AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Santosh Deshmukh Case : ‘बदला घेणं, तेवढी एकच गोष्ट..’, फोटो पाहिल्यावर मनोज जरांगेंची पहिली प्रतिक्रिया

Santosh Deshmukh Case : फोटो व्हायरल झाल्यानंतर राजकीय घडामोडी घडत आहेत. मुख्यमंत्री अजित पवारांना भेटले. धनंजय मुंडे यांचा राजीनामा होईल अशी चर्चा आहे. त्यावर मनोज जरांगे यांनी उत्तर दिलं. "नुसत्या राजीनाम्याने होणार नाही. धनंज मुंडेवर 302 लावून त्याला पण जेलमध्ये टाका.

Santosh Deshmukh Case : 'बदला घेणं, तेवढी एकच गोष्ट..', फोटो पाहिल्यावर मनोज जरांगेंची पहिली प्रतिक्रिया
Manoj Jarange-Santosh Deshmukh
| Updated on: Mar 04, 2025 | 12:58 PM
Share

“संतोष भय्याला सुद्धा आनंद वाटला पाहिजे. जबाबदारी आपली आहे. टोकाच बोलतोय मी. आपल्या हातात तेवढी एकच गोष्ट आहे, संतोष भय्याच्या मृत्यूचा बदला घेणं. त्यांना सुटून येऊ द्या जसं यायच तसं. भयंकर कृत्य आहे. इतका राग येण्यासाठी सारखी चूक नाही. तुम्हाला एवढी चीड यावी एवढं काही झालं नव्हतं. वाद, भांडण तंटा हे चालू असतं पण तिरस्कार, क्रूर हत्या करण्याएवढं काही झालेलं नाही. यांना पैसा, पद एवढच लागतं, कोणत्याही टोकाला जातील” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूर, निदर्यतेने हत्या करण्यात आली. ते फोटो आता व्हायरल झालेत. हे फोटो समोर आल्यानंतर मनोज जरांगे आज धनंजय देशमुख यांना भेटायला आले. त्यावेळी देशमुख यांच्या भावनांचा बांध फुटला.

धनंजय देशमुख घरात जायची हिम्मत नाही म्हणतायत, त्यावर मनोज जरांगे म्हणाले की, “त्यांना जावं लागेल. मी सुद्धा कठोर काळजाचा आहे. एवढी घटना, फोटो बघितल्यावर कोणी पण खचून जाईल. त्यांना घरात जावं लागेल. बाहेर यावं लागेल. लढावं लागेल, बीमोड करायचा आहे” “सुटून बाहेर येऊ द्या. आता राहिले तर गोळ्या घालून फाशी होईपर्यंत लढावं लागेल. सुटून आले तर जशास तसं. आत राहिले तर फाशी होईपर्यंत लढावं लागेल” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

302 लावून त्याला पण जेलमध्ये टाका

फोटो व्हायरल झाल्यानंतर राजकीय घडामोडी घडत आहेत. मुख्यमंत्री अजित पवारांना भेटले. धनंजय मुंडे यांचा राजीनामा होईल अशी चर्चा आहे. त्यावर मनोज जरांगे यांनी उत्तर दिलं. “नुसत्या राजीनाम्याने होणार नाही. धनंज मुंडेवर 302 लावून त्याला पण जेलमध्ये टाका. नाटकबाजी करायला नको. जनता काही करु शकते” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. तुमच्या एका डोळ्यात पाणी आणि दुसऱ्या डोळ्यात आग दिसते. त्यावर “आपण पहिल्यापासून असाच आहे. अन्यायाचा बीमाोड करतो. पठ्ठाया कोणाला सोडीत नाही” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.