AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! ठाकरे बंधूंकडून युतीचे संकेत, मनसेचा बडा नेता नाराज, म्हणाला अशी अभद्र…

मनसे आणि शिवसेना ठाकरे गट एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे, मात्र मनसे नेते अमेय खोपकर यांनी ट्विट करत यावर नाराजी व्यक्त केली आहे.

मोठी बातमी! ठाकरे बंधूंकडून युतीचे संकेत, मनसेचा बडा नेता नाराज, म्हणाला अशी अभद्र...
| Updated on: Apr 19, 2025 | 7:38 PM
Share

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे गटासोबत युतीसंदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे. महाराष्ट्राच्या अस्तित्वापुढे भांडणं, वाद या क्षुल्लक गोष्टी असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी देखील राज ठाकरे यांच्या या वक्तव्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. ‘मी किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला तयार आहे. सर्व मराठी माणसांच्या हितासाठी मी एकत्र यायला तयार आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. त्यानंतर आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

एकीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या या भूमिकेचं शिवसैनिकांकडून आणि काही ठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांकडून देखील स्वागत होत आहे. मात्र मनसे नेते अमेय खोपर यांनी मात्र यावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी ट्विट करत निशाणा साधला आहे. ‘अशी अभद्र युती होऊ नयेत, हीच ईश्वर चरणी प्रार्थना’ असं खोपकर यांनी म्हटलं आहे.

उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले? 

युतीसंदर्भात बोलताना राज ठाकरे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.  “कुठल्याही मोठ्या गोष्टी, आमच्यातले वाद, आमची भांडणं किरकोळ आहेत. महाराष्ट्र खूप मोठा आहे. महाराष्ट्राच्या अस्तित्त्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्त्वासाठी ही भांडणं, वाद अत्यंत क्षुल्लक गोष्टी आहेत. एकत्र येणं, एकत्र राहणं या फार कठीण गोष्टी आहेत, असं मला वाटत नाही,” असं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं. राज ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर आता उद्धव ठाकरे यांच्याकडून देखील युतीचे संकते देण्यात आले आहेत.  मी किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला तयार आहे. सर्व मराठी माणसांच्या हितासाठी मी एकत्र यायला तयार आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे येत्या काळात मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाची युती होणार का हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. महाविकास आघाडीच्या घटक पक्षांकडून देखील राज ठाकरे यांच्या या भूमिकेचं स्वागत करण्यात आलं आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.