AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajit Pawar : माईक घेतला, आज फडणवीसांनी एकनाथरावांकडे चिठ्ठी सरकवली! आता अजितदादा म्हणतात, मीडियाच्या नजरेतून काही सुटत नाही!

काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या समोरून फडणवीस आणि माईक घेतला त्यावरून ही अजित पवारांनी (Ajit Pawar) फडणवीस यांना आता जोरदार टोलेबाजी केली आहे.

Ajit Pawar : माईक घेतला, आज फडणवीसांनी एकनाथरावांकडे चिठ्ठी सरकवली! आता अजितदादा म्हणतात, मीडियाच्या नजरेतून काही सुटत नाही!
माईक घेतला, आज फडणवीसांनी एकनाथरावांकडे चिठ्ठी सरकवली! आता अजितदादा म्हणतात, मीडियाच्या नजरेतून काही सुटत नाही!Image Credit source: tv9
दादासाहेब कारंडे
दादासाहेब कारंडे | Updated on: Jul 14, 2022 | 7:47 PM
Share

मुंबई : आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत सरकारने काही मोठ्या घोषणा केल्या. मात्र या पत्रकार परिषदेत एक असा प्रकार घडला की ज्या प्रकाराने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आणि आता पुन्हा यावरून राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चिठ्ठी देण्यात आल्याची घटना कॅमेऱ्याचा कैद झाले आणि त्यानंतर आता विरोधकांकडून जोरदार टीका सुरू आहे. तसेच काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या समोरून फडणवीस आणि माईक घेतला त्यावरून ही अजित पवारांनी (Ajit Pawar) फडणवीस यांना आता जोरदार टोलेबाजी केली आहे. मीडियाच्या कॅमेऱ्यातून काही सुटत नाही, असा सूचक इशाराच अजित पवारांनी भाजपला दिलाय.

अजित पवार काय म्हणाले?

अजित पवार याबाबत बोलताना म्हणाले, उद्धव ठाकरे अडीच वर्षे मुख्यमंत्री राहिले असं दृश्य तुम्ही अडीच वर्षात कधी असं बघितलं का? मुख्यमंत्री म्हणून ठाकरे साहेबांचा मान मोठाच आहे तो आहेच. कारण ते मुख्यमंत्रीपदी विराजमान होते. उपमुख्यमंत्री म्हणून दोन नंबरला आम्ही काम करायचो. परंतू मी असा कधीही माईक खेचला नाही. पण सहज सांगता येतं की तुम्ही बोलताय त्याचं मी उत्तर देतो, मग त्यावेळी मुख्यमंत्र्यांनीच तो माईक तिकडे दिला असता. मात्र स्वतः माईक खेचायचं काहीच कारण नव्हतं, असा टोला अजित पवारांनी लगावला आहे.

आत्तापासून असं म्हटल्यावर…

तसेच तिथं काय झालं, नाव घेताना एकनाथराव शिंदे यांनी कोल्हापूरच्या बाबतीत धैर्यशील माने यांचं नाव घेतलं. त्यानंतर राजेश क्षीरसागर यांचं नाव घेतलं. मात्र ही नावं घेतल्यावर भाजपला वाटलं असेल आपल्या धनंजय महाडिकांचं नाव काही घेतलं नाही. त्यामुळे तसं झालं असावं सरकार चालवत असताना इतकं पक्षाच्या संदर्भात करायचं नसतं. शिवसेना असेल किंवा भाजपा असेल, शिवसेना ब गट म्हणायचं की शिंदे घट? हे आता देवालाच माहिती, पण त्याच्यामुळे अशा गोष्टी करू नये, अलीकडे मीडियाचे कॅमेरे इतक्या बारकाईने नजर ठेवून असतात की त्यांच्या नजरेतून काही सुटत नाही. त्यामुळे हे आत्ता तर सुरुवात आहे, सुरुवातीलाच अजून पूर्ण मंत्रिमंडळ अस्तित्वात न येता अशी ओढा ओढ असेल आणि अशी चिट्ट्या देणं सुरू झालं तर पुढे काय होणार आहे? हे महाराष्ट्राला सगळं पहावं लागेल, असे सूचक विधानही अजित पवारांनी केलं आहे.

Follow Us
खासगी विमानात बिघाड झाला, 45 मिनिटे उशीर तरी... VSR कंपनीतील विमानाची
खासगी विमानात बिघाड झाला, 45 मिनिटे उशीर तरी... VSR कंपनीतील विमानाच्या प्रवासाबाबत सुनेत्रा पवार काय म्हणाल्या?
राज्य थरथरलं! अनेक वर्ष चालला काळा कारभार, अल्पवयीन मुलीवर दोघं...भाजप
राज्य थरथरलं! अनेक वर्ष चालला काळा कारभार, अल्पवयीन मुलीवर दोघं... भाजप नगरसेविकेच्या भावाचं हादरवणारं कांड
गोकुळ गीते यांचं बंड आता थंड होण्याची दाट शक्यता?
Gokul Gite Nashik | नाशिकच्या राजकारणात गेमचेंजर घडामोड; गोकुळ गीते यांचं बंड आता थंड होण्याची दाट शक्यता
पाणी सोडलं नाही म्हणून थेट वस्तीवर हल्ला! बुलढाण्यात तुफान राडा
Buldhana News | पाणी सोडलं नाही म्हणून थेट वस्तीवर हल्ला! बुलढाण्यात तुफान राडा, 15 जण जखमी
मोठी बातमी! बड्या अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडलं; सापळा रचला अन् धडक कारवाई
मोठी बातमी! बड्या अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडलं; सापळा रचला अन् धडक कारवाई, चक्क 6 लाख...
पंढरपुरात राजकीय भूकंप! तीर्थक्षेत्र आघाडीचे 9 नगरसेवक भाजपच्या तंबूत
Pandharpur | पंढरपुरात राजकीय भूकंप! तीर्थक्षेत्र आघाडीचे 9 नगरसेवक भाजपच्या तंबूत
अखंडित काँग्रेस उभी राहणार? शरद पवार यांना पुढाकार घेण्याचं राऊतांचं
अखंडित काँग्रेस उभी राहणार? शरद पवार यांना पुढाकार घेण्याचं राऊतांचं आवाहन; देशात मोठ्या उलथापालथी होणार?
पंडित नेहरुंचा कार्यकाळ बारा नाहीतर सोळा वर्षांचा... संजय राऊतांनी
पंडित नेहरुंचा कार्यकाळ 12 नाहीतर 16 वर्षांचा... संजय राऊतांनी मांडलं गणित, काय म्हणाले?
जगातील सर्वात मोठ्या FIFA World Cup ला सुरुवात; भारत World Cup बाहेर?
FIFA World Cup 2026 | जगातील सर्वात मोठ्या FIFA World Cup ला सुरुवात; 104 सामन्यांचा रंगणार थरार, पण भारत पुन्हा World Cup बाहेर?
ब्रेक फेल नव्हता! दादर बेस्ट बस अपघातात RTO चा मोठा खुलासा
ब्रेक फेल नव्हता! दादर बेस्ट बस अपघातात RTO चा मोठा खुलासा; नेमकं कारण आलं समोर