AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut : अजितदादांच्या नावाने राजकारण करणारे अमानूष; संजय राऊत यांनी फटकारले

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासह अनेक विषयाची माझ्याकडे माहिती आहे. शरद पवार आणि सुप्रियाताईंशी आमची चर्चाही झाली. आता त्यावर चर्चा करण्याची वेळ नाही. वेळ द्यावा लागेल. थांबावं लागेल. राजकारण कोणासाठी थांबत नाही हे खरं आहे. पण तरीही आघात मोठा असल्याने थांबावं लागेल, असं संजय राऊत म्हणाले.

Sanjay Raut : अजितदादांच्या नावाने राजकारण करणारे अमानूष; संजय राऊत यांनी फटकारले
| Updated on: Jan 30, 2026 | 11:14 AM
Share

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अपघाती निधन झालं आहे. त्यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसला आहे. मात्र, अजितदादांच्या पार्थिवाला अग्नी देऊन 24 तासही झाले नाही तोच सुनेत्रा पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद देण्याची मागणी होऊ लागली आहे. तसेच दोन्ही राष्ट्रवादींचे विलिनिकरण करण्याची मागणीही जोर धरू लागली आहे. त्यावर संजय राऊत यांनी अत्यंत तिखट शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अजितदादांच्या जाण्याच्या धक्क्यातून अजून महाराष्ट्र सावरलेला नाही. त्यांच्या नावाने राजकारण करणारे हे अमानुष आहेत, अशा शब्दात संजय राऊत यांनी फटकारले आहे. संजय राऊत मीडियाशी संवाद साधत होते.

अजितदादांना कालच अग्नी दिला आहे. अजितदादांचं जाणं या धक्क्यातून महाराष्ट्र सावरलेला नाही. तरीही कोणी त्यांच्या नावाने राजकारण करत असेल तर ते चुकीचं आहे. अजितदादांचं जाणं हा त्यांच्या कुटुंबावरचा अघात मोठा आहे. मंत्रीबिंत्री वरचे सोडून द्या, दादांचे तळागाळातील कार्यकर्ते, सामान्य माणसं… ज्यांचा अजितदादांशी अनेक कारणाने संबंध आला. त्यांना बसलेला धक्का महत्त्वाचा आहे. अशावेळी पुढील 15 ते 20 दिवस राजकीय चर्चा करणे सर्वस्वी अमानुष आहे, असं संजय राऊत म्हणाले.

कुटुंबाने कर्ता पुरुष गमावलाय

अजितदादांच्या जाण्याने पोकळी निर्माण झाली आहे. जे काही राजकीय विषय असतील ते त्यांच्या पक्षांतर्गत आहेत. त्यांच्या पक्षांतर्गत विषयावर बोलणं योग्य नाही. किंवा कुटुंबाबाबतच्या निर्णयावर मत व्यक्त करणं योग्य नाही. कुटुंब पूर्णपणे कोलमडून पडलं आहे. पवार कुटुंबातील प्रत्येक घटकाच्या डोळ्यात अश्रू आणि हुंदके होते. राजकारण करायला आता कुणाला वेळ आहे? स्थिरस्थावर झाल्याशिवाय कोणी यावर बोलणार नाही. तुम्हीही असे प्रश्न विचारून त्या विषयाला फाटे फोडू नका. या विषयावर बोलणं अमानुष आहे. कोणी हा विषय काढला असेल, मग ते मंत्री असतील किंवा आमदार असतील तर ते अमानूष आणि कर्तव्य शून्य लोकं आहेत. कुटुंबाने कर्ता पुरुष गमावला आहे. त्यांच्या डोळ्यातून अश्रूधारा वाहत आहेत. अशावेळी कोणी नेतृत्व करावं यावर पत्ते आणि डाव खेळत असाल तर ते अमानूष आहे. त्यावर मी बोलणार नाहीॉ, असं राऊत यांनी स्पष्ट केलं.

चौकशी झाली पाहिजे

मी दोन मागण्या केल्या. त्या अराजकीय आहेत. डीजीसीच्या अंडर विमानाचं काम असतं. पायलट, मेंटेनन्स, वैधता, अवैधता त्यावर डीजीसीचं नियंत्रण असतं. अनेक अपघातात प्रमुख लोकांचं निधन झालं आहे. काही कमर्शिअल फ्लाईट्स कोसळल्या. अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं फ्लाईट कोसळलं. त्यात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचं निधन झालं. अशावेळी एखादा अपघात झाल्यावर चौकशी करण्याची घोषणा करता त्याचं काय होतं पुढे? बारामती एअरपोर्टला रडार नव्हतं अशी माहिती आहे. एटीसी नव्हती. कोणतीही यंत्रणा नव्हती. फक्त एक एअर स्ट्रीप होती आणि व्हीआयपीचे विमानं उतरत होते. हे जर खरं असेल तर अपघाताला जबाबदार एटीसी आहे. एटीसीची यंत्रणा नाही, रडारची यंत्रणा नाही. बारामती विमानतळावर पुरेसा स्टाफ नाही. त्या विमानतळावर अनेक महत्त्वाचे लोकं उतरतात. अगदी अजितदादांपासून गौतम अदानी ते शरद पवारांपर्यंत. मग अशा अपघाताला जबाबदार कोण? अशा अपघातांची सर्वांची चौकशी होणं गरजेचं आहे. आम्ही राज्यातील महत्त्वाचा माणूस गमावला आहे. याची डीजीपीला जबाबदारी घ्यावी लागेल. अशा प्रकारे विमानं चालू कसे देता? असा सवाल त्यांनी केला.

