AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आधी लक्ष्मण माने, मग MIM, आता सख्खा भाऊ ‘वंचित’मधून बाहेर, प्रकाश आंबेडकरांना धक्का

प्रकाश आंबेडकर यांचे सख्खे भाऊ आणि रिपब्लिकन सेना या राजकीय संघटनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर (Anandraj Ambedkar left vanchit aaghadi) यांनी आपण वंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे.

आधी लक्ष्मण माने, मग MIM, आता सख्खा भाऊ 'वंचित'मधून बाहेर, प्रकाश आंबेडकरांना धक्का
| Updated on: Jan 15, 2020 | 12:09 PM
Share

औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडीला औरंगाबाद शहरात पहिला मोठा धक्का बसला आहे. प्रकाश आंबेडकर यांचे सख्खे भाऊ आणि रिपब्लिकन सेना या राजकीय संघटनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर (Anandraj Ambedkar left vanchit aaghadi) यांनी आपण वंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे. त्याचबरोबर राज्यात एक नवीन पर्याय देण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे राज्यात नवीन समीकरणे उदयाला येण्याची शक्यता आहे. (Anandraj Ambedkar left vanchit aaghadi)

आनंदराज आंबेडकर हे प्रकाश आंबेडकर यांचे सख्खे भाऊ आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू. पण याच आनंदराज आंबेडकर यांनी आपला मोठा भाऊ प्रकाश आंबेडकर यांनी उभा केलेल्या वंचित बहुजन आघाडी हा पर्याय समस्त आंबेडकरी जनतेला निराश करणारा आहे असं वक्तव्य केलं. त्याचबरोबर आपण वंचितमधून बाहेर पडत असल्याचं सांगितलं आहे.

आनंदराज आंबेडकर यांनी वंचितमधून बाहेर पडण्याचा फक्त निर्णय घेतला नाही तर वंचित बहुजन आघाडीवर काही आरोप सुद्धा केले आहेत. “वंचित बहुजन आघाडीत ओबीसी समाजाचं नेतृत्व करणारे किती खरे नेते होते असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. वंचित बहुजन आघाडीला अपेक्षित यश मिळालं नाही”, असाही दावा त्यांनी केला. आनंदराज आंबेडकर यांच्या आशा पध्दतीने आरोप करून वंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडण्यामुळे वंचित बहुजन आघाडीवर दूरगामी परिणाम होणार आहेत.

वंचित बहुजन आघाडीतून सर्वात प्रथम बाहेर पडले भटक्या विमुक्तांचे नेते लक्ष्मण माने. त्यानंतर इम्तियाज जलील आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात बेबनाव निर्माण झाल्यामुळे एमआयएम सुद्धा वंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडली. एमआयएम बाहेर पडल्यामुळे वंचित बहुजन आघाडीला खरा झटका बसला आणि निवडणूक प्रक्रियेतून निवडून येण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधलेल्या अनेकांच्या स्वप्नांवर पाणी पडले.

सध्या प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग राज्यात अजूनही पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र त्यांचे खंदे शिलेदार या प्रयोगातून बाहेर पडत आहेत. आणि आता त्यांचे सख्खे बंधू वंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडल्यामुळे वंचित बहुजन आघाडीचं नव्याने मूल्यमापन सुरू झालं आहे.

Follow Us
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार.
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण.
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक...
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक....
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल.
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण.
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?.
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी.
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी.
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?.
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण.