AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता रडायचं नाही, लढायचं… अजितदादांच्या शोकसभेत बड्या नेत्याचं भावनिक आवाहन

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसला आहे. खेड तालुक्यातील शोकसभेत माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी व्यक्त केलेली भावना कार्यकर्त्यांना नवसंजीवनी देणारी ठरली आहे.

आता रडायचं नाही, लढायचं... अजितदादांच्या शोकसभेत बड्या नेत्याचं भावनिक आवाहन
Ajit pawarImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Jan 30, 2026 | 12:58 PM
Share

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी रोजी निधन झाले. विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाले आहे. अजित दादांसह विमानत असलेल्या चार जणांचा देखील मृत्यू झाला. काल बारामतीतील विद्या प्रतिष्ठान मैदानावर शासकीय सन्मानाने त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अजित पवारांच्या अकाली निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. मात्र, खेड तालुक्यातील शोकसभेत माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी व्यक्त केलेली भावना कार्यकर्त्यांना नवसंजीवनी देणारी ठरली आहे.

दिलीप मोहिते पाटील काय म्हणाले?

दादा कधी रडत बसले नाहीत. काल आपण सगळे रडलो, आजही रडू आवरत नाहीये. पण आता रडायचं नाही लढावं लागेल दादांचे विचार आणि स्वप्न साकार करायचे असेल, तर आता कामाला लागायचं आहे, असा निर्धार मोहिते पाटीलांनी कार्यकर्त्यां समोर केला. दादांना संपवण्याचा प्रयत्न अनेकांनी केला. पण दादा संपले नाहीत. कामाची आवड असलेले, दूरदृष्टी असणारे आणि प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार करणारे दादा म्हणजे अजरामर व्यक्तिमत्त्व होतं असे देखील मोहिते पाटील म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, पुणे जिल्हा विकासाच्या दृष्टीने पुढे गेला पाहिजे, हीच दादांची तळमळ होती. आज त्या तळमळीचं स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे असं स्पष्ट शब्दांत मांडत पुणे जिल्ह्यात दादांइतकी ताकद, दूरदृष्टी आणि कार्यकर्त्यांप्रती बांधिलकी आज कोणत्याही नेत्यात नाही अशी खंत मोहिते पाटीलांनी व्यक्त केली. अजित पवारांनंतर जिल्ह्यात एकही नेता नसल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या या भावनिक आणि प्रेरणादायी भाषणानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये नवसंजीवनी निर्माण केली आहे.

नेमका कसा झाला अपघात?

अजित पवार हे 28 जानेवारी रोजी पहाटे बारामती दौऱ्यावर निघाले होते. पहाटे मुंबईतून बारामतीला निघालेल्या अजित दादांच्या विमानाचा अपघात झाला आहे. विमान आकाशात असताना स्फोट झाला. त्यानंतर विमान थोडे झुकले आणि विमानतळाच्या आधीच एका शेतात कोसळले. त्यानंतर विमानाचे आणखी दोन-तीन स्फोट झाले. या घटनेचा सीसीटीव्ही समोर आला आहे. या भीषण अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्यासोबत विमानात असलेल्या इतर पाच जणांचेही निधन झाले आहे.

अपघातात कोणाचा मृत्यू?

अजित पवार: उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र.

विदिप जाधव: मुंबई पोलीस दलातील हवालदार आणि अजित पवारांचे पीएसओ (PSO).

कॅप्टन सुमित कपूर: विमानाचे मुख्य पायलट (PIC).

कॅप्टन शांभवी पाठक: को-पायलट (FO).

पिंकी माळी: फ्लाईट अटेंडंट.

Follow Us
'चंद्रकांत पाटील यांचे खरात सोबत,'...काय म्हणाले रवींद्र धंगेकर ?
'चंद्रकांत पाटील यांचे खरात सोबत,'...काय म्हणाले रवींद्र धंगेकर ?.
राऊत यांचे आरोप बिनबुडाचे, माझं खातं खरात कसे चालवणार? - दीपक केसरकर
राऊत यांचे आरोप बिनबुडाचे, माझं खातं खरात कसे चालवणार? - दीपक केसरकर.
उपमुख्यमंत्री शिंदे यांची सलग दोन कार्यक्रमांना दांडी, चर्चेला उधाण
उपमुख्यमंत्री शिंदे यांची सलग दोन कार्यक्रमांना दांडी, चर्चेला उधाण.
महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीत दोन नावांची चर्चा,पाहा कोण
महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीत दोन नावांची चर्चा,पाहा कोण.
मुंबईतील काही पेट्रोल पंपावर पेट्रोल साठा संपला,वाहनचालक त्रस्त
मुंबईतील काही पेट्रोल पंपावर पेट्रोल साठा संपला,वाहनचालक त्रस्त.
भोंदूबाबा अशोक खरातला पोलिसांनी कसा उचलला?, सगळा घटनाक्रम उघड
भोंदूबाबा अशोक खरातला पोलिसांनी कसा उचलला?, सगळा घटनाक्रम उघड.
'रेड्याप्रमाणे लोकशाही कापली जाते,'...काय म्हणाले उद्धव ठाकरे?
'रेड्याप्रमाणे लोकशाही कापली जाते,'...काय म्हणाले उद्धव ठाकरे?.
'राजकारणात असलेल्या लोकांनी काही सीमा...,' काय म्हणाले भुजबळ ?
'राजकारणात असलेल्या लोकांनी काही सीमा...,' काय म्हणाले भुजबळ ?.
देवकृपेनेच रुपाली चाकणकर यांचा राजीनामा झाला - करुणा मुंडे
देवकृपेनेच रुपाली चाकणकर यांचा राजीनामा झाला - करुणा मुंडे.
कर्तव्य म्हणून मी शिंदेंसोबत गेलो होतो, काय म्हणाले विखे पाटील ?
कर्तव्य म्हणून मी शिंदेंसोबत गेलो होतो, काय म्हणाले विखे पाटील ?.