AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Water Benefits | आयुष्यभर निरोगी राहायचय? मग, दिवसभरातील ‘या’ वेळीच प्या पाणी!

पाणी आपले शरीर निरोगी आणि हायड्रेटेड ठेवते. शिवाय पाणी आपल्या आयुष्यासाठी खूप महत्वाचे आहे. पाण्याशिवाय आपल्या जीवनाची कल्पनाही करता येणार नाही.

Water Benefits | आयुष्यभर निरोगी राहायचय? मग, दिवसभरातील ‘या’ वेळीच प्या पाणी!
| Updated on: Mar 09, 2021 | 12:04 PM
Share

मुंबई : पाणी आपले शरीर निरोगी आणि हायड्रेटेड ठेवते. शिवाय पाणी आपल्या आयुष्यासाठी खूप महत्वाचे आहे. पाण्याशिवाय आपल्या जीवनाची कल्पनाही करता येणार नाही. आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीला पाण्याची आवश्यकता असते. पाणी केवळ आपल्या पचनासाठीच नव्हे तर हृदय, फुफ्फुस आणि मेंदूच्या कार्यासाठी देखील खूप महत्वाचे आहे. परंतु, आपल्याला हे माहित आहे का की, दिवसा कधी आणि किती वेळा पाणी प्यावे?(Water Benefits know the right time to drink water)

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जेव्हा आपल्याला ते पिण्याची नेमकी वेळ आणि मात्रा माहित असते तेव्हाच पाणी आपल्या शरीरावर अधिक परिणाम करते. पाणी कधी प्यायचे आणि केव्हा प्यायचे हे बहुतेक लोकांना माहिती नसते. ते स्वत:च्या सोयीनुसार पाण्याचे सेवन करतात. बरेच लोक आपला मूड बूस्ट करण्यासाठी किंवा वजन कमी करण्यासाठी पाणी पितात.

तथापि, वेळा चुकवून पाणी प्यायल्याने वजन कमी होत नाही. आपल्या शरीरासाठी कधी आणि किती वेळा पाण्याचे सेवन करणे योग्य आहे, ते जाणून घेऊया…

अन्नाबरोबर पाणी पिणे चांगले

बरेच लोक अन्न खात असताना पाण्याचे सेवन करत नाहीत. पण, तसे करणे पूर्णपणे चुकीचे मानले जाते. तज्ज्ञांच्या मते, अन्नासह पाणी प्यायल्याने पचन सुधारते. उच्च फायबर फूडसह पाणी पिणे महत्वाचे आहे. वास्तविक, हा फायबर आपल्या पाचक प्रणालीतून जातो आणि पाणी शोषून घेतो.

डोकेदुखी झाल्यास पाणी प्यावे

कधीकधी डोकेदुखी डिहायड्रेशनचे लक्षण देखील असू शकते. विशेषत: मायग्रेनच्या बाबतीत, अशा रुग्णांनी पाण्याचे सेवन वाढवले पाहिजे. यामुळे मायग्रेनची तीव्रता, वारंवारता आणि कालावधी कमी करण्यात मदत होते.

जेवणापूर्वी एक ग्लास पाणी प्यावे

जरी आपण जेवण करण्यापूर्वी पाण्याचे सेवन करत असाल, तरी  भुकेवर आणि अन्नावर नियंत्रण ठेवण्यासाठी जेवणापूर्वी एक ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. पाणी आपल्या वजन नियंत्रणात चांगली भूमिका बजावते. जर तुम्ही जेवणापूर्वी एक ग्लास पाण्याचे सेवन केले, तर भूक नियंत्रित होईल. अशा परिस्थितीत, आपल्या पोटात कमी अन्न जाईल आणि आपले वजन देखील नियंत्रणाखाली येईल (Water Benefits know the right time to drink water).

सकाळी उठल्यावर पाणी प्यावे

सकाळी उठल्याबरोबर एक किंवा दोन ग्लास पाणी प्या. रात्री झोपी जाताना आपल्याला पाणी पिण्याची आवश्यकता नसते, कारण आपण आधीच पाणी प्यायलेले असतो. म्हणून, शरीर हायड्रेट राहण्यासाठी सकाळी सकाळी पाणी प्यावे.

व्यायामापूर्वी आणि नंतर पाणी प्यावे

जर, आपण व्यायाम सुरू करत असाल तर दोन दिवस अगोदर भरपूर पाणी पिण्यास प्रारंभ करा. व्यायामादरम्यान आणि नंतर स्वत:ला पूर्णपणे हायड्रेट ठेवणे खूप महत्वाचे आहे. सकाळी जॉगिंगला जाताना एक तास आधी पाणी पिणे आवश्यक आहे. व्यायाम पूर्ण झाल्यानंतरही स्वत:ला हायड्रेट ठेवण्यासाठी पाणी प्यावे.

संध्याकाळी कॉफीऐवजी पाणी प्या

जर, आपल्याला संध्याकाळी चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असेल, तर त्याऐवजी आपण पाण्याचे सेवन करणे चांगले. कारण चहा किंवा कॉफी तुमची रात्रीची झोप खराब करू शकते. हे एका संशोधनात सिद्ध झाले आहे की, डिहायड्रेशनमुळे अस्वस्थता आणि नैराश्य येते. म्हणूनच आपली शक्ती वाढवण्यासाठी पाणी पिण्याची सवय लावणे हा एक चांगला पर्याय आहे.

(Water Benefits know the right time to drink water)

हेही वाचा :

उपाशी पोटी चहा पिताय? थांबा, होऊ शकतात ‘हे’ गंभीर आजार!

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.