AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मधुमेही रूग्ण या भाज्यांचे करताय सेवन? आताच थांबवा, अन्यथा रक्तातील साखरेची पातळी वाढेल!

मधुमेह हा जगभरातील अनेक गंभीर आजारांपैकी एक आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे अस्वास्थ्यकर जीवनशैली आणि चुकीच्या खाण्याच्या सवयी. यापासून मुक्ती मिळवण्यासाठी मधुमेह रूग्णांनी रक्तातील साखरेची पातळी वाढू नये यासाठी या भाज्यांचे सेवन करणे टाळावे. चला तर मग आजच्या लेखात आपण याबद्दल जाणून घेऊयात.

मधुमेही रूग्ण या भाज्यांचे करताय सेवन? आताच थांबवा, अन्यथा रक्तातील साखरेची पातळी वाढेल!
DiabetesImage Credit source: Tv9 Bharatvarsh
| Edited By: | Updated on: May 22, 2025 | 2:42 AM
Share

मधुमेह हा आजकाल वेगाने पसरणाऱ्या आजारांपैकी एक आहे. चुकीची जीवनशैली आणि असंतुलित आहार, फास्टफुडचे अधिकचे सेवन, तेलकट पदार्थ यामुळे अनेकांना मधुमेह हा आजार होण्याचा सर्वात मोठे कारण आहे. अशा परिस्थितीत मधुमेहाच्या रुग्णांनी त्यांच्या आहाराकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.

आरोग्य तज्ञांच्या मते, मधुमेही रूग्णांनी त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करणारे पदार्थ निवडणे हे महत्वाचे आहे.

मधुमेहाच्या रुग्णांनी त्यांच्या आहारात शक्य तितके हेल्दी पदार्थ समाविष्ट करावेत. भाज्या सामान्यतः आरोग्यदायी मानल्या जातात, परंतु काही भाज्या मधुमेहाच्या रुग्णांना नुकसान पोहोचवू शकतात. तर आजच्या या लेखात आपण जाणून घेणार आहोत की मधुमेह असलेल्या रुग्णांनी कोणत्या भाज्या टाळाव्यात.

मधुमेहींनी कोणत्या भाज्यांचे सेवन टाळाव्यात:

सुरणाचे सेवन करू नका.

मधुमेहाच्या रुग्णांनी सुरण खाणे टाळावे. सुरण खाल्ल्याने मधुमेहाच्या रुग्णांच्या रक्तातील साखरेची पातळी देखील वाढू शकते, जरी सुरणामधील ग्लायसेमिक इंडेक्स मध्यम असला तरी, जर ते जास्त प्रमाणात सेवन केले तर रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. म्हणून, मधुमेहाच्या रुग्णांनी सुरण खाऊ नयेत, किंवा ते खूप कमी प्रमाणात खावे.

रताळे खाऊ नका

मधुमेहाच्या रुग्णांनीही रताळे खाणे टाळावे. यामध्ये उच्च ग्लायसेमिक इंडेक्स आहे आणि त्यात कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण देखील जास्त आहे. म्हणून, ते खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढू शकते.

मक्याचे सेवन टाळा

मधुमेहाच्या रुग्णांनीही मक्याचे सेवन टाळावे. मक्यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स मध्यम असतो, परंतु त्यात कार्बोहायड्रेट्स जास्त असतात. म्हणून, जर ते जास्त प्रमाणात खाल्ले तर रक्तातील साखर वाढू शकते. म्हणूनच मधुमेहाच्या रुग्णांना मक्का मर्यादित प्रमाणात खाण्याचा सल्ला दिला जातो.

बटाटे खाऊ नका

मधुमेहाच्या रुग्णांनीही बटाटे खाणे टाळावे. बटाट्याचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप जास्त असतो आणि त्यात स्टार्च देखील भरपूर असते. म्हणून, बटाटे जास्त प्रमाणात खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते.

एवढेच नाही तर बटाटे देखील सहज पचतात. त्यामुळे, ते रक्तात ग्लुकोजची प्रमाण लगेच वाढवते आणि साखरेची पातळी वाढू लागते. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांना बटाटे खाल्ल्याने समस्या येऊ शकतात.

मधुमेही रुग्णांनी काय खावे?

मधुमेही रुग्णांनी त्यांच्या आहारात अशा भाज्यांचा समावेश करा ज्यात स्टार्च कमी असेल आणि ग्लायसेमिक इंडेक्स कमी असेल. या भाज्या खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढणार नाही आणि आरोग्यालाही फायदा होईल. मधुमेहाच्या रुग्णांसाठी हिरव्या पालेभाज्या फायदेशीर असतात. यामध्ये फायबर, प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात, जे साखर नियंत्रित करण्यास आणि चांगले आरोग्य राखण्यास मदत करतात.

(डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.