AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Accident: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात! कंटेनरने 20 वाहनांना उडवलं, 4 जणांचा मृत्यू

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात झाला आहे. एका ब्रेक निकामी झालेल्या कंटेनरने 20 वाहनांना धडक दिल्याचे समोर आले आहे. या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला असून 15 जण जखनी झाल्याची माहिती समोर आली आहे.

Accident: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात! कंटेनरने 20 वाहनांना उडवलं, 4 जणांचा मृत्यू
Accident
| Updated on: Jul 26, 2025 | 7:19 PM
Share

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात झाला आहे. एका ब्रेक निकामी झालेल्या कंटेनरने 20 वाहनांना धडक दिल्याचे समोर आले आहे. या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला असून 15 जण जखनी झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातानंतर एक्सप्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. तब्बल 5 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या असल्याची माहिती समोर आली आहे.

ब्रेक निकामी झाल्याने कंटेनरची 20 वाहनांना धडक

समोर आलेल्या माहितीनुसार, ब्रेक निकामी झाल्यानंतर कंटेनरने 20 वाहनांना धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, यात तीन वाहने पूर्णपणे चक्काचूर झाली आहे. इतर वाहनांचेही मोठे नुकसान झाले आहे. या अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर जवळपास 15 प्रवासी जखमी झाले आहेत, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर नेहमीच वाहनांची वर्दळ असते. वीकेंड असल्यामुळे वाहनांची गर्दी आहे. या अपघातामुळे वाहतूक ठप्प झाली आहे, त्यामुळे जवळपास 5 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रागा लागल्या असल्याची माहिती समोर आली आहे. खोपोलीजवळ नवीन बोगदा आणि फूडमॉल हॉटेल दरम्यान ही घटना घडली आहे.

मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर अपघात

समोर आलेल्या माहितीनुसार, लोणावळा खंडाळा घाटातून मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर कंटेनर ट्रकचा ब्रेक फेल झाला. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले व कंटेनर अनियंत्रित झाला. या कंटेनरने पुढे असणाऱ्या अनेक वाहनांना आणि ट्रकला धडक दिली, त्यामुळे या अपघातात बऱ्याच गाड्यांचे नुकसान झाले आहे. खोपोली पोलिस आणि बचाव पथके घटनास्थळी पोहोचली असून मदतकार्य सुरु आहे.

मोठी वाहतूक कोंडी

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरून दररोज दीड ते दोन लाखांहून अधिक वाहने प्रवास करतात. शनिवारी आणि रविवारी या मार्गावर जास्त गर्दी असते. अनेक पर्यटक लोणावळ्यात पर्यटनाचा आनंद घेतल्यानंतर मुंबईकडे परतत आहेत. मात्र हा अपघात झाल्याने मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. त्यामुळे वाहन चालकांना त्रासाचा सामना करावा लागत आहे.

Follow Us
निवडणूक आयोगाने जाहीर केली बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीची तारीख
निवडणूक आयोगाने जाहीर केली बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीची तारीख.
पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ विधानसभा निवडणुकीसाठी तारीखा जाहीर
पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ विधानसभा निवडणुकीसाठी तारीखा जाहीर.
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद.
पुणे मेट्रोला नागरिकांचा चांगला प्रतिसाद; प्रवासी संख्या अडीच लाखांवर
पुणे मेट्रोला नागरिकांचा चांगला प्रतिसाद; प्रवासी संख्या अडीच लाखांवर.
पुण्यात आणखी एका वैष्णवीने जीवन संपवलं; सासरच्या जाचाला कंटाळून....
पुण्यात आणखी एका वैष्णवीने जीवन संपवलं; सासरच्या जाचाला कंटाळून.....
बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीवर अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया
बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीवर अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया.
पदवी घ्यावी की नको, कारण मानद पदवी मिळाल्यानंतर फडणवीस असं का म्हणाले?
पदवी घ्यावी की नको, कारण मानद पदवी मिळाल्यानंतर फडणवीस असं का म्हणाले?.
महापौरांच्या गाडीवर लाल दिव्यावरून राजकारण तापलं
महापौरांच्या गाडीवर लाल दिव्यावरून राजकारण तापलं.
बारामती, राहुरी पोटनिवडणुकीबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
बारामती, राहुरी पोटनिवडणुकीबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानद डॉक्टर ऑफ सायन्स पदवी प्रदान
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानद डॉक्टर ऑफ सायन्स पदवी प्रदान.