AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Anil Bonde : खासदार झाल्यानंतर पहिल्यांदा अमरावतीत दाखल होताच अनिल बोंडेंचं जंगी स्वागत, ठाकरे सरकारवरही डागली तोफ

. दिवसभर झालेल्या स्वागतांनी मी भारावून गेलो अशी प्रतिक्रिया अनिल बोंडे यांनी ठिकठिकाणी झालेल्या स्वागतानंतर दिली आहे. तसेच त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांनाही काही कानमंत्र दिले आहेत.

Anil Bonde : खासदार झाल्यानंतर पहिल्यांदा अमरावतीत दाखल होताच अनिल बोंडेंचं जंगी स्वागत, ठाकरे सरकारवरही डागली तोफ
खासदार झाल्यानंतर पहिल्यांदा अमरावतीत दाखल होताच अनिल बोंडेंचं जंगी स्वागत, ठाकरे सरकारवरही डागली तोफImage Credit source: tv9
| Updated on: Jun 12, 2022 | 11:25 PM
Share

अमरावती : राज्यसभा निवडणुकीत (Rajyasabha Election) दणदणीत विजयानंतर खासदार अनिल बोंडे (Anil Bonde)आज पहिल्यांदा अमरावतीत दाखल झाले. यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांकडून त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. हे स्वागत एकाच ठिकाणी झालं नाही तर अनेक ठिकाणी झालं. यावेळी अनिल बोंडे यांनी अमरावतीतून पुन्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. अनिल बोंडेचे त्यांच्या निवासस्थानी कुटुंबीयांकडून जंगी स्वागत करण्यात आलं. या स्वागतावेळी खासदार अनिल बोंडेंनीही कुटुंबासह ढोलताशावर ठेका धरल्याचे दिसून आले. तसेच बहीण संगीता शिंदे यांनी भाऊ अनिल बोंडेंचे यावेळी औक्षण केलं. दिवसभर झालेल्या स्वागतांनी मी भारावून गेलो अशी प्रतिक्रिया अनिल बोंडे यांनी ठिकठिकाणी झालेल्या स्वागतानंतर दिली आहे. तसेच त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांनाही काही कानमंत्र दिले आहेत.

चांगला नेता आणि चांगला झेंडा हवा

राज्यसभा निवडणूकित भाजपच्या तिन्ही उमेदवारांची जबाबदारी पक्षाने घेतली. आम्हाला शेवटपर्यंत माहीत नव्हतं कोणाला किती मतांचा कोटा मिळाला? आता जिल्ह्यात युती कोणाशी नाही, आपण स्वबळावर निवडणुका लढवू, अशी हाक त्यांनी यावेळी दिली. तसेच  स्वतःचा अहंकार सोडून मी कोण आहे हे विसरुन पक्षासाठी काम करा. नाहीतर आपलेच लोक आपला पराभव करतात, असा सल्ला अनिल बोंडे यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. तर आपला एक उमेदवार पडला असता तर संजय राऊत काय बोलले असते हा विचार करा. विजय खेचून आणायचा असेल तर आपल्याला मधील मी पणा विसरायचा, असेही ते म्हणाले. युद्ध जिंकायला चांगला नेता पाहिजे, चांगला झेंडा पाहिजे, असे म्हणत त्यांनी फडणवीसांचं कौतुकही केलं आहे.

अनेक ठिकाणी जंगी स्वागत

भाजपचे नवनिर्वाचित खासदार डॉ. अनिल बोंडें भाजप कार्यालयात पोहोचले तेव्हाही त्यांचं त्याठिकाणी स्वागत करण्यात आलं. अगदी शहरात अगमन होताच  शेकडो कार्यकर्त्यांनी फटाके, बँड वाजवत त्यांची मिरवणूकही काढली. यावेळी एक वेगळेपण दिसून आले ते म्हणजे रूंगणे घेऊन एक शेतकरी त्यांच्या स्वागताला आलेला दिसला. त्यानंतर अनिल बोंडे यांनी गुरुकुंज मोझरीत राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या महासमाधीचे दर्शन घेतले. अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने ग्रामगीता देऊन खासदार डॉ अनिल बोंडे यांचा सन्मानही करण्यात आला.

महाविकास आघाडीवर पुन्हा सडकून टीका

अनिल बोंडे अमरावतीत दाखल होताच त्यांनी महाविकास आघाडीतील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेवर निशाणा साधला आहे. मंत्र्यांना मुख्यमंत्री भेटत नसल्याची टीका अनिल बोंडे यांनी केली आहे. लहान पक्षातील आणि अपक्ष आमदार देखील महाविकास आघाडी सरकारला कंटाळले असल्याचे देखील त्यांनी वक्तव्य केल आहे. महा विकास आघाडी सरकारमधील मंत्री आमदार काम घेऊन गेल्यास त्याला कमिशन मागतात. सर्वसामान्य लोकांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. मात्र शंभर कोटी जमा करायला त्यांच्याकडे वेळ आहे. अशी बोचरी टीका खासदार अनिल बोंडे यांनी केली आहे.

अजितदादांचा घात की अपघात; संजय राऊतांच्या विधानाचीही चर्चा!
अजितदादांचा घात की अपघात; संजय राऊतांच्या विधानाचीही चर्चा!.
अंडर 19 वर्ल्ड कप जिंकल्यावर कॅप्टन आयुष्यच्या कुटुंबात मोठा जल्लोष
अंडर 19 वर्ल्ड कप जिंकल्यावर कॅप्टन आयुष्यच्या कुटुंबात मोठा जल्लोष.
मालेगावच्या महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक संपल्यानंतर मोठी दुर्घटना
मालेगावच्या महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक संपल्यानंतर मोठी दुर्घटना.
मुंबई पालिकेत 16 फेब्रुवारीला विरोधी पक्षनेता नेमणार
मुंबई पालिकेत 16 फेब्रुवारीला विरोधी पक्षनेता नेमणार.
92 वर्षाचे आजोबा आणि 90 वर्षाच्या आजीचे मतदान
92 वर्षाचे आजोबा आणि 90 वर्षाच्या आजीचे मतदान.
आम्ही अपशकुन करणार नाही! महापौरपदाबाबत किशोरी पेडणेकरांचं मोठं विधान
आम्ही अपशकुन करणार नाही! महापौरपदाबाबत किशोरी पेडणेकरांचं मोठं विधान.
सांगली बलगडवेमध्ये ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार
सांगली बलगडवेमध्ये ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार.
रितू तावडेंनी व्यक्त केला मुंबईच्या विकासाला गती देण्याचा संकल्प
रितू तावडेंनी व्यक्त केला मुंबईच्या विकासाला गती देण्याचा संकल्प.
ठाकरे गटाकडून महापौर, उपमहापौरपदाचा उमेदवार कोण? फैसला थोड्याच वेळात
ठाकरे गटाकडून महापौर, उपमहापौरपदाचा उमेदवार कोण? फैसला थोड्याच वेळात.
मालेगावच्या महापौरपदी नसरीन बानो शेख यांची निवड
मालेगावच्या महापौरपदी नसरीन बानो शेख यांची निवड.