AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

युती सरकारनं भरती थांबवल्यानं 4 हजार पदं रिक्त; शिक्षण संस्थांच्या प्रश्नांवरून पवार आक्रमक

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि महाविकास आघाडीचे शिलेदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज साऱ्याच आघाडीवर आक्रमक झालेल्या विरोधकांना सोमवारी जोरदार धोबीपछाड देत राज्य सरकारची पाठराखण केली.

युती सरकारनं भरती थांबवल्यानं 4 हजार पदं रिक्त; शिक्षण संस्थांच्या प्रश्नांवरून पवार आक्रमक
शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
| Edited By: मनोज कुलकर्णी | Updated on: Nov 15, 2021 | 1:28 PM
Share

नाशिकः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि महाविकास आघाडीचे शिलेदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज साऱ्याच आघाडीवर आक्रमक झालेल्या विरोधकांना सोमवारी जोरदार धोबीपछाड देत राज्य सरकारची पाठराखण केली. शिक्षण क्षेत्रातल्या अडचणींनाही त्यांनी मागच्या सरकारला जबाबदार धरलं. पवार म्हणाले, मागच्या सरकारनं त्यांच्या कार्यकाळात भरती होऊ दिली नाही. मागच्या सरकारनं संस्था चालकांकडं चमत्कारिक नजरेनं पाहिलं. मागच्या सरकारनं अनेक गोष्टी तशाच ठेवल्या. शिक्षण संस्थांमधलीही भरती थांबवली. त्यामुळं आज 4 हजार पदं रिक्त आहेत. रयत शिक्षण संस्था सध्या अनेक समस्यांना तोंड देते आहे. तेव्हा इतर शिक्षण संस्थाना काय अडचणी असतील, याचा अंदाज येतो. तरीही विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण घेण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

सरकार दखल घेणार

पवार म्हणाले, शिक्षण विस्तार करण्याची जबाबदारी राज्यकर्त्यांची आहे. महाविकास आघाडीतील सिनियर मंत्री छगन भुजबळ आपल्या बरोबर आहेत. त्यांच्या माध्यमातून तुमच्या मागण्या सरकारकडे मांडू. सरकार दखल घेईल, असे आश्वासन पवार यांनी यावेळी दिले. तसेच आपण मंत्री असताना शिक्षकांचं शिष्टमंडळ आपल्या मागण्या घेऊन यायचे. त्यांच्या मागण्या मान्य केल्या की कोट्यवधी रुपयांचे बर्डन येत होतं. याबाबत चव्हाण साहेबांनी मला विचारलं, मंत्रिमंडळात तुम्हाला कोणतं काम करायचं आहे? मी त्यांना सांगितलं शिक्षण खात्यातून माझी सुटका करा, कृषी खातं द्या, हा किस्सा ऐकताच एकच खसखस पिकली.

अनुदान प्रश्नासाठी बैठक

पवार म्हणाले, खासगी शिक्षण संस्थांच्या मागण्या राज्यसरकारकडे मांडाव्या लागतील. शिक्षण संस्थांच्या अनुदानाचा प्रश्न सोडवण्यासाठी नगरविकास, अर्थ मंत्री महामंडळ प्रतिनिधी यांची एकत्रित बैठक घ्यावी लागेल. त्यानंतरच हा प्रश्न सोडवावा लागेल. शिक्षण खात्याचा अति हस्तक्षेप नको, अशा काही शिक्षण संस्था चालकांच्या तक्रारी आहेत. त्यांचंही बरोबर आहे. सरकारी हस्तक्षेपाला मर्यादा हव्यात, पण संस्था चालकांनीही तारतम्य ठेवणं गरजेचं आहे, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

खासगी संस्थांनी काम वाढवलं

शरद पवार म्हणाले, महाराष्ट्रात शिक्षण विस्ताराची जबाबदारी एका ठराविक वर्गानंतर खासगी शिक्षण संस्थानी उचलली. अनेकांनी शिक्षणसंस्था सुरू केल्या. शिक्षणसंस्था वाढवण्याचं काम केलं. अनेक मान्यवरांनी शिक्षणसंस्था मोठ्या केल्या आणि ज्ञानदानाचं काम केलं. शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण करण्याचं काम खऱ्या अर्थानं महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी केलं. वैज्ञानिक दृष्टिकोन देण्याचं काम ज्योतिबा फुलेंनी केलं. शिक्षणाचा जागर करण्याचं काम खऱ्या अर्थानं महात्मा फुलेंनी केलं.

इतर बातम्याः

ST Strike: तुटेल एवढं ताणू नये; एकाच वाक्यात शरद पवारांचा राज्य सरकारला सल्ला!

Malegaon हिंसाचाराची भयंकर साखळीः 1 नगरसेवक, 1 आक्षेपार्ह क्लिप, 4 जणांकडून Viral

Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.