AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! राज्यात पुन्हा भूकंप? 24 आमदार फुटणार? आता शिंदे गट…

शिवसेना ठाकरे गटाला नुकताच मोठा धक्का बसला आहे, 9 पैकी तब्बल 6 खासदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आहे. त्यानंतर आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

मोठी बातमी! राज्यात पुन्हा भूकंप? 24 आमदार फुटणार? आता शिंदे गट...
MahaVikas AghadiImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 28, 2026 | 3:08 PM
Share

राज्याच्या राजकारणात वेगवान घडामोडी सुरू आहेत, नुकतीच शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट पडल्याचं पहायला मिळालं, ठाकरे गटाच्या 9 पैकी 6 खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. हा शिवसेना ठाकरे गटासाठी मोठा धक्का आहे. पक्षात मोठी फूट पडली आहे. त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. ज्या मतदारसंघात खासदारांनी बंडखोरी केली, त्या -त्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंच्या सभांचा धडका सुरू आहे. दरम्यान ज्या दिवशी शिवसेना ठाकरे गटाच्या खासदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला त्याच दिवशी उद्धव ठाकरे यांनी आपल्या आमदारांची बैठक बोलावली होती,  या बैठकीला 4 आमदारांनी दांडी मारली होती, त्यामुळे चर्चेला उधाण आलं होतं.

दरम्यान त्यानंतरची मोठी बातमी म्हणजे महाविकास आघाडीने आपल्या सर्व आमदारांची बैठक बोलावली होती, या बैठकीला 24 आमदार गैरहजर असल्याचं वृत्त समोर आलं होतं. यावर प्रतिक्रिया देताना आता मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी मोठं विधान केलं आहे. महाविकास आघाडीची मुंबईमध्ये जी बैठक झाली त्यानंतर ऑपरेशन आमदार याची चर्चा सुरू आहे. या बैठकीला 24 आमदार गैरहजर होते,  या आमदारांच्या मनात नक्की काय आहे?हे विचारलं पाहिजे, महाविकास आघाडीच्या नेतृत्वावरती सगळे नाराज आहेत,  स्वतःहून जर कोणी शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारत असतील तर त्याला आम्ही कशाला नाही म्हणू,  24 आमदार गैरहजर राहिले त्यांच्याशी आम्ही चर्चा करू त्यांची नाराजी काय आहे ते जाणून घेऊ असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान उदय सामंत यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. महाविकास आघाडीच्या खासदारांनंतर आता महाविकास आघाडीचे आमदार देखील फुटणार का? अस सवाल उपस्थित करण्यात येत आहे. यावेळी बोलताना उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरून देखील जोरदार हल्लाबोल केला आहे.  किती दिवस फिरतात ते बघू ना, ते फक्त गद्दार गद्दार गद्दारच म्हणतात. ज्यांनी महाराष्ट्राच्या जनतेसोबत गद्दारी केली त्यांनी गद्दारीची भाषा करू नये, असं सामंत यांनी म्हटलं आहे.

Follow Us
वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला,
Sachin ahir Worli | वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला, 'त्या' विधानाची सर्वत्र चर्चा
तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
Devendra Fadanvis | तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला, थेट मुख्यमंत्र्यावर आरोप, 16 एकर जागा...
वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात...
ST Bus | वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात, सुदैवाने जीवितहानी टळली
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP...
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP नेत्याच्या कुटुंबियाचाही समावेश
राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! तटकरेंच्या विरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार
Sunil Tatkare | राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! सुनील तटकरे यांच्या विरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार; नियुक्तीवरच सवाल
ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजुल पाटील शिंदे गटाच्या...
ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजुल पाटील शिंदे गटाच्या कार्यक्रमाला, ठाकरे गटाकडून थेट...
रेवती सुळेंच्या लग्नानंतर आता दिल्ली रिसेप्शनची चर्चा
रेवती सुळेंच्या लग्नानंतर आता दिल्ली रिसेप्शनची चर्चा; बड्या नेत्यांची उपस्थिती?
छत्रीचा माईक घेऊन शाळकरी मुली बनल्या रिपोर्टर! VIDEO पाहून तुम्हीही...
Karjat | छत्रीचा माईक घेऊन शाळकरी मुली बनल्या रिपोर्टर! कर्जतच्या रस्त्यांची पोलखोल; VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल…
एक माणूस रोज मंत्र्यांना शिव्या देतो, सरकार एक शब्दही बोलत नाही!
Laxaman Hake | एक माणूस रोज मंत्र्यांना शिव्या देतो, सरकार एक शब्दही बोलत नाही! लक्ष्मण हाके भडकले; OBC आरक्षणावरून सरकारलाही घेरलं