अमिताभ बच्चन यांच्यावर झालेली अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया म्हणजे काय?

What is Angioplasty : बॉलिवूडचे शंहशाह अमिताभ बच्चन यांच्यावर नुकतीच अँजिओप्लास्टी करण्यात आली. पण तुम्हाला माहित आहे की अँजिओप्लास्टी का करावी लागते. काय आहे त्याची गरज. कोणत्या कोणत्या अवयवावर ती केली जाते. जाणून घ्या.

अमिताभ बच्चन यांच्यावर झालेली अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया म्हणजे काय?
Follow us
| Updated on: Mar 15, 2024 | 7:27 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांना मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बीग बींवर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आलीये. अमिताभ बच्चन यांच्या पायात समस्या निर्माण झाल्याने त्यांच्या पायाची अँजिओप्लास्टी करावी लागली होती. हृदयाप्रमाणेच शरीराच्या इतर भागात ब्लॉकेज असल्यास किंवा रक्तप्रवाह योग्य होत नसल्यास अँजिओप्लास्टी केली जाते. अँजिओप्लास्टी शस्त्रक्रियेद्वारे, रक्तवाहिन्या रुंद केल्या जातात ज्यामुळे रक्त योग्यरित्या वाहू शकते आणि गोठण्याचे प्रमाण कमी करते. सध्या ब्लॉकेज होण्याचं प्रमाण झपाट्याने वाढत आहे.

अँजिओप्लास्टी करताना ब्लॉक झालेल्या धमन्या रुंद केल्या जातात. वैद्यकीय फुग्याचा वापर करुन ही शस्त्रक्रिया केली जाते. हा फुगा रक्तवाहिन्यांच्या आतील भागावर दबाव टाकतो, ज्यामुळे त्या रुंद होतात आणि उघडतात. यामुळे रक्तप्रवाह सुधारतो. अँजिओप्लास्टी धमनी पुन्हा अरुंद होण्यापासून प्रतिबंधित करते. यामध्ये, मॅटरचा स्टेंट घातला जातो ज्यामुळे धमन्या पुन्हा अरुंद होण्यापासून रोखतात.

हृदयाशिवाय या अवयवांची होते अँजिओप्लास्टी

हृदयाची मुख्य धमनी

हिप किंवा ओटीपोटाची धमनी

मांडीतील धमनी

गुडघ्याच्या मागची धमनी

खालच्या पायाची धमनी

पेरिफेरल आर्टरी डिसीज म्हणजे काय?

पेरिफेरल आर्टरी डिसीज (पीएडी) ही एक स्थिती आहे जी पाय आणि पायांमधील रक्तवाहिन्या अवरोधित झाल्यामुळे उद्भवते. रक्तवाहिन्या अरुंद झाल्यामुळे पायांना रक्तपुरवठा व्यवस्थित होत नाही. यामुळे नसा आणि इतर ऊतींचे नुकसान होऊ शकते.

काय आहेत त्याची लक्षणे

चालताना पाय दुखणे

स्नायू दुखणे

पायाला पेटके येणे

पाय सुन्न होणे किंवा अशक्तपणा

पायांवरील त्वचेचा रंग खराब होणे

अँजिओप्लास्टी कधी करावी लागते?

डॉक्टरांच्या मते, रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार झाल्यामुळे रक्तप्रवाह नीट होत नाही. शरीरात रक्ताच्या गुठळ्या तयार झाल्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो. हा त्रास हृदयाच्या धमन्यांमध्ये होत असेल तर छातीत दुखते. श्वास घेण्यास त्रास होतो. चिंताग्रस्त आणि घाम येणे सुरू होते. अशी परिस्थिती उद्भवल्यास रुग्णाला तातडीने उपचारासाठी न्यावे लागते. निष्काळजीपणा केल्यास ते प्राणघातक देखील ठरू शकते.

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.