AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बच्चू कडूंनी स्वतःवरचं नियंत्रण सांभाळावं, नवनीत राणांनी आणखी असा दिला सल्ला

कार्यकर्ते नेत्यांना बनवितात. सार्वजनिक ठिकाणी अशी मारहाण करणं हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा अपमान आहे.

बच्चू कडूंनी स्वतःवरचं नियंत्रण सांभाळावं, नवनीत राणांनी आणखी असा दिला सल्ला
नवनीत राणांनी आणखी असा दिला सल्लाImage Credit source: social media
Govinda Hatwar
Govinda Hatwar | Updated on: Sep 30, 2022 | 3:01 PM
Share

गजानन उमाटे, Tv9 मराठी, प्रतिनिधी, नागपूर : दसरा मेळाव्यावरून उद्वव ठाकरे (Uddhav Thackeray ) गट आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गट यांच्या संख्येवरून चर्चा सुरू आहे. दावे-प्रतिदावे केले जात आहेत. कुणाकडं किती कार्यकर्ते जमणार, यावर वक्तव्य समोर येत आहेत. यासंदर्भात खासदार नवनीत राणा म्हणाल्या, उद्धव ठाकरे सीएम होते. तेव्हा संघर्ष केला असता तर आजची परिस्थिती आली नसती. शिवसेनेचे कार्यकर्ते आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. बाळासाहेबांचे विचार हे एकनाथ शिंदे पुढं नेत आहेत. बाळासाहेबांना मानणारे खरे कार्यकर्ते हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत राहतील. तर बळजबरीनं येणारे कार्यकर्ते हे उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यात राहतील.

महाराष्ट्र हा विचारावर चालणारा आहे. त्यांच्या विचारातून माहिती पडते. जो संविधान आहे, त्यानुसार न्याय मिळतो. बहुमत एकनाथ शिंदे यांच्याकडं आहे. त्यामुळं धनुष्यबाणही शिंदे यांच्याकडं येईल, असं मला वाटते, असंही नवनीत राणा यांनी सांगितलं.

उद्धव ठाकरे यांनी बाप चोरणारे असं म्हटलं. पण,बाळासाहेबांची विचारधारा ही शिंदे यांच्यासोबत आहे. बाळासाहेबांकडून दहा टक्के अडाप्ट केले तरी खूप काही करता आलं असतं. पण, उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षे राज्याच्या जनतेसाठी काही केलं नाही, अशी टीका त्यांनी केली.

उद्धव ठाकरे यांच्या काळात शेतकऱ्यांच्या परिस्थितीत सुधार झाला नाही. जो संघर्ष करतो तो इतिहास बनवितो. उद्धव ठाकरे हे संघर्ष करू शकत नाही. त्यामुळं ते इतिहास बनवू शकत नाही, असा आरोपही नवनीत राणा यांनी केला.

अमरावतीचं मंत्रिपद कुणाकडं, यावर बोलताना नवनीत राणा म्हणाल्या, बच्चू कडू यांचा राग, नियंत्रण हातातून जात आहे. ते स्पष्ट दिसतं. पेशंस सुटलेलं दिसून येत आहे. कार्यकर्त्यांला मारहाण प्रकरणातून हे स्पष्ट झालं आहे.

कार्यकर्ते नेत्यांना बनवितात. सार्वजनिक ठिकाणी अशी मारहाण करणं हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा अपमान आहे. बच्चू कडू यांनी मारहाण केली नाही, असं म्हटलं. नकार दिला असला, तरी व्हिज्युअल्स दिसतात. त्यातून कार्यकर्त्यांचा कसा अपमान करतो, हे दिसून येते.

अपमान करताना संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलंय. स्टेजवर आम्ही असतो. तेव्हा खाली बसून छतरंजी उचलणारा हा आमचा कार्यकर्ता असतो. त्यामुळं त्यांचा मानसन्मान राखला पाहिजे, असा सल्ला नवनीत राणा यांनी बच्चू कडू यांना दिला.

Follow Us
आयटी कंपनीनंतर आता मुंबईच्या नामांकित बँकेत धर्मपरिवर्तन? पतीचा...
आयटी कंपनीनंतर आता मुंबईच्या नामांकित बँकेत धर्मपरिवर्तन? पतीचा....
शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खूश खबर... अखेर कांदा प्रश्नावर तोडगा निघणार
शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खूश खबर... अखेर कांदा प्रश्नावर तोडगा निघणार.
कोणाला सुगावा लागू नये म्हणून चक्क... कसून चौकशी केल्यानंतर तेजस शाह..
कोणाला सुगावा लागू नये म्हणून चक्क... कसून चौकशी केल्यानंतर तेजस शाह...
पंतप्रधान मोदींवर सपकाळांची जहरी टीका; पनोती वक्तव्याने महाराष्ट्रात..
पंतप्रधान मोदींवर सपकाळांची जहरी टीका; पनोती वक्तव्याने महाराष्ट्रात...
EDच्या कारवाईनंतर CPI(M) कार्यकर्ते आक्रमक; अधिकाऱ्यांच्या गाड्यांवर..
EDच्या कारवाईनंतर CPI(M) कार्यकर्ते आक्रमक; अधिकाऱ्यांच्या गाड्यांवर...
नीट पेपरफुटी प्रकरणी मोठी कारवाई, प्राध्यापक तेजस शाहच्या कॅबिनमध्ये..
नीट पेपरफुटी प्रकरणी मोठी कारवाई, प्राध्यापक तेजस शाहच्या कॅबिनमध्ये...
रवींद्र चव्हाणांची दिल्लीवारी; 48 नावांची यादी दिल्ली दरबारात!
रवींद्र चव्हाणांची दिल्लीवारी; 48 नावांची यादी दिल्ली दरबारात!.
मुंबईकरांचं रक्त विकण्याचा डाव; ठाकरे गटाच्या विरोधानंतर फेरविचार,
मुंबईकरांचं रक्त विकण्याचा डाव; ठाकरे गटाच्या विरोधानंतर फेरविचार,.
मोटेगावकरने ज्याच्यासाठी पेपर फोडला त्याच लेकाचा खळबळजनक गौप्यस्फोट;
मोटेगावकरने ज्याच्यासाठी पेपर फोडला त्याच लेकाचा खळबळजनक गौप्यस्फोट;.
मीरा रोडनंतर घाटकोपर पेटलं? किरीट सोमय्यांचा थेट इशारा, म्हणाले....
मीरा रोडनंतर घाटकोपर पेटलं? किरीट सोमय्यांचा थेट इशारा, म्हणाले.....