
राजकीय वर्तुळातू मोठी बातमी समोर येत आहे, राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेश सुरू असतानाच शिवसेना शिंदे गटाचे सर्वेसर्वा आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यांनी आपल्या या दौऱ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रयी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींसोबत दीड तास चर्चा केली. एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याची चर्चा सुरू असतानाच आता मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे एकनाथ शिंदे यांच्यानंतर आता मंत्री उदय सामंत देखील दिल्ली दौऱ्यावर आहेत.
राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. मात्र अधिवेशन सुरू असतानाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अचानक दिल्ली दौऱ्यावर गेल्यानं त्यांचा हा दौरा चांगलाच चर्चेत आला. त्यांनी आपल्या या दौऱ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. दरम्यान दुसरीकडे एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावर असातना आता मंत्री उदय सामंत हे देखील दिल्ली दौऱ्यावर आहेत. दोन्ही नेत्यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
दिल्ली दौऱ्याचं नेमकं कारण काय?
एकनाथ शिंदे यांनी आपल्या या दौऱ्याबद्दल माहिती देताना म्हटलं की ही एक सदिच्छा भेट होती. महाराष्ट्रासह देशातील प्रश्नांवर चर्चा झाली. चर्चा अतिशय सकारात्मक झाली. अधिवेशन सुरू असलं की मी दिल्लीला येत असतो, असं आपल्या या दौऱ्याबद्दल माहिती देताना एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. दरम्यान एकनाथ शिंदे यांच्यानंतर आता उदय सामंत देखील दिल्ली दौऱ्यावर आहेत.
पंतप्रधान मोदींसोबत चर्चा
दरम्यान यावेळी एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. त्यांनी मोदींसोबत दीड तास चर्चा केली. यावर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली. मी मोदी साहेबांची भेट घेतली आता विरोध त्यांचं नेहमीचं काम करतील टिका करण्याचं, पण मी त्यांना कामातून उत्तर देत राहील असं शिंदे यांनी म्हटलं आहे.