AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Accident: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात! कंटेनरने 20 वाहनांना उडवलं, 4 जणांचा मृत्यू

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात झाला आहे. एका ब्रेक निकामी झालेल्या कंटेनरने 20 वाहनांना धडक दिल्याचे समोर आले आहे. या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला असून 15 जण जखनी झाल्याची माहिती समोर आली आहे.

Accident: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात! कंटेनरने 20 वाहनांना उडवलं, 4 जणांचा मृत्यू
Accident
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Jul 26, 2025 | 7:19 PM
Share

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात झाला आहे. एका ब्रेक निकामी झालेल्या कंटेनरने 20 वाहनांना धडक दिल्याचे समोर आले आहे. या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला असून 15 जण जखनी झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातानंतर एक्सप्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. तब्बल 5 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या असल्याची माहिती समोर आली आहे.

ब्रेक निकामी झाल्याने कंटेनरची 20 वाहनांना धडक

समोर आलेल्या माहितीनुसार, ब्रेक निकामी झाल्यानंतर कंटेनरने 20 वाहनांना धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, यात तीन वाहने पूर्णपणे चक्काचूर झाली आहे. इतर वाहनांचेही मोठे नुकसान झाले आहे. या अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर जवळपास 15 प्रवासी जखमी झाले आहेत, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर नेहमीच वाहनांची वर्दळ असते. वीकेंड असल्यामुळे वाहनांची गर्दी आहे. या अपघातामुळे वाहतूक ठप्प झाली आहे, त्यामुळे जवळपास 5 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रागा लागल्या असल्याची माहिती समोर आली आहे. खोपोलीजवळ नवीन बोगदा आणि फूडमॉल हॉटेल दरम्यान ही घटना घडली आहे.

मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर अपघात

समोर आलेल्या माहितीनुसार, लोणावळा खंडाळा घाटातून मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर कंटेनर ट्रकचा ब्रेक फेल झाला. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले व कंटेनर अनियंत्रित झाला. या कंटेनरने पुढे असणाऱ्या अनेक वाहनांना आणि ट्रकला धडक दिली, त्यामुळे या अपघातात बऱ्याच गाड्यांचे नुकसान झाले आहे. खोपोली पोलिस आणि बचाव पथके घटनास्थळी पोहोचली असून मदतकार्य सुरु आहे.

मोठी वाहतूक कोंडी

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरून दररोज दीड ते दोन लाखांहून अधिक वाहने प्रवास करतात. शनिवारी आणि रविवारी या मार्गावर जास्त गर्दी असते. अनेक पर्यटक लोणावळ्यात पर्यटनाचा आनंद घेतल्यानंतर मुंबईकडे परतत आहेत. मात्र हा अपघात झाल्याने मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. त्यामुळे वाहन चालकांना त्रासाचा सामना करावा लागत आहे.

Follow Us
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?