‘परखड मत मांडल्यावर पूर्वी दोषी मानत, आता देशद्रोही ठरवलं जातं’, संमेलनाच्या व्यासपीठावरुन जावेद अख्तर यांचा भाजपवर निशाणा

लेखक जेव्हा सर्वसामान्य नागरिकाला जागृत करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ही बाब समाजातील काही लोकांना रुचत नाही हे योग्य नाही. आपलं परखड मत समाजापुढे मांडल्यावर पूर्वी काही लोक दोषी मानत होते. आता तर देशद्रोही ठरविले जात असल्याची खंत आहे, असं अख्तर म्हणाले.

'परखड मत मांडल्यावर पूर्वी दोषी मानत, आता देशद्रोही ठरवलं जातं', संमेलनाच्या व्यासपीठावरुन जावेद अख्तर यांचा भाजपवर निशाणा
छगन भुजबळ, जावेद अख्तर
Follow us
| Updated on: Dec 04, 2021 | 12:15 AM

नाशिक : 94 व्या अखिल भारतीयमराठी साहित्य संमेलनाच्या (Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan) उद्घाटन आज पार पडलं. या संमेलनाला प्रमुख पाहुणे असलेले जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी साहित्य संमेलनाच्या वासपीठावरुन भाजपवर निशाणा साधला. लेखक जेव्हा सर्वसामान्य नागरिकाला जागृत करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ही बाब समाजातील काही लोकांना रुचत नाही हे योग्य नाही. आपलं परखड मत समाजापुढे मांडल्यावर पूर्वी काही लोक दोषी मानत होते. आता तर देशद्रोही ठरविले जात असल्याची खंत आहे, असं अख्तर म्हणाले.

साहित्य आणि राजकारण याच नातं काय हा प्रश्न नेहमीच उभा राहतो. मात्र साहित्य आणि राजकारण याच घनिष्ठ नातं असल्याचंही अख्तर यांनी सांगितलं. तसंच मराठी साहित्याच्या दरबारात येण्याची संधी मिळाली ही अतिशय आनंदाची बाब असून या मातीला मी प्रणाम करतो. मातृभाषा आपल्याला भूतकाळातून वर्तमानात आणते असे मत देखील त्यांनी यावेळी मांडले.

‘साहित्यिकांनी राजकारणाच्या दबावाला बळी पडू नये’

लोकशाही व्यवस्थेसाठी कुठलाही बंधनात न वावरणे अतिशय महत्वाचे आहे. साहित्यिकांनी राजकारणाच्या दबावाला बळी पडू नये. त्यांनी मुक्तपणे साहित्य लिहावे, कुठल्याही कवी, लेखकावर अन्याय होत असेल तर सर्व लेखकांनी त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे, असं आवाहनही त्यांनी केलं. जो बात कहते डरते है सब तु वो बात लिख, इतनी अंधेरी न थी रात पहले लिख, असे म्हणत जावेद अख्तर यांनी लेखकांना निर्भीडपणे लिहीण्यासाठी साद घातली.

नाशिक हे माझ्यासाठी अजिंठा आणि वेरूळ- विश्वास पाटील

‘मराठी साहित्यासाठी काम करताना या गोदेच्या काठावर अधिक सुंदर लिहीण्याचा प्रयत्न करेल असे प्रतिपादन 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी केले आहे. लोकहितवादी मंडळ आयोजित अखिल भारतीय साहित्य मंडळाचे 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुसुमाग्रजनगरी मेट भुजबळ नॉलेज सिटी नाशिक येथे उद्घाटन सोहळा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.

साहित्य संमेलन मला एका चमत्कारासारखे वाटते. पावसाचा व्यत्यय असतांना वाघासारखे पुढे येऊन छगन भुजबळ यांनी दिवस रात्र काम करून हे सर्व संमेलन स्थळ उभं केलं. यामागे कुसुमाग्रज, वसंत कानेटकरांच्या भूमीची प्रेरणा आहे. नाशिक हे माझ्यासाठी अजिंठा आणि वेरूळ आहे. तात्यासाहेब यांचे घर हे माझ्यासाठी अजिंठा तर कानेटकरांचे घर हे वेरूळ असल्याचे सांगत, यामध्ये पानिपत ही कादंबरी महत्वाची आहे असे त्यांनी सांगितले.

इतर बातम्या :

‘पुण्याचं पाणी पळवतील त्यांना पुणेकर पाणी पाजल्याशिवाय राहणार नाहीत’, देवेंद्र फडणवीसांचा अजित पवारांवर निशाणा

Video : मुंबईत शिवसेना-भाजप नगरसेवक आमनेसामने! यशवंत जाधवांना भाजप नगरसेवकांनी घेरलं

Non Stop LIVE Update
एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांना हायकोर्टाचा झटका, थेट जन्मठेप
एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांना हायकोर्टाचा झटका, थेट जन्मठेप.
फडणवीसांना तुरूंगात टाका, 'त्या' वक्तव्यावरून ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
फडणवीसांना तुरूंगात टाका, 'त्या' वक्तव्यावरून ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल.
'प्रणितीला पक्षात घेण्यासाठी भाजपनं...',सुशील कुमार शिंदेंचं मोठ विधान
'प्रणितीला पक्षात घेण्यासाठी भाजपनं...',सुशील कुमार शिंदेंचं मोठ विधान.
मला ग्रेट भेटीच..., राज ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावर अमित ठाकरेंची पोस्ट
मला ग्रेट भेटीच..., राज ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावर अमित ठाकरेंची पोस्ट.
संजय राऊत डोक्यावर पडलेले..., भाजपच्या नेत्याचा हल्लाबोल
संजय राऊत डोक्यावर पडलेले..., भाजपच्या नेत्याचा हल्लाबोल.
मनसे पक्ष महायुतीमध्ये सहभागी होणार का?संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
मनसे पक्ष महायुतीमध्ये सहभागी होणार का?संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया.
मी लंगोट घालून तयार, मला भाजपला... वसंत मोरे यांनी थोपडले दंड
मी लंगोट घालून तयार, मला भाजपला... वसंत मोरे यांनी थोपडले दंड.
दानवेंची मनसे नेत्यानं काढली अक्कल, पद मिळालं म्हणून...,कुणाचा पलटवार?
दानवेंची मनसे नेत्यानं काढली अक्कल, पद मिळालं म्हणून...,कुणाचा पलटवार?.
दानवे 8-10 दिवसांत आमच्यासोबत..., शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा
दानवे 8-10 दिवसांत आमच्यासोबत..., शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा.
भाजप सोडल्यानंतर तुम्हाला कुत्रंही…कुणी केला खडसेंवर जोरदार पलटवार?
भाजप सोडल्यानंतर तुम्हाला कुत्रंही…कुणी केला खडसेंवर जोरदार पलटवार?.