AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बळीराजासाठी आनंदाची बातमी, कोणत्या महिन्यात किती पाऊस होणार? वाचा भेंडवळच्या मांडणीतील हवामानाचा अंदाज

भेंडवळ घटमांडणीची ३५० वर्षांहून अधिक जुनी परंपरा आहे. यावर्षीच्या घटमांडणीत पावसाळ्याचा अंदाज, शेतीची स्थिती आणि देशाच्या राजकीय परिस्थितीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला अनिश्चितता असली तरी नंतर तो सर्वसाधारण राहील असे भाकित आहे.

बळीराजासाठी आनंदाची बातमी, कोणत्या महिन्यात किती पाऊस होणार? वाचा भेंडवळच्या मांडणीतील हवामानाचा अंदाज
rain alertImage Credit source: TV9
| Updated on: May 01, 2025 | 9:45 AM
Share

सुमारे साडेतीनशे वर्षांची वैभवशाली परंपरा असलेल्या भेंडवळ घट मांडणीचे भाकित समोर आले आहे. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळमध्ये घटमांडणी करण्यात आली. नुकतंच भेंडवळ घट मांडणीत यंदाचा पाऊस कसा असणार, याबद्दलचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यासोबतच भेंडवळच्या घटमांडणीत शेती आणि अर्थव्यवस्थेशी संबंधित भाकितांबरोबरच नैसर्गिक आपत्ती आणि राजकीय घडामोडींविषयीही अंदाज वर्तवण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून हे भाकित अचूक आहेत. लोकांचा या परंपरेवर दृढ विश्वास आहे. १ मे रोजी सूर्योदयापूर्वी भेंडवळीच्या घटमांडणीचे भाकीत मांडण्यात आले.

सारंगधर महाराज यांनी यावर्षीच्या पीकपाणी आणि देशाच्या स्थितीबद्दल महत्त्वपूर्ण अंदाज व्यक्त केले आहेत. यंदा पिकांची परिस्थिती सर्वसाधारण राहणार आहे. तसेच यावेळी चार महिने पाऊस कसा असेल याबद्दलचाही अंदाज मांडण्यात आला आहे. सुरुवातीचे दोन महिने अनिश्चित आणि काही ठिकाणी कमी-जास्त पाऊस राहील, असा अंदाज या भेंडवळीच्या घटमांडणीत वर्तवण्यात आला आहे. पण त्यानंतर पाऊस सर्वसाधारण राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.

पावसाचा अंदाज काय?

यंदा पावसाळ्याच्या पहिल्या महिन्यात कमी अधिक पाऊस होईल. त्यानंतर दुसऱ्या महिन्यात सर्वसाधारण आणि चांगला पाऊस होईल. तसेच तिसऱ्या महिन्यात सर्वसाधारण पाऊस होईल. तर चौथ्या महिन्यात मात्र अवकाळी पाऊस येण्याची शक्यता आहे. यावर्षी सांडाई, कुरडई आणि पापड तसेच जनावरांसाठी चारा-पाणी भरपूर प्रमाणात उपलब्ध असेल, असे सकारात्मक भाकित वर्तवण्यात आले आहे.

देशावर मोठे संकट येण्याची शक्यता

सर्वात चिंताजनक बाब म्हणजे, यावर्षी देशावर मोठे संकट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच, युद्धजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते, असा गंभीर इशाराही देण्यात आला आहे. विशेष म्हणजे, घट मांडणीत पान विडा गायब असल्याने याबद्दल कोणतेही भाकित करणे शक्य झाले नाही. मागील पन्नास वर्षांमध्ये अशी परिस्थिती पहिल्यांदाच उद्भवली आहे. पुरी आणि करंजी देखील गायब असल्याने भूकंप आणि नैसर्गिक आपत्ती येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Follow Us
नाशिक TCS प्रकरणातील संशयित आरोपी मतीन पटेलला जामीन
नाशिक TCS प्रकरणातील मतीन पटेलला जामीन मंजूर
58 लाख नोंदींच्या प्रमाणपत्रांची मागणी;मराठा आरक्षणावरून वातावरण तापलं
मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला थेट इशारा: ५८ लाख नोंदींची प्रमाणपत्रे हवीत, वेळ आल्यास सरकार पाडू
भाजप-राष्ट्रवादीत राजकीय संघर्ष
बदलापूर वृक्ष प्राधिकरण नियुक्तीवरून भाजप-राष्ट्रवादीत राजकीय संघर्ष
देवेंद्र फडणवीसांची धर्मेंद्र प्रधान यांच्याशी भेट; म्हणाले,‘माझे बंधू
फडणवीस-प्रधान भेट: माझे बंधू म्हणत देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला आनंद
बदलापुरात सीलबंद पाण्याच्या नावाखाली दूषित पाण्याची विक्री?
बदलापूरमध्ये सीलबंद पाण्याच्या नावाखाली अशुद्ध पाण्याची विक्री
मीरा-भाईंदरमध्ये मेट्रोचा स्लॅब कोसळला; कंत्राटदारांवर 12 कोटींचा दंड
मीरा-भाईंदरमध्ये मेट्रो स्लॅब कोसळला, आदित्य ठाकरेंची कठोर कारवाईची मागणी
शिवसेना शिंदे गटाला मोठा फटका? सुप्रीम कोर्टाच्या 'त्या'...
शिवसेना शिंदे गटाला मोठा फटका? सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' निर्णयाने... फुटीर 6 खासदारांबाबत नवी अपडेट समोर
नवनाथ वाघमारेंचं वादग्रस्त वक्तव्य, नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया
नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्याचा निषेध, मराठा नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया
एकीकडे NDA सोबतच्या चर्चा फेटाळल्या, दुसरीकडे शरद पवार थेट भाजपच्या...
एकीकडे NDA सोबतच्या चर्चा फेटाळल्या, दुसरीकडे शरद पवार थेट भाजपच्या बड्या नेत्यासह एकाच मंचवर, त्या व्हिडीओची तुफान चर्चा
सचिन अहिर ॲक्शन मोडवर! थेट वरळीला पोहोचले अन्...
Sachin Ahir | सचिन अहिर ॲक्शन मोडवर! थेट वरळीला पोहोचले अन्...