ज्या ज्या गोष्टी विमान संचलनासाठी आवश्यकता असतात त्या बारामती आणि देशातील इतर विमानतळावर नसतील तर डीजीसीए काय करतं. कुणाच्या मनात याबाबत प्रश्न का उपस्थित होऊ नये. व्हायलाच पाहिजे, असंही ते म्हणाले.

आरोप मागे घ्या

अजित पवारांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पान पान जाहिराती दिल्या. कौतुकास्पद आहे. आपल्या आघाडीतील नेत्यासाठी श्रद्धांजली वाहणं कौतुकास्पद आहे. पण याच भाजपने अजितदादांवर 70 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला. काहीच सिद्ध झालं नाही. मोदींनी आरोप केला. दादांवर खरोखर प्रेम असेल तर दादांवर जे आरोप केले ते तुम्ही मागे घ्या. तीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. ही अराजकीय मागणी आहे, असं राऊत म्हणाले.

आरोप करून काय मिळवलं?

आम्हीही तडफडलो की दादांवर आरोप करून काय मिळवलं? भुजबळ आणि प्रफुल्ल पटेलांवर आरोप केले. तेही सुटले. केवळ श्रद्धांजली वाहू नका. जयंत्या करू नका. ते आरोप विनाअट मागे घ्या. तीच अजितदादांना खरी श्रद्धांजली ठरेल. यात राजकारण नाही. अजितदादांची कोणती केस आहे कोर्टात? असेल तर मागे घ्या. आरोप खोटे असल्यानेच कॅबिनेटमध्ये घेतलं ना? आता खंदा सहकारी, मित्र म्हणतात कशासाठी? पंतप्रधान म्हणतात उत्कृष्ट प्रशासक वगैरे. अमित शाह यांनी सरकारचा प्रतिनिधी म्हणून श्रद्धांजली वाहिली ना? याचा अर्थ दादा निर्दोष आहेत. त्यामुळे त्यांच्यावरील आरोप मागे घ्या. ही मागणी नाही, विनंती आहे, असंही त्यांनी सांगितलं.

Follow Us
शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut On SC Hearing | शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर संजय राऊतांचा मोठा दावा
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात...
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात नेमकं काय घडलं?
कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून...
Kunbi Certficate | कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून मोठी अपडेट समोर!
गुंगी गुडिया वादावर शशिकांत शिंदे थेट बोलले; पवारांबाबत केलं मोठं....
Shashikant Shinde | गुंगी गुडिया वादावर शशिकांत शिंदे थेट बोलले; सुनेत्रा पवारांबाबत केलं मोठं विधान, म्हणाले...
शिवसेना चिन्हाचा निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? कोर्टात कपिल सिब्बल...
शिवसेना चिन्हाचा निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? कोर्टात कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; मात्र...
LIVE अपडेट्स! शिवसेना पक्ष, चिन्हाप्रकरणी सुनावणी सुरू; सुरतहून आमदार
LIVE अपडेट्स! शिवसेना पक्ष, चिन्हाप्रकरणी सुनावणी सुरू; सुरतहून आमदार गुवाहटीला गेले हा योगायोग...
केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत? यंदा 3 दिवसांचं विशेष...
केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत? यंदा 3 दिवसांचं विशेष अधिवेशन, नेमकी कसली चर्चा?
कर्जमाफीचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार?
मोठी बातमी! कर्जमाफीचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार जाणून घेण्यासाठी व्हिडीओ पहाच
अमित शाह तोंड लपवत आहेत; ते विद्यार्थ्यांचे गुन्हेगार - राहुल गांधींचा
Rahul Gandhi on Amit Shah | अमित शाह तोंड लपवत आहेत; ते विद्यार्थ्यांचे गुन्हेगार - राहुल गांधींचा थेट हल्ला!
दिल्लीत भेटीगाठी सुरू! राहुल गांधींसोबतच्या भेटीनंतर किरण रिजीजू थेट
दिल्लीत भेटीगाठी सुरू! राहुल गांधींसोबतच्या भेटीनंतर किरण रिजीजू यांची थेट अमित शाह यांच्यासोबत बैठक, पडद्याआड मोठ्या अडामोडी