AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जेवणासोबत 2 हिरव्या मिरच्या खाल्ल्यास शरीरावर काय परिणाम होतो? फायदा की तोटा? तज्ज्ञांनी दिली माहिती

Green Chilli Benefits : हिरवी मिरची केवळ अन्नाला तिखट आणि चविष्ट बनवत नाही, तर त्यात अनेक असे पोषक घटक असतात जे शरीरासाठी फायदेशीर असतात. याचे खास फायदे जाणून घेऊयात.

जेवणासोबत 2 हिरव्या मिरच्या खाल्ल्यास शरीरावर काय परिणाम होतो? फायदा की तोटा? तज्ज्ञांनी दिली माहिती
Green ChillieImage Credit source: Google
| Updated on: Mar 14, 2026 | 4:58 PM
Share

भारतीय आहारात हिरव्या मिरचीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. अनेक लोक चव वाढवण्यासाठी जेवताना एक किंवा दोन हिरव्या मिरच्या नक्की खातात. हिरवी मिरची केवळ अन्नाला तिखट आणि चविष्ट बनवत नाही, तर त्यात अनेक असे पोषक घटक असतात जे शरीरासाठी फायदेशीर असतात. हिरव्या मिरचीमध्ये व्हिटॅमिन C, व्हिटॅमिन A, अँटिऑक्सिडंट्स आणि फायबर मोठ्या प्रमाणात असतात. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते तसेच पचनसंस्थादेखील सुधारते. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

आपण दररोजच्या जेवणासोबत 2 हिरव्या मिरच्या खाल्ल्याने शरीरावर काय परिणाम होतो हा प्रश्न अनेकांना पडलेला असेल. काही लोकांच्या मते त्यामुळे मेटाबॉलिझम वाढतो आणि वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते, तर काहींचे म्हणणे आहे की जास्त मिरची खाल्ल्याने गॅस, जळजळ किंवा पोटाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. मात्र दोन हिरव्या मिरच्या खाल्ल्यास नेमकं शरीरात काय होते हे आपण तज्ज्ञांकडून जाणून घेऊयात.

तज्ज्ञ काय सांगतात?

सोशल मीडियावर डायटिशियन लीमा महाजन यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी रोजच्या जेवणासोबत 2 हिरव्या मिरच्या खाण्याचे फायदे सांगितले आहेत. लीमा महाजन यांच्या मते हिरव्या मिरचीत कॅप्सायसिन नावाचा एक विशेष घटक असतो, जो शरीरासाठी फायदेशीर आहे. कॅप्सायसिनमुळे शरीरात थर्मोजेनेसिस ही प्रक्रिया वाढू शकते. त्यामुळे शरीर उष्णता निर्माण करण्यासाठी अधिक ऊर्जा वापरते आणि जास्त कॅलरी बर्न होतात. याचाच अर्थ वजन कमी होण्यास मदत होते.

हिरव्या मिरचीत आढळते व्हिटॅमिन C

लीमा महाजन यांनी सांगितले की, हिरव्या मिरचीत लिंबापेक्षाही अधिक व्हिटॅमिन C असते. त्यामुळे हिरवी मिरची इम्युनिटी वाढवणे आणि कोलेजन उत्पादन वाढवणे यासाठी उपयुक्त मानली जाते.

ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्यास मदत

लीमा महाजन यांनी सांगितले की, काही अभ्यासांमध्ये असे आढळले आहे की मिरचीत असलेले कॅप्सायसिन इन्सुलिन रिस्पॉन्स सुधारण्यास मदत करते. त्यामुळे जेवणासोबत 2 हिरव्या मिरच्या खाल्ल्यास अचानक ग्लुकोज वाढत नाही, त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहू शकते.

शरीर थंड ठेवण्यास मदत होते

उन्हाळ्यात हिरवी मिरची खाल्ल्यास शरीर थंड राहण्यास मदत होते. कारण मिरचीतील उष्णता हीट रिसेप्टर्स सक्रिय करते, त्यामुळे मेंदूला शरीर थंड करण्याचा सिग्नल मिळतो. त्यामुळे घाम जास्त येतो आणि नैसर्गिकरित्या शरीर थंड होण्यास मदत होते. मात्र तज्ज्ञ असेही सांगतात की, हिरवी मिरची फायदेशीर असली तरी ती खूप जास्त प्रमाणात खाऊ नये, याचा दुष्परिणामही होऊ शकतो.

Follow Us
रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? महाजनांचा मोठा काय?
Girish Mahajan | रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? गिरीश महाजनांचा मोठा दावा काय?
गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक.....
Gondia Rain | गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक शेतकरी चिंतेत
नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
Mumbai | नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! 13 एप्रिलला अटक, आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
Thane Assault Case | ठाण्यातील वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर
Buldhana | लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर; कच्च्या मालाचे नमुने तपासणीसाठी जप्त
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून मोठी भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार, नवे नियम लागू
कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
Devendra Fadnavis On Shetkari Karjmafi | कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में.....
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणत संजय राऊतांनाही खोचक टोला
भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
Devendra Fadnavis UNCUT | मोदींच्या 12 वर्षांचा महाअहवाल! भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले....
Devendra Fadnavis | भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले मोदी सरकारच्या 12 वर्षांचे रिपोर्ट कार्ड