AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amravati Curfew | अमरावतीत परिस्थिती नियंत्रणात, इंटरनेट सेवा शुक्रवारपर्यंत बंद, अकोटमध्येही संचारबंदी कायम

अमरावती शहरातील परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे. मात्र, तरीही खबरदारी म्हणून अमरावतीमध्ये अद्यापही संचारबंदी कायम असणार आहे. तसेच शहरातील इंटरनेट सेवा शुक्रवार (19 नोव्हेंबर) दुपारी 3 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. दरम्यान, आज बुधवार (17 नोव्हेंबर) दुपारी 12 ते 4 या वेळात शहरात कर्फ्यूमधून शिथिलता देण्यात येणार आहे.

Amravati Curfew | अमरावतीत परिस्थिती नियंत्रणात, इंटरनेट सेवा शुक्रवारपर्यंत बंद, अकोटमध्येही संचारबंदी कायम
Amravati Curfew
| Edited By: | Updated on: Nov 17, 2021 | 10:30 AM
Share

अमरावती : त्रिपुरा (Tripura Violence) येथील हल्ल्याच्या निषेधार्थ अमरावतीत (Amravati) 12 नोव्हेंबर रोजी निघालेल्या रॅलीला हिंसक वळण लागले होते. याचे पडसाद दुसऱ्या दिवशीही अमरावतीत दिसून आले. शहरातील अनेक ठिकाणी जाळपोळ आणि तोडफोडही करण्यात आली होती. त्यामुळे जवळपास दोन दिवस अमरावती शहरात प्रचंड दहशतीचं वातावरण होतं. त्यानंतर शहरात संचारबंदी लागू करण्यात आली होती. मात्र, सध्या अमरावतीत परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती आहे. मात्र, संचारबंदी कायम असणार आहे.

अमरावती शहरातील परिस्थिती नियंत्रणात, संचारबंदी कायम

अमरावती शहरातील परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे. मात्र, तरीही खबरदारी म्हणून अमरावतीमध्ये अद्यापही संचारबंदी कायम असणार आहे. तसेच शहरातील इंटरनेट सेवा शुक्रवार (19 नोव्हेंबर) दुपारी 3 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. दरम्यान, आज बुधवार (17 नोव्हेंबर) दुपारी 12 ते 4 या वेळात शहरात कर्फ्यूमधून शिथिलता देण्यात येणार आहे.

सध्या अमरावती शहरात शांतता असल्याने संचारबंदीत जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदी आणि इतर महत्वाच्या कामासाठी 4 तासांची शिथिलता देण्यात आली आहे. परिस्थिती सामान्य झाल्यावर संचारबंदी पूर्णत: हटवली जाईल. मात्र, सध्या संचारबंदी कायम राहणार असून, इंटरनेट सेवाही बंदच राहील. आठवड्याच्या शेवटी शहरातील परिस्थितीचा आढावा घेऊन संचारबंदीत शिथिलता किती द्यायची, याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.

अकोटमध्येही शुक्रवारपर्यंत संचारबंदी कायम

अकोला जिल्हातल्या अकोटमध्ये शुक्रवारपर्यंत संचारबंदी कायम असणार आहे. अकोट शहरातील एका भागात 12 नोव्हेंबरला दगडफेकीची घटना उघडकीस आल्यानंतर प्रशासनाने 13 आणि 14 नोव्हेंबर अशी 24 तासांची संचारबंदी लागू केली होती. त्यानंतर पुन्हा कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून प्रशासनाने 14 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबरपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली होती. दरम्यान,आता पुन्हा 19 नोव्हेंबर शुक्रवारपर्यंत संचारबंदी वाढविण्यात आली आहे. तर, अकोट शहरातील इंटरनेट सेवा 19 नोव्हेंबरपर्यंत बंदच असणार आहे.

काय घडलं होतं अमरावतीत?

अमरावतीत 12 नोव्हेंबर रोजी अमरावतीत मुस्लिम समाजाने काढलेला मोर्चाला हिंसक वळण मिळाले होते. या हिंसक कारवायांचा निषेध करत भारतीय जनता पार्टीने अमरातीत 13 नोव्हेंबर रोजी अमरावती बंदचे आवाहन केले. यातदेखील भाजप व हिंदुत्ववादी संघटनांनी जाळपोळ आणि तोडफोड केली. त्यामुळे शनिनारी 1 वाजेपासून अमरावतीत संचारबंदी लागू करण्यात आली. तसेच शहरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती.

12 नोव्हेंबरच्या घटनांमध्ये 11, तर 13 नोव्हेंबरच्या घटनांमध्ये 24 असे एकूण 35 गुन्हे आतापर्यंत दाखल झाले आहेत. तोडफोड व जाळपोळ प्रकरणी हे 35 गुन्हे नोंदवण्यात आले असून, एकूण 188 संशयितांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक राजेंद्र सिंह यांनी मंगळवारी दिलीये.

संबंधित बातम्या :

अमरावतीपाठोपाठ अकोल्यातील अकोटमध्येही संचारबंदी, दगडफेकीच्या घटनेनंतर तात्काळ निर्णय

अमरावती हिंसाचारः माजी मंत्री अनिल बोंडेंसह भाजप नेत्यांना अटक, पालकमंत्र्यांचा इशारा, दंगल घडवणाऱ्यांना सोडणार नाही!

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.