AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मी शरद पवारांना काल ही दैवत मानत होतो, आज ही मानतो पण…, अजितदादांचं मोठं वक्तव्य

विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या नागरी सत्कार सोहळ्यात बोलत असताना अजित पवार यांनी शरद पवार यांच्यासंदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे.

मी शरद पवारांना काल ही दैवत मानत होतो, आज ही मानतो पण..., अजितदादांचं मोठं वक्तव्य
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 09, 2025 | 9:34 PM
Share

आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिपंरी -चिंचवडमध्ये बोलताना चौफेर फटकेबाजी केल्याचं पाहायला मिळालं.  ते  विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या नागरी सत्कार सोहळ्यात बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. मी शरद पवार यांना काल ही दैवत मानत होतो, आज ही दैवत मानतो, पण तळ्यात मळ्यात केल्यास निर्णय घेता येत नाहीत असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले अजित पवार? 

अण्णा बनसोडे हे गरीब कुटुंबातील कार्यकर्ते आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगून अण्णा बनसोडे यांना विधासभा उपाध्यक्ष केलं. पान टपरी चालवणारे अण्णा आता आमदार आहेत, आधी नगरसेवक होते, आता उपाध्यक्ष झाले आहेत. अण्णा बनसोडे यांना अपयश आले, तेव्हा, गौतम चाबुकस्वार आमदार झाले. परंतु  त्यांनी हार मानली नाही, ते  पुन्हा आमदार झाले. 1991 ला मी इथे आलो तेव्हा गाववाले आणि बाहेरचे अशी चर्चा खूप व्हायची, पण आता अण्णा बनसोडे हे देखील इथलेच झाले आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या टेरिफ धोरणामुळे जागतिक बाजारपेठेत खळबळ उडाली आहे. जगातील अनेक देश अमेरिकेत निर्यात करत आहेत. त्यांना याचा फटका बसत आहे. कोविड नंतरचं हे सर्वात मोठं संकट आहे. याला बाजूला सारून आपल्याला पुढे जायचं आहे.

माझ्या हातात हे शहर होतं. महापौर, विरोधी पक्षनेते, हे सर्व मी करायचो, माझा स्वार्थ मी कधी बघितला नाही. जनतेचा विकास करण्याचा हेतू डोळ्यासमोर ठेवला. नदी, कचरा हा महत्वाचा प्रश्न आहे. याबाबत काही जणांचं वेगळं म्हणणं आहे. त्यांच्या बोलण्यात तथ्य असेल तर आणि जनतेच्या अडचणीच ठरणार असेल तर एक पाऊल पुढे मागे टाकू, असंही यावेळी अजित पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान यावेळी बोलताना पुन्हा एकदा अजित पवार यांनी मिष्कील टोला लगावल्याचं देखील पाहायला मिळालं.  लोकसंख्या वाढायला वेळ लागत नाही. लोकांनी मनावर घेतल की लोकसंख्या वाढते, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.