AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“शेतकऱ्यांना कधीही वाऱ्यावर सोडणार नाही”; मुख्यमंत्र्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शब्द दिला

राज्यात अवकाळी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असले तरी शेतकऱ्यांना आम्ही कधीही वाऱ्यावर सोडणार नाही कारण हे सरकार शेतकऱ्यांचे आहे असंही त्यांनी यावेळी सांगितले.

शेतकऱ्यांना कधीही वाऱ्यावर सोडणार नाही;  मुख्यमंत्र्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शब्द दिला
| Edited By: महादेव कांबळे | Updated on: Mar 26, 2023 | 6:26 PM
Share

अहमदनगर : अवकाळी पावसाचा फटका मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रासह कोकणलाही बसला आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. हातातोंडीशी आलेली पीकं वाया गेल्याने आता आम्ही कसं जगायचं असा सवाल नुकसानग्रस्त शेतकरी करत आहेत. तर दुसरीकडे अहमदनगर दौऱ्यावर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नसल्याचे सांगत बळीराजाला दिलासा दिला आहे. त

महाएक्स्पो कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अहमदनगरला असताना त्यांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी हे सरकार भक्कमपणे उभा असल्याचे सांगत शेतकऱ्यांना त्यांनी सरकारचा विश्वास दिला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यावेळी बोलताना सांगितले की, शेतकरी हा आमचा केंद्रबिंदू आहे. आमच्या सरकारचा जो आमचा कारभार आहे तो शेतकरी हितासाठीच असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

महाएक्सपोसारख्या कार्यक्रमातून खूप काही शिकता येते असल्याचे सांगत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे त्यांनी कौतूकही केल.

सहकार चळवळीचा पाया या नगर जिल्ह्यात रोवला गेला आहे. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्याला वेगळा वारसा आहे. या अशा कार्यक्रमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळत असते.

त्यामुळे अशा एक्स्पोच्या आयोजन करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर या कार्यक्रमाचे ज्या ज्या लोकांनी आयोजन केले आहे त्या सर्व टिमचे अभिनंदनही करतो असंही त्यांनी यावेळी सांगितले.

हे सरकार शेतकऱ्यांचे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर आलेले संकट सोडवण्यासाठी आम्ही कटीबद्ध असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

शेतकऱ्यांच्या जनावरांवर आलेले संकट आणि लंपीसारख्या आलेल्या आजारानंतर पशुधन वाचवण्याचा विडा उचलला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

राज्यात अवकाळी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असले तरी शेतकऱ्यांना आम्ही कधीही वाऱ्यावर सोडणार नाही कारण हे सरकार शेतकऱ्यांचे आहे असंही त्यांनी यावेळी सांगितले.

Follow Us
प्रशांत किशोर राष्ट्रवादीसोबत काम करणार की नाहीत? पार्थ पवारांनी...
प्रशांत किशोर राष्ट्रवादीसोबत काम करणार की नाहीत? पार्थ पवारांनी....
स्वत:चं मेडिकल कॉलेज, लेकाच्या नावापुढे डॉक्टर, मोटेगावकरचं स्वप्न...
स्वत:चं मेडिकल कॉलेज, लेकाच्या नावापुढे डॉक्टर, मोटेगावकरचं स्वप्न....
पंतप्रधान मोदींच्या आखाती दौऱ्यावरून पडळकरांचा मोठा दावा...
पंतप्रधान मोदींच्या आखाती दौऱ्यावरून पडळकरांचा मोठा दावा....
युद्धामुळे नितीन गडकरींच्या व्यवसायाला फटका, निर्यात रखडली; स्थानिक...
युद्धामुळे नितीन गडकरींच्या व्यवसायाला फटका, निर्यात रखडली; स्थानिक....
NEET प्रकरणी सुप्रीम कोर्टात नवी याचिका; NTA ऐवजी स्वतंत्र यंत्रणेकडून
NEET प्रकरणी सुप्रीम कोर्टात नवी याचिका; NTA ऐवजी स्वतंत्र यंत्रणेकडून.
मोठी बातमी! रोहित पवार अचानक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, राजकारणात...
मोठी बातमी! रोहित पवार अचानक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, राजकारणात....
रेल्वे प्रशासन ॲक्शन मोडमध्ये; मुंबईत अतिक्रमण हटाव मोहीम, गरीब नगरात
रेल्वे प्रशासन ॲक्शन मोडमध्ये; मुंबईत अतिक्रमण हटाव मोहीम, गरीब नगरात.
राहुल गांधींनी शेअर केला नरेंद्र मोदी यांचा परदेश दौऱ्यातील व्हिडीओ...
राहुल गांधींनी शेअर केला नरेंद्र मोदी यांचा परदेश दौऱ्यातील व्हिडीओ....
थरारक दृश्य! एक्सप्रेस रुळावरून घसरली अन् डब्बा थेट 20 फुटावर लटकला...
थरारक दृश्य! एक्सप्रेस रुळावरून घसरली अन् डब्बा थेट 20 फुटावर लटकला....
नागपूर विधानपरिषदेसाठी सर्वपक्षीय फॉर्म्युला? निवडणूक बिनविरोध.....
नागपूर विधानपरिषदेसाठी सर्वपक्षीय फॉर्म्युला? निवडणूक बिनविरोध......