AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘आत्मनिर्भर’च्या नावाखाली भाजपकडून कोकणवासियांची दिशाभूल : अनिल परब

रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज झूम अ‍ॅपद्वारे संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी विरोधी पक्षावर सडकून टीका केली (Anil Parab slams BJP).

'आत्मनिर्भर'च्या नावाखाली भाजपकडून कोकणवासियांची दिशाभूल : अनिल परब
| Updated on: Jul 05, 2020 | 3:23 PM
Share

मुंबई :आत्मनिर्भरच्या नावाखाली भाजपवाले कोकणवासियांची दिशाभूल करत आहेत (Anil Parab slams BJP). कोकणवासियांना नुकसान भरपाईसाठी भरभरुन मदत दिली गेली. मात्र, भाजप नेत्यांकडून नागरिकांना खोटी माहिती दिली गेली”, अशी टीका रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांनी केली (Anil Parab slams BJP).

रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज (5 जुलै) झूम अ‍ॅपद्वारे संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी विरोधी पक्षावर सडकून टीका केली.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

“निसर्ग चक्रीवादळानंतर नुकसानग्रस्तांना तातडीने मदत पोहोचली नाही, अशी खोटी माहिती भाजपकडून दिली जात आहे. राज्य सरकारने रत्नागिरी जिल्ह्यासाठी 116 कोटी रुपयांची मदत दिली आहे. यापैकी 54 कोटींचे वाटप झाले तर 62 कोटींचे वाटप सुरु आहे. अशीच मदत रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांनादेखील मिळाली आहे”, असं अनिल परब म्हणाले.

हेही वाचा : रामनाथ कोविंद यांच्या भेटीला पंतप्रधान मोदी, राष्ट्रपती भवनात अर्धा तास चर्चा

“निसर्ग चक्रीवादळानंतर नुकसानग्रस्तांना मदत मिळावी, यासाठी एनडीआरएफच्या निकषात बदल करण्याचे धाडस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं”, असंदेखील अनिल परब म्हणाले.

“स्वतः मुख्यमंत्री कोकणच्या दौऱ्यावर आले. कोकणवासियांना नुकसान भरपाईसाठी भरभरुन मदत दिली गेली. यावर कोणीही बोलत नाही. निसर्ग वादळातील नुकसानग्रस्तांना निधीबरोबर रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूची चाचणी प्रयोगशाळा सुरु केली. त्यावरही कोणी बोलत नाही”, असा घणाघात अनिल परब यांनी केला.

हेही वाचा : खाकी वर्दीतील वऱ्हाडी, कन्यादानाला पोलीस अधीक्षक, बीडमध्ये एचआयव्हीबाधितांचा विवाह सोहळा

“कोकणातील आलेल्या निधीपैकी 46.51 टक्के निधीचे वाटप झाले आहे. कोकणात गुंठेवारी शेती केली जाते. त्यामुळे अनेकांची नावे त्यावर असतात. त्यामुळे मदत देताना अडचणी येतात. मात्र, अशाप्रकारे अडचणी येत असतील तर नुकसान भरपाई देताना हमीपत्र घ्या, अशी मागणी आम्ही केली आहे. ती मान्य झाली आहे. त्यामुळे आता मदत वाटपात काही अडचण येणार नाही”, असंदेखील अनिल परब यांनी सांगितलं.

महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.