AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मांसविक्री बंदी योग्य की अयोग्य, अजितदादांच्या भूमिकेमुळे नवा पेच; काय म्हणाले?

राज्यातील विविध ठिकाणी 15 ऑगस्ट रोजी मांसविक्रीवर बंधी घालण्याची निर्णय घेण्यात आला आहे. आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या मुद्द्यावर भाष्य केले आहे.

मांसविक्री बंदी योग्य की अयोग्य, अजितदादांच्या भूमिकेमुळे नवा पेच; काय म्हणाले?
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Aug 12, 2025 | 7:27 PM
Share

राज्यातील विविध ठिकाणी 15 ऑगस्ट रोजी मांसविक्रीवर बंधी घालण्याची निर्णय घेण्यात आला आहे. कल्याण डोंबिवली, नागपूर, मालेगाव, अमरावती, छत्रपती संभाजीनगरमध्ये ही बंदी घालण्यात आली आहे. मात्र महापालिकांच्या या निर्णयाचा अनेक लोकांनी विरोध केला आहे. अशातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या मुद्द्यावर भाष्य केले आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलं ते सविस्तर जाणून घेऊयात.

काय म्हणाले अजित पवार?

अजित पवार आज पत्रकारांशी संवाध साधत होते. यावेळी त्यांना मांसविक्ररीवरील बंदीबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, मी पण ती बातमी टीव्हीवर पाहिली. आता खरं तर श्रद्धेचा प्रश्न असतो त्यावेळी अशा प्रकराची बंदी घातली जाते. राज्यात काही जण शाकाहारी, काही मांसाहारी आहेत. कोकणात साधी भाजी करताना नॉनव्हेज असते, तो त्यांचा आहार आहे.

बंदी घालणं उचित नाही

पुढे बोलताना अजित पवार यांनी, ‘अशी बंदी घालणं उचित नाही. महत्त्वाच्या शहरात अनेक-जाती धर्माचे लोकं राहतात. भावनिक मुद्दा असेल तर लोकं ते स्वीकारतात करतात. मात्र 26 जानेवारी 1 ऑगस्टला मांसाहारावर बंदी घालायला लागले तर अवघडच आहे. हे माझं मत असे आहे, असं म्हणत मांसविक्रीच्या निर्णयाला विरोध केला आहे.

राज्य सरकारसमोर पेच…

अजित पवारांच्या या भूमिकेनंतर आता राज्य सरकार याबाबत काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मांस विक्रीवरील बंदी उठवायची की तशीच ठेवायची असा पेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर उभा राहिला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस काय निर्णय घेणार हे महत्वाचे ठरणार आहे.

खाटीक समाजाचा इशारा

कल्याण डोंबिवली शहरात रस्त्यांवरील खड्डे आहेत ,स्टेशन परिसरातील वाहतूक कोंडी आहे,पाणी समस्या आहे, अशी बरीच कामे कल्याण डोंबिवली महापालिकेला करण्यासारखे आहेत मात्र ती केली जात नाहीत 15 ऑगस्ट निमित्त चिकन व मटन विक्री बंद ठेवून ते आमच्या पोटावर पाय देतायत. त्यामुळे महापालिकेने हा निर्णय तत्काळ मागे घ्यावा अन्यथा येत्या 15 ऑगस्टला महापालिका मुख्यालयाच्या गेटवरच मटन विक्री करण्यात येईल असा इशारा खाटीक समाजाच्या वतीने देण्यात आला आहे.

Follow Us
जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती
ChandrakantPatil | जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती; पुढे म्हणाले...
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी फडणवीस-नबीन; सिद्धिविनायक मंदिरात...
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी CM फडणवीस- नितीन नबीन; सिद्धिविनायक मंदिरात घेतले बप्पांचे दर्शन!
जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल
Vijay Wadettiwar | जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल, म्हणाले...
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा