चालल्यामुळे तुम्ही निरोगी राहता. चालणे हा इतर व्यायामांपेक्षा सर्वात सोपा व्यायाम आहे. निरोगी जीवनशैलीसाठी हे खूप महत्त्वाचे आहे आणि यामुळे तुम्हाला दिवसभर ऊर्जा मिळते आणि आजच्या काळात प्रत्येकासाठी त्यांच्या वयानुसार चालणे फायदेशीर ठरते. तुमच्या वयानुसार किती मिनिटे चालले पाहिजे ते जाणून घ्या.

18 ते 30 वर्षे

तरुण आणि प्रौढांमध्ये उच्च ऊर्जा पातळी आणि स्नायूंची ताकद असते. त्यामुळे ते दररोज 30 ते 60 मिनिटे वेगाने चालू शकतात. या टप्प्यावर वजन नियंत्रित ठेवण्यासाठी, तणाव कमी करण्यासाठी आणि ह्रदय निरोगी ठेवण्यासाठी व्यायाम करणे आणि चालणे खूप महत्त्वाचे आहे.

31 ते 50 वर्षे

वयाच्या 31 ते 50 व्या वर्षी तुम्ही दररोज 30 ते 45 मिनिटे चालले पाहिजे. नियमित चालल्याने वजन नियंत्रणात राहण्यास, स्नायू मजबूत ठेवण्यास आणि जुनाट आजारांपासून बचाव तसेच मानसिक दृष्ट्या निरोगी राहण्यास मदत होते. यासाठी तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी चालले पाहिजे.

51 ते 65 वर्षे

51 ते 65 वर्ष वयोगटातील लोकांसाठी दिवसातून 30 ते 40 मिनिटे चालणे चांगले आहे. मध्यम वयात शरीरातील नैसर्गिक बदलांमुळे लोकांना स्नायू कमकुवत आणि चयापचय कमी झाल्यासारखे वाटू लागते आणि यासाठी चालणे खूप महत्त्वाचे आहे.

66 ते 75 वर्षे

वृद्धांसाठी दिवसातून सुमारे 20 ते 30 मिनिटे चालणे खूप महत्त्वाचे आहे. या वयात चालणे वृद्धांची ऊर्जा टिकवून ठेवून हृदयाशी संबंधित आजार टाळता येतात. मग वयाच्या 66 ते 75 व्या वर्ष नियमित चालल्याने अनेक आजारांपासून बचाव होतो आणि तुमचे आरोग्य हे चांगले राहते असे विविध संशोधनातून दिसून आले आहे.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.