“शेतकऱ्यांना कधीही वाऱ्यावर सोडणार नाही”; मुख्यमंत्र्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शब्द दिला

राज्यात अवकाळी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असले तरी शेतकऱ्यांना आम्ही कधीही वाऱ्यावर सोडणार नाही कारण हे सरकार शेतकऱ्यांचे आहे असंही त्यांनी यावेळी सांगितले.

शेतकऱ्यांना कधीही वाऱ्यावर सोडणार नाही;  मुख्यमंत्र्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शब्द दिला
Follow us
| Updated on: Mar 26, 2023 | 6:26 PM

अहमदनगर : अवकाळी पावसाचा फटका मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रासह कोकणलाही बसला आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. हातातोंडीशी आलेली पीकं वाया गेल्याने आता आम्ही कसं जगायचं असा सवाल नुकसानग्रस्त शेतकरी करत आहेत. तर दुसरीकडे अहमदनगर दौऱ्यावर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नसल्याचे सांगत बळीराजाला दिलासा दिला आहे. त

महाएक्स्पो कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अहमदनगरला असताना त्यांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी हे सरकार भक्कमपणे उभा असल्याचे सांगत शेतकऱ्यांना त्यांनी सरकारचा विश्वास दिला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यावेळी बोलताना सांगितले की, शेतकरी हा आमचा केंद्रबिंदू आहे. आमच्या सरकारचा जो आमचा कारभार आहे तो शेतकरी हितासाठीच असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

महाएक्सपोसारख्या कार्यक्रमातून खूप काही शिकता येते असल्याचे सांगत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे त्यांनी कौतूकही केल.

सहकार चळवळीचा पाया या नगर जिल्ह्यात रोवला गेला आहे. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्याला वेगळा वारसा आहे. या अशा कार्यक्रमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळत असते.

त्यामुळे अशा एक्स्पोच्या आयोजन करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर या कार्यक्रमाचे ज्या ज्या लोकांनी आयोजन केले आहे त्या सर्व टिमचे अभिनंदनही करतो असंही त्यांनी यावेळी सांगितले.

हे सरकार शेतकऱ्यांचे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर आलेले संकट सोडवण्यासाठी आम्ही कटीबद्ध असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

शेतकऱ्यांच्या जनावरांवर आलेले संकट आणि लंपीसारख्या आलेल्या आजारानंतर पशुधन वाचवण्याचा विडा उचलला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

राज्यात अवकाळी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असले तरी शेतकऱ्यांना आम्ही कधीही वाऱ्यावर सोडणार नाही कारण हे सरकार शेतकऱ्यांचे आहे असंही त्यांनी यावेळी सांगितले.

Non Stop LIVE Update
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.