AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आंबेनळी घाटात पुन्हा अपघात, 58 प्रवाशांसह बस कोसळली

अक्कलकोट-महाड एसटी बसला बुधवारी रात्री पावणेआठ वाजताच्या सुमारास आंबेनळी घाटात अपघात झाला.

आंबेनळी घाटात पुन्हा अपघात, 58 प्रवाशांसह बस कोसळली
| Updated on: Oct 31, 2019 | 10:25 AM
Share

रायगड : पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाटात पुन्हा एकदा बस कोसळून भीषण अपघात (Ambenali Ghat Bus Accident) झाला आहे. या अपघातामध्ये बसमधील 58 प्रवाशांपैकी 27 जण जखमी झाले आहेत. या अपघातामुळे वर्षभरापूर्वी आंबेनळी घाटात झालेल्या भीषण अपघाताच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.

आंबेनळी घाटातील दरीत एसटी बस कोसळून 27 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींवर पोलादपूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सात जखमींना महाडला हलवण्यात आलं आहे.

अक्कलकोट-महाड (एमएच 20 बीएल 3236) या गाडीला काल (बुधवारी) रात्री पावणेआठ वाजताच्या सुमारास अपघात झाला. पायटे गावाजवळ समोरुन येणाऱ्या गाडीला साईड देताना एसटी बस 200 फूट खोल दरीला असलेल्या एका संरक्षण कठड्यावर धडकली.

ही धडक इतकी जबरदस्त होती, की कठडा तुटून बस जवळपास 30 फुटांपर्यंत खाली घसरली. मात्र झाडीत अडकल्यामुळे सुदैवाने बस थांबली आणि मोठा अनर्थ टळला.

बसमध्ये वाहक, चालक यांच्यासह एकूण 58 प्रवासी असल्याची माहिती आहे. अपघात झाल्याची माहिती समजताच दीड किलोमीटरवर असलेल्या पायटेवाडीतील ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना बसमधून बाहेर काढलं.

‘त्या’ अपघाताच्या आठवणी ताज्या

दापोलीतील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कर्मचारी 28 जुलै 2018 रोजी पावसाळी सहलीनिमित्त महाबळेश्वरला निघाले होते. त्यावेळी आंबेनळी घाटात बस कोसळून (Ambenali Ghat Bus Accident) 31 पैकी 30 जण जागीच मृत्युमुखी पडले होते.

सहलीसाठी कर्मचाऱ्यांनी विद्यापीठाची बस भाड्याने घेतली होती. सकाळी सहाच्या सुमारास ही बस महाबळेश्वरच्या दिशेने जात होती. साडेदहाच्या सुमारास ही बस आंबेनळी घाटात कोसळली. या अपघातात बसचा अक्षरशः चेंदामेंदा झाला होता. बसमधील 31 पैकी 30 जणांचा जागीच मृत्यू झाला. मात्र प्रकाश सावंत देसाई हे आश्चर्यकारकरित्या बचावले.

प्रकाश सावंत देसाई हे खोल दरीतून वर आले आणि त्यांनी मोबाइलवरुन विद्यापीठातील अधिकाऱ्यांना बस अपघाताची माहिती दिली. त्यानंतर देसाईच अपघाताला कारणीभूत असल्याचा आरोप बहुसंख्य मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनी केला होता.

संबंधित बातम्या  

आंबेनळी घाट दुर्घटनेप्रकरणी पहिला गुन्हा दाखल  

अंबेनळी बस अपघात : प्रकाश सावंत देसाईंवर गुन्हा दाखल करण्यासाठी दापोलीकर आक्रमक  

झेडपी निवडणुकांवर टांगती तलवार; 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलांडून....
झेडपी निवडणुकांवर टांगती तलवार; 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलांडून.....
कांदा-मका दरघसरणीविरोधात चांदवडमध्ये शेतकऱ्यांचे आमरण उपोषण
कांदा-मका दरघसरणीविरोधात चांदवडमध्ये शेतकऱ्यांचे आमरण उपोषण.
पैश्यातून सत्ता आणि सत्तेतून पैसा ही एकमेव भाजपची भूमिका
पैश्यातून सत्ता आणि सत्तेतून पैसा ही एकमेव भाजपची भूमिका.
सांगलीमध्ये शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी भव्य मोर्चा
सांगलीमध्ये शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी भव्य मोर्चा.
माझा जवळचा मित्र गमावला; अजितदादांच्या आठवणींना उजाळा देताना....
माझा जवळचा मित्र गमावला; अजितदादांच्या आठवणींना उजाळा देताना.....
उद्धव ठाकरेंनी अजितदादांच्या निधनावर व्यक्त केला शोक, म्हणाले...
उद्धव ठाकरेंनी अजितदादांच्या निधनावर व्यक्त केला शोक, म्हणाले....
तर दादा त्यांना झापायचे; एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
तर दादा त्यांना झापायचे; एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?.
अजित पवारांच्या विमान अपघातावर मोठी शंका; आव्हाडांनी ब्लॅक बॉक्सवर...
अजित पवारांच्या विमान अपघातावर मोठी शंका; आव्हाडांनी ब्लॅक बॉक्सवर....
मला कुणी विचारलंच नाही, तर मी का बोलू! जितेंद्र आव्हाड स्पष्टच बोलले
मला कुणी विचारलंच नाही, तर मी का बोलू! जितेंद्र आव्हाड स्पष्टच बोलले.
पहाटेचा शपथविधी, अजितदादा का नाराज व्हायचे? फडणवीसांनी सांगितला किस्सा
पहाटेचा शपथविधी, अजितदादा का नाराज व्हायचे? फडणवीसांनी सांगितला किस्सा.