बच्चू कडूंनी स्वतःवरचं नियंत्रण सांभाळावं, नवनीत राणांनी आणखी असा दिला सल्ला

कार्यकर्ते नेत्यांना बनवितात. सार्वजनिक ठिकाणी अशी मारहाण करणं हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा अपमान आहे.

बच्चू कडूंनी स्वतःवरचं नियंत्रण सांभाळावं, नवनीत राणांनी आणखी असा दिला सल्ला
नवनीत राणांनी आणखी असा दिला सल्लाImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Sep 30, 2022 | 3:01 PM

गजानन उमाटे, Tv9 मराठी, प्रतिनिधी, नागपूर : दसरा मेळाव्यावरून उद्वव ठाकरे (Uddhav Thackeray ) गट आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गट यांच्या संख्येवरून चर्चा सुरू आहे. दावे-प्रतिदावे केले जात आहेत. कुणाकडं किती कार्यकर्ते जमणार, यावर वक्तव्य समोर येत आहेत. यासंदर्भात खासदार नवनीत राणा म्हणाल्या, उद्धव ठाकरे सीएम होते. तेव्हा संघर्ष केला असता तर आजची परिस्थिती आली नसती. शिवसेनेचे कार्यकर्ते आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. बाळासाहेबांचे विचार हे एकनाथ शिंदे पुढं नेत आहेत. बाळासाहेबांना मानणारे खरे कार्यकर्ते हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत राहतील. तर बळजबरीनं येणारे कार्यकर्ते हे उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यात राहतील.

महाराष्ट्र हा विचारावर चालणारा आहे. त्यांच्या विचारातून माहिती पडते. जो संविधान आहे, त्यानुसार न्याय मिळतो. बहुमत एकनाथ शिंदे यांच्याकडं आहे. त्यामुळं धनुष्यबाणही शिंदे यांच्याकडं येईल, असं मला वाटते, असंही नवनीत राणा यांनी सांगितलं.

उद्धव ठाकरे यांनी बाप चोरणारे असं म्हटलं. पण,बाळासाहेबांची विचारधारा ही शिंदे यांच्यासोबत आहे. बाळासाहेबांकडून दहा टक्के अडाप्ट केले तरी खूप काही करता आलं असतं. पण, उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षे राज्याच्या जनतेसाठी काही केलं नाही, अशी टीका त्यांनी केली.

उद्धव ठाकरे यांच्या काळात शेतकऱ्यांच्या परिस्थितीत सुधार झाला नाही. जो संघर्ष करतो तो इतिहास बनवितो. उद्धव ठाकरे हे संघर्ष करू शकत नाही. त्यामुळं ते इतिहास बनवू शकत नाही, असा आरोपही नवनीत राणा यांनी केला.

अमरावतीचं मंत्रिपद कुणाकडं, यावर बोलताना नवनीत राणा म्हणाल्या, बच्चू कडू यांचा राग, नियंत्रण हातातून जात आहे. ते स्पष्ट दिसतं. पेशंस सुटलेलं दिसून येत आहे. कार्यकर्त्यांला मारहाण प्रकरणातून हे स्पष्ट झालं आहे.

कार्यकर्ते नेत्यांना बनवितात. सार्वजनिक ठिकाणी अशी मारहाण करणं हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा अपमान आहे. बच्चू कडू यांनी मारहाण केली नाही, असं म्हटलं. नकार दिला असला, तरी व्हिज्युअल्स दिसतात. त्यातून कार्यकर्त्यांचा कसा अपमान करतो, हे दिसून येते.

अपमान करताना संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलंय. स्टेजवर आम्ही असतो. तेव्हा खाली बसून छतरंजी उचलणारा हा आमचा कार्यकर्ता असतो. त्यामुळं त्यांचा मानसन्मान राखला पाहिजे, असा सल्ला नवनीत राणा यांनी बच्चू कडू यांना दिला.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.