AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता रडायचं नाही, लढायचं… अजितदादांच्या शोकसभेत बड्या नेत्याचं भावनिक आवाहन

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसला आहे. खेड तालुक्यातील शोकसभेत माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी व्यक्त केलेली भावना कार्यकर्त्यांना नवसंजीवनी देणारी ठरली आहे.

आता रडायचं नाही, लढायचं... अजितदादांच्या शोकसभेत बड्या नेत्याचं भावनिक आवाहन
Ajit pawarImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Jan 30, 2026 | 12:58 PM
Share

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी रोजी निधन झाले. विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाले आहे. अजित दादांसह विमानत असलेल्या चार जणांचा देखील मृत्यू झाला. काल बारामतीतील विद्या प्रतिष्ठान मैदानावर शासकीय सन्मानाने त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अजित पवारांच्या अकाली निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. मात्र, खेड तालुक्यातील शोकसभेत माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी व्यक्त केलेली भावना कार्यकर्त्यांना नवसंजीवनी देणारी ठरली आहे.

दिलीप मोहिते पाटील काय म्हणाले?

दादा कधी रडत बसले नाहीत. काल आपण सगळे रडलो, आजही रडू आवरत नाहीये. पण आता रडायचं नाही लढावं लागेल दादांचे विचार आणि स्वप्न साकार करायचे असेल, तर आता कामाला लागायचं आहे, असा निर्धार मोहिते पाटीलांनी कार्यकर्त्यां समोर केला. दादांना संपवण्याचा प्रयत्न अनेकांनी केला. पण दादा संपले नाहीत. कामाची आवड असलेले, दूरदृष्टी असणारे आणि प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार करणारे दादा म्हणजे अजरामर व्यक्तिमत्त्व होतं असे देखील मोहिते पाटील म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, पुणे जिल्हा विकासाच्या दृष्टीने पुढे गेला पाहिजे, हीच दादांची तळमळ होती. आज त्या तळमळीचं स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे असं स्पष्ट शब्दांत मांडत पुणे जिल्ह्यात दादांइतकी ताकद, दूरदृष्टी आणि कार्यकर्त्यांप्रती बांधिलकी आज कोणत्याही नेत्यात नाही अशी खंत मोहिते पाटीलांनी व्यक्त केली. अजित पवारांनंतर जिल्ह्यात एकही नेता नसल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या या भावनिक आणि प्रेरणादायी भाषणानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये नवसंजीवनी निर्माण केली आहे.

नेमका कसा झाला अपघात?

अजित पवार हे 28 जानेवारी रोजी पहाटे बारामती दौऱ्यावर निघाले होते. पहाटे मुंबईतून बारामतीला निघालेल्या अजित दादांच्या विमानाचा अपघात झाला आहे. विमान आकाशात असताना स्फोट झाला. त्यानंतर विमान थोडे झुकले आणि विमानतळाच्या आधीच एका शेतात कोसळले. त्यानंतर विमानाचे आणखी दोन-तीन स्फोट झाले. या घटनेचा सीसीटीव्ही समोर आला आहे. या भीषण अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्यासोबत विमानात असलेल्या इतर पाच जणांचेही निधन झाले आहे.

अपघातात कोणाचा मृत्यू?

अजित पवार: उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र.

विदिप जाधव: मुंबई पोलीस दलातील हवालदार आणि अजित पवारांचे पीएसओ (PSO).

कॅप्टन सुमित कपूर: विमानाचे मुख्य पायलट (PIC).

कॅप्टन शांभवी पाठक: को-पायलट (FO).

पिंकी माळी: फ्लाईट अटेंडंट.

Follow Us
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान...
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान थेट...
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, बंगाल...
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, नेमकं प्रकरण काय?
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठवताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट.... बंगालमध्ये राजकीय हालाचाली वाढल्या?
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...