AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मांसविक्री बंदी योग्य की अयोग्य, अजितदादांच्या भूमिकेमुळे नवा पेच; काय म्हणाले?

राज्यातील विविध ठिकाणी 15 ऑगस्ट रोजी मांसविक्रीवर बंधी घालण्याची निर्णय घेण्यात आला आहे. आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या मुद्द्यावर भाष्य केले आहे.

मांसविक्री बंदी योग्य की अयोग्य, अजितदादांच्या भूमिकेमुळे नवा पेच; काय म्हणाले?
| Updated on: Aug 12, 2025 | 7:27 PM
Share

राज्यातील विविध ठिकाणी 15 ऑगस्ट रोजी मांसविक्रीवर बंधी घालण्याची निर्णय घेण्यात आला आहे. कल्याण डोंबिवली, नागपूर, मालेगाव, अमरावती, छत्रपती संभाजीनगरमध्ये ही बंदी घालण्यात आली आहे. मात्र महापालिकांच्या या निर्णयाचा अनेक लोकांनी विरोध केला आहे. अशातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या मुद्द्यावर भाष्य केले आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलं ते सविस्तर जाणून घेऊयात.

काय म्हणाले अजित पवार?

अजित पवार आज पत्रकारांशी संवाध साधत होते. यावेळी त्यांना मांसविक्ररीवरील बंदीबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, मी पण ती बातमी टीव्हीवर पाहिली. आता खरं तर श्रद्धेचा प्रश्न असतो त्यावेळी अशा प्रकराची बंदी घातली जाते. राज्यात काही जण शाकाहारी, काही मांसाहारी आहेत. कोकणात साधी भाजी करताना नॉनव्हेज असते, तो त्यांचा आहार आहे.

बंदी घालणं उचित नाही

पुढे बोलताना अजित पवार यांनी, ‘अशी बंदी घालणं उचित नाही. महत्त्वाच्या शहरात अनेक-जाती धर्माचे लोकं राहतात. भावनिक मुद्दा असेल तर लोकं ते स्वीकारतात करतात. मात्र 26 जानेवारी 1 ऑगस्टला मांसाहारावर बंदी घालायला लागले तर अवघडच आहे. हे माझं मत असे आहे, असं म्हणत मांसविक्रीच्या निर्णयाला विरोध केला आहे.

राज्य सरकारसमोर पेच…

अजित पवारांच्या या भूमिकेनंतर आता राज्य सरकार याबाबत काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मांस विक्रीवरील बंदी उठवायची की तशीच ठेवायची असा पेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर उभा राहिला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस काय निर्णय घेणार हे महत्वाचे ठरणार आहे.

खाटीक समाजाचा इशारा

कल्याण डोंबिवली शहरात रस्त्यांवरील खड्डे आहेत ,स्टेशन परिसरातील वाहतूक कोंडी आहे,पाणी समस्या आहे, अशी बरीच कामे कल्याण डोंबिवली महापालिकेला करण्यासारखे आहेत मात्र ती केली जात नाहीत 15 ऑगस्ट निमित्त चिकन व मटन विक्री बंद ठेवून ते आमच्या पोटावर पाय देतायत. त्यामुळे महापालिकेने हा निर्णय तत्काळ मागे घ्यावा अन्यथा येत्या 15 ऑगस्टला महापालिका मुख्यालयाच्या गेटवरच मटन विक्री करण्यात येईल असा इशारा खाटीक समाजाच्या वतीने देण्यात आला आहे.

Follow Us
नागपूरमध्ये गॅस सिलेंडर तुटवड्याची शक्यता; OTP शिवाय सिलेंडर नाही
नागपूरमध्ये गॅस सिलेंडर तुटवड्याची शक्यता; OTP शिवाय सिलेंडर नाही.
नाशिकच्या मिसळला युद्धाची झळ? मिसळ महागणार?
नाशिकच्या मिसळला युद्धाची झळ? मिसळ महागणार?.
सावित्रीबाई फुले विद्यापीठाजवळील डबल डेकर पुलावर प्रश्नचिन्ह
सावित्रीबाई फुले विद्यापीठाजवळील डबल डेकर पुलावर प्रश्नचिन्ह.
युद्ध भारताच्या सीमेवर आलंय, तरी षंडाची शांतता; राऊतांचा सरकारवर हल्ला
युद्ध भारताच्या सीमेवर आलंय, तरी षंडाची शांतता; राऊतांचा सरकारवर हल्ला.
राहुल गांधींकडे महत्त्वाची माहिती! संजय राऊतांचा मोठा खुलासा
राहुल गांधींकडे महत्त्वाची माहिती! संजय राऊतांचा मोठा खुलासा.
शेअर बाजारात वाढ! सेन्सेक्स 500 अकांनी तर निफ्टी 150 अकांनी वधारला
शेअर बाजारात वाढ! सेन्सेक्स 500 अकांनी तर निफ्टी 150 अकांनी वधारला.
दादांच्या अपघात प्रकरणी विमान कंपनीला वाचवल्याचा राऊतांचा आरोप
दादांच्या अपघात प्रकरणी विमान कंपनीला वाचवल्याचा राऊतांचा आरोप.
एपस्टिन फालईल हेच युद्धाचं खरं कारण! संजय राऊतांचा मोठा दावा
एपस्टिन फालईल हेच युद्धाचं खरं कारण! संजय राऊतांचा मोठा दावा.
युद्धाचा ड्रायफ्रुटच्या बाजाराला फटका; किमतीत 10 ते 5 टक्क्यांची वाढ
युद्धाचा ड्रायफ्रुटच्या बाजाराला फटका; किमतीत 10 ते 5 टक्क्यांची वाढ.
बंगळूरु हॉटेल्स बंद होणार? एलपीजी पुरवठा अचानक थांबला
बंगळूरु हॉटेल्स बंद होणार? एलपीजी पुरवठा अचानक थांबला.